शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
3
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
4
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
5
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
6
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
7
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
8
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
9
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
10
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
11
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
12
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
13
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
14
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
15
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
16
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
18
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
19
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
20
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

'शक्तिपीठ'ची सुपारी घेतलेले कंत्राटदारांचे कैवारी, बैठकीत राजेश क्षीरसागर यांचे नाव न घेता टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 12:36 IST

'पालकमंत्री आबिटकर व मंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांना सांगण्याचे धाडस करावे'

कोल्हापूर : ज्यांची एक गुंठाही जमीन शक्तिपीठ महामार्गात जाणार नाही, ज्यांचा शेती, मातीशी संबंध नाही, अशांनाच शक्तिपीठ महामार्ग हवा आहे. कंत्राटदारांची बैठक घेऊन या महामार्गाची सुपारी फोडणारे वर्षभरापासून कुठे होते, लोकच त्यांना शोधत होते, या शब्दांत शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांसह नेत्यांनीही नाव न घेता आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर तोंडसुख घेतले.आमदार क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वी शक्तिपीठ महामार्गाला समर्थन दिले होते. त्याचे पडसाद गुरुवारच्या बैठकीत उमटले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच समन्वयक गिरीश फोंडे यांनी ज्यांच्या शक्तिपीठाशी संबंध नाही अशांनी आता या महामार्गाची सुपारी घेतल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना शक्तिपीठ नको आहे, मात्र, काहींनी या महामार्गासाठी कंत्राटदारांची बैठक बोलवून काय साध्य केले. ज्यांना वर्षभरापूर्वी लोक शोधत होते ते आता याची सुपारी फोडत असल्याचा टोला त्यांनी लगावला.शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनीही क्षीरसागर यांचा नामोल्लेख टाळत त्यांना टोले लगावले. ते म्हणाले, ज्यांची एक गुंठाही जमीन शक्तिपीठ महामार्गात जात नाही, शेतीशी ज्यांचा संबंध नाही असे लोक शक्तिपीठ महामार्ग पाहिजे म्हणून ओरडत आहेत हे हास्यास्पद आहे.

परस्परविरोधी भूमिका कशासाठीपालकमंत्री प्रकाश आबिटकर हे महामार्ग होणार नाही असे सांगतात तर त्यांच्याच पक्षाचे शहरातील आमदार शक्तिपीठाचे समर्थन करतात. त्यामुळे नेमकी सत्ताधाऱ्यांची भूमिका काय हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान सतेज पाटील यांनी दिले.

शक्तिपीठात फितुरी नको म्हणून..कणेरीवाडीचे आनंदराव भोसले यांनी शक्तिपीठाचा विषय कोर्टात मांडण्याची सूचना केली. यावर आमदार सतेज पाटील मराठा आंदोलनापासून ते राज्यातील वेगवेगळ्या घटनांचा पट उलगडत त्यात ज्या पद्धतीने फितुरी झाली तसा अनुभव या आंदोलनात होऊ नये म्हणून शक्तिपीठ महामार्गाचा लढा रस्त्यावरच लढण्याची आग्रही भूमिका मांडली. त्याला सर्वच शेतकऱ्यांनी सहमती दर्शविली.

मुंबईत जाऊन विरोध कळवापालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तिपीठाला विरोध असल्याचे कोल्हापुरात सांगण्यापेक्षा थेट मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांना हे सांगण्याचे धाडस करावे, असा सल्ला विजय देवणे यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर