शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

कोल्हापुरात एंट्रीला दररोजची वाहतूककोंडी, वाहनचालक वैतागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 17:38 IST

अल्प अंतर गाठण्यासाठी लागतोय तब्बल दीड तास

सतीश पाटीलशिरोली : महामार्ग आणि कोल्हापूर शहरातून दररोज धावणारी ५० हजार वाहने, रस्त्यांचे अपुरे काम, तावडे हॉटेल चौकात अपुरी जागा यामुळे कोल्हापूर शहर व परिसरातील रस्त्यांवरील दररोजची वाहतूककोंडी आता वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.शहरातून शिरोली सांगली फाटा, शिरोली सांगली फाट्याहून कोल्हापूरकडे येणे, तसेच गांधीनगर ते कोल्हापूर आणि उचगाव सांगली फाटा हे अल्प अंतर गाठण्यासाठी तब्बल दीड तास लागत आहेत. रोजच्या प्रवासात तीन ते चार किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी एवढा वेळ लागत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.शहरात आणि महामार्गावर वाढलेली वाहनांची संख्या, कोल्हापूर शहरात येण्यासाठी अपुरी रस्त्यांची रुंदी, रस्त्यांवरील ठिकठिकाणी सुरू असलेले काम, यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सकाळी ऑफिस, शाळा व महाविद्यालयांची वेळ आणि संध्याकाळी परतीच्या वेळेस वाहतुकीवरचा ताण प्रचंड वाढतो. विशेषतः पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. महामार्गाशी जोडलेल्या शिरोली सांगली फाटा, उचगाव येथे वाहतूक ठप्प होऊन लांबच लांब रांगा लागतात. रुग्णालयात जाणारे रुग्ण, शाळेत जाणारी लहान मुले, नोकरी-व्यवसायासाठी रोज प्रवास करणारे नागरिक हे या कोंडीमुळे सर्वाधिक त्रस्त आहेत. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी कोंडी सोडवण्यासाठी तावडे हॉटेल येथे सिग्नल व्यवस्था उभारली असली तरी याचा म्हणावा तितका उपयोग होत नाही.

पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज १५ ते २४ हजार वाहने गेल्या आठ दिवसांत धावली आहेत. सरासरी २० हजार वाहने रस्त्यांवर धावत असतात, असे राष्ट्रीय प्राधिकरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोल्हापूर शहरातून तावडे हॉटेल आणि महामार्गावर दररोज २५ ते ३० हजार वाहने धावतात. तावडे हॉटेल चौकात वाहतूककोंडी कमी करण्यासाठी कोल्हापूर वाहतूक शाखा, महामार्ग, शिरोली, गांधीनगर पोलिस, असे एकूण २५ कर्मचारी गेली तीन दिवस तैनात आहेत. - नंदकुमार मोरे, शहर वाहतूक निरीक्षक 

कोल्हापूर शहरात जाण्यासाठी आणि येण्यासाठी वाहनचालकांना तास तासभर ताटकळत बसावे लागते. तावडे हॉटेल चौकात आणि पंचगंगा नदी पुलावर होणारी वाहतूककोंडी याला कारणीभूत आहे. ही कोंडी सोडवणे आवश्यक आहे. - ज्योतीराम पोर्लेकर, जिल्हाध्यक्ष मानवाधिकार.