शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

आम्हाला कोणी शिक्षक देता का शिक्षक ! बुरंबाळी शाळेतील मुलांची आर्त हाक; वर्ग चार , शिक्षक एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 9:50 AM

तुळशी धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात असणारी ही शाळा  गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी तुळशी खोऱ्यातील  गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून नावारूपास आली होती .या शाळेतील आदर्श शिक्षक दिनकर गवळी सर यांच्या सेवानिवृत्तीनंतर मात्र या शाळेच्या गुणवत्तेला थोडी घसरन लागली .

ठळक मुद्देचार वर्षापासून एकाच शिक्षकावरती कार्यभार; शाळेचा दर्जाही ढासळला

श्रीकांत ऱ्हायकर --धामोड          राधानगरी तालुक्यातील बुरंबाळी येथील प्राथमिक शाळेत गेल्या चार वर्षापासून एकच शिक्षक कार्यरत असून  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान  होत  असल्यानेच ग्रामस्थांसह विद्यार्थी वर्गातून  जिल्हा परिषद प्रशासनाला हाक दिली जात आहे . वारंवार मागणी करूनही शाळेत शिक्षक दिला जात नसल्याने ग्रामस्थांनी बुधवारी शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे . तर दुसरीकडे विद्यार्थी वर्गातून आम्हाला कोणी शिक्षक देता का शिक्षक अशीच म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे .    

बुरंबाळी येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत . तुळशी धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात असणारी ही शाळा  गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी तुळशी खोऱ्यातील  गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून नावारूपास आली होती .या शाळेतील आदर्श शिक्षक दिनकर गवळी सर यांच्या सेवानिवृत्तीनंतर मात्र या शाळेच्या गुणवत्तेला थोडी घसरन लागली . गवळी सरांच्या  कार्य कालामध्ये  या शाळेस स्वच्छ सुंदर हिरवी शाळा , उपक्रमशील शाळा असे अनेक पुरस्कार शाळेला प्राप्त झाले होते . मात्र २०१७ पासून चार वर्गासाठी केवळ एकच शिक्षक अध्यापन करीत असल्याने शाळेचा दर्जा खालावला आहे .             २० मे २०१७ पासून येथे कार्यरत असणारे श्री . सुतार हे शिक्षक प्रतिनियुक्तीवर 'डाएट ' कडे कामकाज पहात आहेत . त्यांच्या जागी एक  वर्षासाठी वि. मं . शिरोली येथील शिक्षकांने प्रतिनियुक्तिवर  अध्यापन केले . मात्र तेही शिक्षक पुंन्हा स्वशाळेत गेल्याने व उर्वरित एक शिक्षकांची बदली झाल्याने त्यांच्या जागी सध्या एकाच शिक्षिकेला अध्यापन ,शाळेचे दैनंदिन कामकाज , शालेय पोषण आहार , मासिक पत्रके , सातत्याने सुरु असणारी ट्रेनिंग यामुळे एका शिक्षकाला चार वर्ग सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे .          याचा परिणाम  म्हणून काही पालकांनी आपली मुले  शेजारील शाळेमध्ये पाठवल्याने  याचा परिणाम शाळेच्या पट संख्येवर झाल्याचे जाणवत आहे .पूर्वी शाळेची पटसंख्या ४२ होती मात्र सध्या ती २७ वर आली आहे . शिक्षकांना शाळेचा ढासळत चाललेला हा दर्जा व विद्यार्थ्यांची रोडावलेली पटसंख्या याचा विचार करून  शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने शाळेला दुसरा शिक्षक मिळावा यासाठी ग्रा.पं.पदाधिकाऱ्यांनी तालुका व जिल्हा प्रशासन विभागाकडे शिक्षक मागणी  करूनही याची कोणी दखल घेतलेली नाही .                आता येथील ग्रामपंचायतीचे सरपंच ,उपसरपंच, सदस्य यांच्यासह पालक व विद्यार्थी वर्गातून  दुसऱ्या शिक्षक मागणीसाठी  उठाव  करण्याचे शस्त्र उपसले जात आहे . येत्या दोन दिवसात शाळेला शिक्षक न मिळाल्यास बुधवारी शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा आता विद्यार्थी वर्गातून दिला जात आहे . शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये  स्वतःचा नावलौकिक टिकवून ठेवणाऱ्या राधानगरी तालुक्यातील डोंगर कपारीतील शाळांची गुणवत्तेच्या बाबतीमध्ये होणारी ही दैन्यावस्था पाहता जिल्हा व तालुका शिक्षण विभाग याकडे किंचितही लक्ष देत नाही याचे नेमके कारण काय? यावर तोडगा निघणार का? विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणार का? पूर्वीप्रमाणे गुणवत्ता सिद्ध करण्याचा मान बुरंबाळी प्राथमिक शाळा मिळवणार का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहेत .    

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक