शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण अन् विकासापासून अजून वंचितच

By admin | Updated: November 30, 2015 01:06 IST

समाजाचा आरक्षणासाठी लढा : जिल्ह्यात धनगर समाजाची लोकसंख्या जवळपास ६ लाख--लोकमतसंगे जाणून घेऊ -धनगर समाज

प्रवीण देसाई -- कोल्हापूर -स्वातंत्र्यानंतर सहा दशके उलटूनही शिक्षण आणि विकासापासून वंचित राहण्याची वेळ धनगर समाजावर आली आहे. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या या समाजाला पारंपरिक मेंढपाळ व्यवसायातच मर्यादित राहावे लागले आहे. पारंपरिक व्यवसाय सोडून अन्य क्षेत्रांत व शिक्षणामध्ये बोटावर मोजण्याइतकेच प्रमाण दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठीही समाजाला लढाई करावी लागत आहे. लढवय्या असलेल्या या समाजाने राष्ट्रकार्यासाठी मराठा साम्राज्यापासून आतापर्यंत अनेक नरवीर दिले आहेत.जिल्ह्यात धनगर समाजाची लोकसंख्या जवळपास ६ लाखांच्या घरात आहे. पश्चिम भागातील सह्याद्रीलगत असणारे शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यांत डोंगरवस्तीवर राहणारा समाज आजही विकासापासून कोसो मैल दूर असल्याचे चित्र आहे. धनगरवाड्यांवर जायला रस्ता नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही, विजेचा तर पत्ताच नाही. शिक्षणाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. शासनाच्या प्रयत्नाने वाड्या-वस्त्यांवरती वस्ती शाळा निघाल्या तरीही दळणवळणाच्या साधनांअभावी आजही कित्येक शाळा केंबळ्यांच्या झोपडीमध्ये भरत आहेत. माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील महासत्ता देश घडविणारी भावी पिढी याच झोपडीत आपलं भविष्य पाहात आहे. मुख्य गावापासून १० ते १५ किलोमीटर पायपीट करत शिक्षणासाठी जावे लागत आहे. या ठिकाणी शिक्षकांची उपस्थिती ही विचार करायला लावणारी आहे. परिणामी समाजातील भावी पिढीदेखील अंधारात आपले भविष्य शोधत असल्याची स्थिती अनेक ठिकाणी असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर करवीर, कागल, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज या तालुक्यांतील धनगर समाजाचा प्रमुख व्यवसाय आजही शेळी-मेंढी पालन असल्याने त्यांचीही परिस्थिती फार वेगळी नाही. शिक्षण, रस्ते, वीज आणि पाण्याची जरी सोय असली तरी पोटाची खळगी भरण्यासाठी हा समाज आजही मेंढरांमागे भटकंती करतो आहे. परिणामी भावी पिढी शिक्षणापासून दूर आहे. अनेक वर्षे या समाजासाठी असलेल्या अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी महामंडळाकडे निधि उपलब्ध नाही. शासनाचे कोणतेही पाठबळ नाही. रात्री अपरात्री मेंढरांवर पडणारे दरोडे, तसेच मेंढरांकडे असणाऱ्या महिलांवर होणारे अतिप्रसंग व खुनासारखे होणारे गंभीर प्रसंग आजही या समाजाच्या नशिबी असल्याचे चित्र आहे. परिणामी, हा व्यवसाय अनेक समाजबांधवांनी सोडून देत वेठबिगारीची व हमालीचे काम स्वीकारत आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला आहे.धनगर समाज हा जिल्ह्यात सर्वत्र आढळतोे. त्यांचा पारंपरिक शेळी-मेंढी पालनाचा व्यवसाय आहे; परंतु शासनाची उदासीनता, चराऊ कुरणाचा प्रश्न व स्थानिक शेतकऱ्यांची अरेरावी आदी कारणांमुळे प्रचंड नफा देणारा हा व्यवसाय समाजातील बहुतांश जणांनी सोडून दिला आहे. उदरनिर्वाहासाठी हा समाज शहराच्या दिशेने वळला आहे. मार्केट यार्ड, रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक येथे हमाली करून शहरासह उपनगरांमध्ये हा समाज स्थिरावला आहे.कोल्हापूर जिल्हा हा लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या देशात सर्वप्रथम आरक्षणाची घोषणा करणारे शाहू महाराज हे पहिले राजे होते. त्यांनी कोल्हापूर संस्थानात सर्व जाती-धर्माच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी सर्व समाजाची वसतिगृहे बांधली; परंतु हा समाज शिक्षणापासून दूर असेल म्हणून पण या समाजाचे वसतिगृह झाले नाही. या बाबीची समाजातील विद्यार्थ्यांमध्ये खंत आहे. या समाजाचे आजतागायत वसतिगृह अथवा समाजाची अशी इमारत बांधण्यात आलेली नाही. या समाजातील हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच प्रमाण शिक्षित झाले आहे. प्राध्यापक, वकील, डॉक्टर यासह विविध क्षेत्रांतही त्यांनी झेप घेतली आहे; परंतु हा शिकलेला समाज संघटित नसल्याने त्याचा उर्वरित समाजाला म्हणावा असा उपयोग होताना दिसत नाही.एकेकाळी या देशावरती राज्यकर्ती असणारी ही जमात सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, मराठा साम्राज्याचे सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराज यशवंतराव होळकर आदींचे वंशज असणारी ही जमात काळाच्या ओघात इतकी मागास का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. यामागील प्रमुख कारण म्हणजे धनगर समाजाला आदिवासी आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही. यासाठी समाजाच्या संघटना सातत्याने आंदोलन करत आहेत. या सरकारकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत परंतु त्यांनीही जर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर पुन्हा रस्त्यावरची लढाई करण्याची तयारीही या लढावू समाजाची आहे.