शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात एंट्रीला दररोजची वाहतूककोंडी, वाहनचालक वैतागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 17:38 IST

अल्प अंतर गाठण्यासाठी लागतोय तब्बल दीड तास

सतीश पाटीलशिरोली : महामार्ग आणि कोल्हापूर शहरातून दररोज धावणारी ५० हजार वाहने, रस्त्यांचे अपुरे काम, तावडे हॉटेल चौकात अपुरी जागा यामुळे कोल्हापूर शहर व परिसरातील रस्त्यांवरील दररोजची वाहतूककोंडी आता वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.शहरातून शिरोली सांगली फाटा, शिरोली सांगली फाट्याहून कोल्हापूरकडे येणे, तसेच गांधीनगर ते कोल्हापूर आणि उचगाव सांगली फाटा हे अल्प अंतर गाठण्यासाठी तब्बल दीड तास लागत आहेत. रोजच्या प्रवासात तीन ते चार किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी एवढा वेळ लागत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.शहरात आणि महामार्गावर वाढलेली वाहनांची संख्या, कोल्हापूर शहरात येण्यासाठी अपुरी रस्त्यांची रुंदी, रस्त्यांवरील ठिकठिकाणी सुरू असलेले काम, यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सकाळी ऑफिस, शाळा व महाविद्यालयांची वेळ आणि संध्याकाळी परतीच्या वेळेस वाहतुकीवरचा ताण प्रचंड वाढतो. विशेषतः पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. महामार्गाशी जोडलेल्या शिरोली सांगली फाटा, उचगाव येथे वाहतूक ठप्प होऊन लांबच लांब रांगा लागतात. रुग्णालयात जाणारे रुग्ण, शाळेत जाणारी लहान मुले, नोकरी-व्यवसायासाठी रोज प्रवास करणारे नागरिक हे या कोंडीमुळे सर्वाधिक त्रस्त आहेत. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी कोंडी सोडवण्यासाठी तावडे हॉटेल येथे सिग्नल व्यवस्था उभारली असली तरी याचा म्हणावा तितका उपयोग होत नाही.

पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज १५ ते २४ हजार वाहने गेल्या आठ दिवसांत धावली आहेत. सरासरी २० हजार वाहने रस्त्यांवर धावत असतात, असे राष्ट्रीय प्राधिकरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोल्हापूर शहरातून तावडे हॉटेल आणि महामार्गावर दररोज २५ ते ३० हजार वाहने धावतात. तावडे हॉटेल चौकात वाहतूककोंडी कमी करण्यासाठी कोल्हापूर वाहतूक शाखा, महामार्ग, शिरोली, गांधीनगर पोलिस, असे एकूण २५ कर्मचारी गेली तीन दिवस तैनात आहेत. - नंदकुमार मोरे, शहर वाहतूक निरीक्षक 

कोल्हापूर शहरात जाण्यासाठी आणि येण्यासाठी वाहनचालकांना तास तासभर ताटकळत बसावे लागते. तावडे हॉटेल चौकात आणि पंचगंगा नदी पुलावर होणारी वाहतूककोंडी याला कारणीभूत आहे. ही कोंडी सोडवणे आवश्यक आहे. - ज्योतीराम पोर्लेकर, जिल्हाध्यक्ष मानवाधिकार.