शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
3
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
4
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
5
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
6
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
7
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
8
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
9
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
10
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
11
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
12
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
13
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
14
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
15
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
16
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
17
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
18
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
19
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
20
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?

‘गडहिंग्लज’मध्ये केंद्रीय प्रवेशाबाबत संभ्रमावस्था ! अकरावी प्रवेश : काही संस्थांचा विरोध,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 11:48 PM

गतवर्षी गडहिंग्लज शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, यावर्षी या प्रक्रियेस काही संस्था चालकांचा विरोध आहे.

ठळक मुद्देपालक-विद्यार्थ्यांची मागणी कायम, प्रशासकीय हालचाली संथ

राम मगदूम ।गडहिंग्लज : गतवर्षी गडहिंग्लज शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, यावर्षी या प्रक्रियेस काही संस्था चालकांचा विरोध आहे. दहावीचा निकाल आज शुक्रवारी जाहीर होत आहे. तरी प्रशासकीय हालचालीदेखील संथगतीनेच सुरू असल्यामुळे गडहिंग्लज विभागात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

परंतु, केंद्रीय प्रवेशाच्या मागणीवर विद्यार्थी व पालक ठाम आहेत. त्यामुळे याप्रश्नी शिक्षण विभाग कोणती भूमिका घेणार याकडे शिक्षणप्रेमींचे लक्ष लागले आहे.कोल्हापुराने राबविलेली केंद्रीय प्रवेश प्रक्रिया गडहिंग्लज शहरातदेखील सुरू करावी अशी मागणी होती. त्यासाठी काही पक्ष-संघटनांनीदेखील आक्रमक भूमिका घेतल्यामुळे शासनाने त्यास मान्यता दिली. त्या पाठोपाठ त्यास स्थगिती आल्याने सामाजिक संघटना पुन्हा आक्रमक झाल्यामुळे मंजुरी मिळालेली केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबविण्यात आली. त्यामुळे तालुकास्तरावर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा राज्यातील पहिला मान गडहिंग्लज तालुक्याला मिळाला. त्याचे राज्यभर कौतुक झाले.

मे मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीतही काही सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी सभापती प्रा. जयश्री तेली यांच्यासह सर्व सदस्यांनी संबंधित संस्थाचालक आणि प्राचार्यांची बैठक बोलावून शासनाकडून मंजुरी मिळालेली केंद्रीय प्रवेशाची कार्यवाही सुरू करण्याची सूचना प्रभारी गटशिक्षणाधिकारी रमेश कोरवी यांनी दिली होती.

दरम्यान, मे महिन्यात संबंधित संस्थाचालक आणि प्राचार्यांची स्वतंत्र बैठक झाल्याचे समजते. मात्र, अद्याप ठोस निर्णय आणि प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही हालचाली सुरू नाहीत. गडहिंग्लजसह आजरा, चंदगड, कागल व भुदरगडसह सीमाभागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी गडहिंग्लजला येतात. मात्र, यावर्षी अकरावी प्रवेशासंदर्भात अद्याप कांहीच हालचाली नाहीत.एकूण प्रवेशक्षमता १,५४०गडहिंग्लज शहरात अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व तुकड्यांत मिळून अकरावी विज्ञान शाखेची प्रवेश क्षमता १,५४० इतकी आहे. गतवर्षी त्यापेक्षाही कमी अर्ज आल्यामुळे लांबलेली केंद्रीय प्रवेश प्रक्रियादेखील सुरळीतपार पडली होती.केंद्रीय प्रवेशाची मागणी का?अकरावी विज्ञानच्या प्रवेशासाठी काही महाविद्यालयात भरमसाट देणगी आणि अवाजवी शैक्षणिक शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्याला आळा बसावा यासाठीच केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची मागणी पुढे आली. परंतु, त्याला खो घालण्याचा प्रयत्न कांहीच्याकडून सुरू आहे. त्यामुळेच प्रशासकीय हालचाली संथगतीने सुरू असल्याची चर्चा आहे. 

गतवर्षी जनतेच्या रेट्यामुळेच अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया मंजूर झाली. यापुढेही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारेच पारदर्शकपणे अकरावीचे प्रवेश दिले जावे, अशी जनतेची मागणी आहे. लोकभावनेचा आदर ठेवून शिक्षण विभागाने यंदाही ही प्रक्रिया तातडीने राबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

- बाळेश नाईक, अध्यक्ष- जनता दल गडहिंग्लज तालुका.

टॅग्स :Studentविद्यार्थीkolhapurकोल्हापूर