शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आजीबाईचा बटवा अन्‌ कोरोनाला हटवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:28 IST

कोल्हापूर : पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेल्या आजीबाईंच्या बटव्यामध्ये कोरोनासारख्या जैविक शस्त्रापासून लढण्याचीदेखील ताकद आहे. गेल्यावर्षी सुरू झालेल्या या संकटावर मात ...

कोल्हापूर : पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेल्या आजीबाईंच्या बटव्यामध्ये कोरोनासारख्या जैविक शस्त्रापासून लढण्याचीदेखील ताकद आहे. गेल्यावर्षी सुरू झालेल्या या संकटावर मात करण्यासाठी, या आजारापासून दूर राहण्यासाठी हळद, दूध, गरमपाणी आल्याचा रस, मिठाच्या गुळण्या, मसाल्यांचा वापर करून केलेले काढे, आयुर्वेदिक काढे यांचा घराघरांत वापर केला जात आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे संकट सुरू झाले आणि त्यापासून वाचण्यासाठीच्या वेगवेगळ्या उपाययोजनांवर विचारमंथन सुरू झाले. ही महामारी आधुनिक असली तरी त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांसाठी भारतीय संस्कृतीची जीवनशैली असलेली आयुर्वेद आणि पारंपरिक उपचार पद्धतीच कामाला आली. यामुळे जगभरात पुन्हा एकदा आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित झाले. अन्य देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये या रोगाशी लढण्याची प्रतिकारशक्ती अधिक दिसून आली याचे कारण म्हणजे घराघरांत वापरले जाणारे मसाले. प्रत्येक स्वयंपाकघरात अगदी रोज वापरल्या जाणाऱ्या या मसाल्यांनी व जेवणात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे कोरोनाविरोधातील लढाईत मोलाचे योगदान आहे. वेगवेगळ्या आजारांवर केल्या जाणाऱ्या घरगुती उपायांचा खजिना असतो तो आजीबाईच्या बटव्यात. कुटुंबातील वयोवृद्ध आजीकडून सुना, लेकी, नातींपर्यंत सगळ्यांकडे हा बटवा असतोच. आता कोरोना काळातही या आजीबाईच्या या बटव्याने कुटुंबाचे सुरक्षाकवच म्हणूनच जबाबदारी पेलली आहे.

--

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण - ९९ हजार १९८

कोरोनामुक्त झालेले रुग्ण - ८२ हजार २८३

सध्या उपचार घेत असलेले रूग्ण : १३ हजार ५२१

कोरोनामृत्यू : ३ हजार ३९१

--

आजीबाईच्या बटव्यात काय

गेल्यावर्षी कोरोना सुरू झाला तेव्हापासून मी रोज तुळस, हळद, आलं, लवंग, दालचिनी आणि गूळ घालून केलेला काढा पिते. घराच्या कुंडीत गवतीचहा लावला आहे. रोज चहात आलं आणि गवती चहा घालून पिते. जेवणात हळद आणि आल्याचा वापर वाढविला आहे.

सुमन कमते (राजारामपुरी)

-

आमच्या घरातील चारजण पॉझिटिव्ह आले. मी आणि लहान नातींना कोरोना होऊ नये म्हणून रोज गरम पाण्यात हळद आणि आल्याचा रस घालून पित होतो. रात्री झोपताना गरम दूध, हळद, गुळवेलचे चाटण करून खात होतो. रोज न चुकता वाफ आणि डॉक्टरांनी सांगितलेले आयुर्वेदिक काढे घेतले. य घरगुती उपायांमुळे आम्ही कोरोनाला दूर ठेवू शकलो.

अनुराधा काशीद (देवकर पाणंद)

--

माझं वय ८५. काही महिन्यांपूर्वी मला कोरोना झाला. एकीकडे डॉक्टरांचे उपचार सुरू होते, दुसरीकडे आम्ही घरगुती उपायदेखील सुरू ठेवले. मी रोज ताजं ताक, हिरव्या भाज्यांचे सूप पित होते. हळद दूध, आयुर्वेदिक काढे पित होते. भाज्या आणि फळांमुळे ताकद वाढली. कोरोनातून बरे झाल्यानंतरदेखील मी हा आहार कायम ठेवला आहे, त्यामुळे आता मी पूर्णत: तंदुरुस्त आहे.

उमा परुळेकर

---

कशाचा काय फायदा

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या : रोग प्रतिबंधक उपाय. मीठ हे जंतुनाशक असल्याने गरम पाणी आणि मिठाच्या गुळण्या केल्याने घश्यातील जंतू मरतात. घश्याला आराम मिळतो.

हळद : हळदीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे शरीरात जंतुरोधक म्हणून काम करते. त्यामुळे काढ्यात, गरम पाण्यात किंवा दुधात हळद घालून त्याचे सेवन केले जाते.

अद्रकचा रस : आल्याचा रसदेखील जंतुरोधक म्हणून काम करते. सर्दी, खोकला, घश्यात खवखव असेल तर पूर्वीपासून आपल्याकडे आल्याच्या रसात मध घालून पितात. वरील त्रासापासून आराम मिळतो, रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

--

आपल्याकडे ऋतुमानातील बदलानुसार आहार केला जातो. जेवणात वापर केल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या मसाल्यांसह वनौषधींपासून बनविले जाणारे काढे कोरोनापासून बचाव करतात. आयुर्वेद आणि भारतीय जीवनशैलीचे महत्त्व यानिमित्ताने जगाला समजले आहे.

डॉ. सुनील पाटील (आयुर्वेदाचार्य)

--