शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

सत्तांतराचा फटका; ‘नियोजन’ची एकही बैठक नाही..तोपर्यंतच गेले पद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 12:13 IST

जिल्ह्यातील १८ जणांची या समितीवरील नियुक्ती ठरली औट घटकेचीच

समीर देशपांडेकोल्हापूर : महाविकास आघाडी शासन सत्तेत आल्यानंतर अडीच वर्षांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी १८ जणांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, नियुक्तीचा आदेश आल्यापासून केवळ ४९ दिवसांमध्ये सरकार पडल्यामुळे या समित्या बरखास्त झाल्या आहेत. परिणामी, जिल्ह्यातील १८ जणांची या समितीवरील नियुक्ती औट घटकेचीच ठरली आहे.

जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत गटातून ४० सदस्यांची नियुक्ती करण्यात येते; परंतु यातील कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेतील सदस्यांची मुदत संपल्यामुळे यातील कोणीही सदस्य नाहीत. खासदार, आमदार सदस्य असलेल्या या समितीवर पालकमंत्री २० जणांची निमंत्रित म्हणून नियुक्ती करू शकतात. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नावांबाबत एकमत होऊन घात आल्यानंतर ही नावे पालकमंत्री सतेज पाटील यांनी निश्चित केली.त्यानुसार १२ मे २०२२ रोजी या सर्वांच्या नियुक्तीचा शासन आदेशही निघाला; परंतु केवळ ४९ दिवसांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर आता नियोजन समित्याही बरखास्त झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत नियोजन समितीची बैठक लावण्याचे नियोजन होते; परंतु विविध कारणांनी ती होऊ शकली नाही. आता तर सरकारच पडल्याने या १८ जणांना नियोजन समितीच्या बैठकीसाठी महाराणी ताराराणी सभागृहात पाय न टाकताही केवळ निवड झाली एवढ्यापुरते समाधान मानावे लागणार आहे.

यांची झाली होती नियुक्तीडॉ. जे. एफ. पाटील, एम. एस. देशमुख मुक्त सैनिक वसाहत कोल्हापूर, संभाजी पवार लाटवडे, बाजीराव पाटील शिये, मधुकर जांभळे बालिंगे, जयसिंग पाटील सुळंबी, संजय मोहिते साईक्स एक्स्टेंशन कोल्हापूर, भगवानराव जाधव रूकडी, भारत पाटील भुये, प्रेमला पाटील कोरोची, सर्जेराव शिंदे दानोळी, क्रांतिसिंह पवार पाटील सडोली खालसा, सुरेश ढोणुक्षे काटकर माळ कोल्हापूर, अनिल ऊर्फ सावकार मादनाईक उदगाव, सचिन ऊर्फ बाळासाहेब पाटील गडमुडशिंगी, मोहन धुंदरे राशिवडे, तानाजी आंग्रे वरणगे, पोपट दांगट गडमुडशिंगी.

स्वाभिमानीच्या दोघांचेही राजीनामे

स्वाभिमानीचे माजी खासदार यांचे कट्टर समर्थक सावकर मादनाईक यांची नियुक्ती या समितीवर करण्यात आली होती; परंतु तोपर्यंत शेट्टी यांनी महाविकास आघाडीशी काडीमोड घेतला होता. त्यामुळे निवड जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सावकर मादनाईक यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जयसिंगपूरचे स्वाभिमानीचे कार्यकर्ते शैलश आडके यांची नियुक्ती करण्यात आली; परंतु त्यांनीही लगेच राजीनामा दिला.

युती काळातही हेच घडले होतेभाजप-शिवसेना युती सरकारच्या अखेरच्या टप्प्यातही नेमके हेच घडले होते. जिल्ह्यातील शिवसेना-भाजपच्या तब्बल १६ जणांना विविध महामंडळांच्या संचालक मंडळांवर संधी देण्यात आली. बातम्या, फोटो छापून आले. सभा, समारंभात, वार्षिक सर्वसाधारण सभांमधून सत्कार झाले; परंतु राज्यपालांचा आदेश अखेरपर्यंत न निघाल्याने या सर्वांना त्यांची त्यांची कार्यालयेही पाहता आली नाहीत. तोपर्यंत सरकारची मुदत संपली. हेच आता घडले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर