शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कागल पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST

जहाँगीर शेख. कागल, एकीकडे राज्याचे ग्रामविकास मंत्रिपद भूषवितांना आपल्या मतदारसंघाचाही विकासात्मक कायापालट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून ...

जहाँगीर शेख.

कागल, एकीकडे राज्याचे ग्रामविकास मंत्रिपद भूषवितांना आपल्या मतदारसंघाचाही विकासात्मक कायापालट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ करत असताना दुसरीकडे या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करण्यात प्रशासकीय पातळीवर अनास्था दाखविली जात आसल्याचे चित्र दिसत आहे. पाणंद रस्त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सत्ताधारी गटातील पंचायत समिती सदस्यालाच उपोषणास बसावे लागले आहे. विजय भोसले, जयदीप पोवार, माजी सभापती विश्वासराव कुराडे हे सदस्य उपोषणाला बसले होते.

ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने पाणंद रस्ते, घर घरगोठा, रस्ते, पाणीपुरवठा योजना अशा विविध कामांच्या घोषणा झाल्या आहेत. या विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रशासनाचा महत्त्वाचा रोल आहे. कागल पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील अधिकारी याबद्दल फारसे उत्साहित नाहीत. मुळात पंचायत समितीला थेट निधी मिळणे दुरापास्त झाले होते. मंत्री मुश्रीफ यांनी पुन्हा सुरुवात केली पण बांधकाम विभागाला त्याचे काहीच वाटत नाही. एका पाणंद रस्त्यासाठी विजय भोसले यांच्यासारख्या कार्यक्षम सदस्याला उपोषणास बसावे लागते. मग इतर भानगडी किती असतील. त्याचीच चर्चा आता रंगली आहे. पंचायत समितीच्या प्रत्येक मासिक बैठकीत बांधकाम उपअभियंता चांदणे यांना धारेवर धरले जाते पण वेळ मारून नेण्याच्या पलीकडे ते काय करत नाहीत. असाच अनुभव आहे.

चौकट..

● पंचायत समितीत महाविकास आघाडी

राज्यात महाविकास आघाडी आता अस्तित्वात आली आहे. पण तीन वर्षांपूर्वी कागल पंचायत समितीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. उपोषण करणारे विजय भोसले खा. संजय मंडलिक समर्थक आहेत. उपोषण सुरू केल्यावर त्यांना तीन दिवसांत पाणंद रस्त्याच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देतो, असे आश्वासन दिले.

● रस्त्यांच्या दर्जाबद्दलही प्रश्नचिन्ह..?

रस्त्यांच्या दर्जाबद्दलही मंत्री मुश्रीफ समर्थक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. प्रशासकीय मंजुरी देणे, कामांचे मूल्यांकन करणे, बिले काढणे, अनामत रक्कम परत देणे, याबद्दल कसे व्यवहार केले जातात. त्याचीही अर्थपूर्ण चर्चा पंचायत समिती वर्तुळात सुरू आहे. निधी जास्त आल्याने काहींना सुचेनासे झाले आहे, असे चित्र आहे.