शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
5
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
6
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
7
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
8
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
9
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
10
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
11
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
12
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
13
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
14
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
15
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
16
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
17
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
19
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
20
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक

कोल्हापुरात एंट्रीला दररोजची वाहतूककोंडी, वाहनचालक वैतागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 17:38 IST

अल्प अंतर गाठण्यासाठी लागतोय तब्बल दीड तास

सतीश पाटीलशिरोली : महामार्ग आणि कोल्हापूर शहरातून दररोज धावणारी ५० हजार वाहने, रस्त्यांचे अपुरे काम, तावडे हॉटेल चौकात अपुरी जागा यामुळे कोल्हापूर शहर व परिसरातील रस्त्यांवरील दररोजची वाहतूककोंडी आता वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.शहरातून शिरोली सांगली फाटा, शिरोली सांगली फाट्याहून कोल्हापूरकडे येणे, तसेच गांधीनगर ते कोल्हापूर आणि उचगाव सांगली फाटा हे अल्प अंतर गाठण्यासाठी तब्बल दीड तास लागत आहेत. रोजच्या प्रवासात तीन ते चार किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी एवढा वेळ लागत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.शहरात आणि महामार्गावर वाढलेली वाहनांची संख्या, कोल्हापूर शहरात येण्यासाठी अपुरी रस्त्यांची रुंदी, रस्त्यांवरील ठिकठिकाणी सुरू असलेले काम, यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सकाळी ऑफिस, शाळा व महाविद्यालयांची वेळ आणि संध्याकाळी परतीच्या वेळेस वाहतुकीवरचा ताण प्रचंड वाढतो. विशेषतः पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. महामार्गाशी जोडलेल्या शिरोली सांगली फाटा, उचगाव येथे वाहतूक ठप्प होऊन लांबच लांब रांगा लागतात. रुग्णालयात जाणारे रुग्ण, शाळेत जाणारी लहान मुले, नोकरी-व्यवसायासाठी रोज प्रवास करणारे नागरिक हे या कोंडीमुळे सर्वाधिक त्रस्त आहेत. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी कोंडी सोडवण्यासाठी तावडे हॉटेल येथे सिग्नल व्यवस्था उभारली असली तरी याचा म्हणावा तितका उपयोग होत नाही.

पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज १५ ते २४ हजार वाहने गेल्या आठ दिवसांत धावली आहेत. सरासरी २० हजार वाहने रस्त्यांवर धावत असतात, असे राष्ट्रीय प्राधिकरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोल्हापूर शहरातून तावडे हॉटेल आणि महामार्गावर दररोज २५ ते ३० हजार वाहने धावतात. तावडे हॉटेल चौकात वाहतूककोंडी कमी करण्यासाठी कोल्हापूर वाहतूक शाखा, महामार्ग, शिरोली, गांधीनगर पोलिस, असे एकूण २५ कर्मचारी गेली तीन दिवस तैनात आहेत. - नंदकुमार मोरे, शहर वाहतूक निरीक्षक 

कोल्हापूर शहरात जाण्यासाठी आणि येण्यासाठी वाहनचालकांना तास तासभर ताटकळत बसावे लागते. तावडे हॉटेल चौकात आणि पंचगंगा नदी पुलावर होणारी वाहतूककोंडी याला कारणीभूत आहे. ही कोंडी सोडवणे आवश्यक आहे. - ज्योतीराम पोर्लेकर, जिल्हाध्यक्ष मानवाधिकार.