शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST

कोल्हापूर : मागील आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य समितीने राज्य शासनाकडे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कोरोना संसर्ग नियंत्रणात ...

कोल्हापूर : मागील आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य समितीने राज्य शासनाकडे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत नसल्याने संपूर्ण लॉकडाऊन करण्याची शिफारस केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर प्रशासनाची पाठ थोपटून जाताना जिल्ह्याची स्थिती गंभीर नसल्याचा निर्वाळा दिलेल्या समितीला तिथे गेल्यानंतर परिस्थिती गंभीर असल्याचा साक्षात्कार झाला की काय, असा प्रश्न आता यंत्रणेलाही पडला आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी येत असून, रुग्णसंख्या हजाराच्या आत आल्याने संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यताही धूसरच आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाची बाजू समजून घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती गंभीर होती. त्यामुळे मागील आठवड्यात केंद्रीय आरोग्य समितीने जिल्ह्याचा दौरा केला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तीन तासांच्या बैठकीनंतर त्यांनी जिल्हा-महापालिका प्रशासनाचे कौतुक करत कोल्हापूरची स्थिती गंभीर नसल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या विधानाशी मी सहमत नसल्याचे सांगितले.

मागील आठवड्यापासून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असून, तो ९.८ टक्के इतका आहे. सध्या रुग्णसंख्या हजाराच्या आत आली आहे आणि मृत्यूचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा स्तर ३ मध्ये समावेश झाला असून, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानांनादेखील सोमवारपासून सकाळी ७ ते ४ या वेळेत व्यवसायाची परवानगी देण्यात आली आहे. आता कुठे जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर आणि व्यवहार सुरळीत होण्याच्या मार्गावर असताना केंद्रीय समितीने कोल्हापूर व सांगलीत संपूर्ण लॉकडाऊन करण्याची शिफारस केल्याने पुन्हा लोकांच्या छातीत धस्स झाले. राज्याच्या आरोग्य विभागाने मात्र आम्हाला समितीच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे म्हटले आहे.

---

महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, समितीने प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले आणि काही उपाययोजनाही सुचवल्या होत्या. मात्र, त्यात लॉकडाऊनचा विषय चर्चेत आला नव्हता. महापालिका प्रशासनाकडे तसे कोणतेही अधिकृत निर्देश आलेले नाहीत.

----