शहरं
Join us  
Trending Stories
1
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
2
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
3
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
4
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
5
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
6
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
7
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
8
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
9
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
10
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
11
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
12
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
13
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
14
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
15
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
16
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
17
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
18
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
19
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
20
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्गाने टाकली नांगी, जिल्ह्यात केवळ ३५ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

कोल्हापूर : पहिल्या तसेच दुसऱ्या लाटेवेळी संपूर्ण जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या तसेच संपूर्ण समाजजीवनाची घडी विस्कटणाऱ्या कोरोना संसर्गाने आता नांगी ...

कोल्हापूर : पहिल्या तसेच दुसऱ्या लाटेवेळी संपूर्ण जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या तसेच संपूर्ण समाजजीवनाची घडी विस्कटणाऱ्या कोरोना संसर्गाने आता नांगी टाकली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पन्नासच्या आतच नवीन रुग्णांची भर पडत आहे. रविवारी केवळ ३५ नवीन रुग्णांची नोंद झाली तर कोल्हापूर शहरातील एका महिलेचा कोराेनामुळे मृत्यू झाला.

सीपीआर रुग्णालय प्रशासनाने रविवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात केवळ ३५ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील चार रुग्णांचा, इतर जिल्ह्यातील पाच, हातकणंगले तसेच करवीर तालुक्यातील प्रत्येकी तीन, तर शाहूवाडी तालुक्यातील दोन रुग्णांचा रुग्णांचा समावेश आहे.

कोल्हापुरातील संभाजीनगर येथे राहणाऱ्या ६१ वर्षीय महिलेचा रविवारी कोरोनामुळे सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या चोवीस तासांत उपचार घेणारे ६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

गेल्या काही दिवसांतील नवीन रुग्णांचे आकडे पाहता कोरोनाने जिल्ह्यात मान टाकली असल्याचे दिसते. नवीन रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर लवकरच कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो.