शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
6
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
7
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
8
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
9
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
10
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
11
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
12
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
13
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
14
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
15
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
16
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
17
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
18
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
19
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
20
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...

‘गडहिंग्लज’मध्ये केंद्रीय प्रवेशाबाबत संभ्रमावस्था ! अकरावी प्रवेश : काही संस्थांचा विरोध,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:48 IST

गतवर्षी गडहिंग्लज शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, यावर्षी या प्रक्रियेस काही संस्था चालकांचा विरोध आहे.

ठळक मुद्देपालक-विद्यार्थ्यांची मागणी कायम, प्रशासकीय हालचाली संथ

राम मगदूम ।गडहिंग्लज : गतवर्षी गडहिंग्लज शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, यावर्षी या प्रक्रियेस काही संस्था चालकांचा विरोध आहे. दहावीचा निकाल आज शुक्रवारी जाहीर होत आहे. तरी प्रशासकीय हालचालीदेखील संथगतीनेच सुरू असल्यामुळे गडहिंग्लज विभागात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

परंतु, केंद्रीय प्रवेशाच्या मागणीवर विद्यार्थी व पालक ठाम आहेत. त्यामुळे याप्रश्नी शिक्षण विभाग कोणती भूमिका घेणार याकडे शिक्षणप्रेमींचे लक्ष लागले आहे.कोल्हापुराने राबविलेली केंद्रीय प्रवेश प्रक्रिया गडहिंग्लज शहरातदेखील सुरू करावी अशी मागणी होती. त्यासाठी काही पक्ष-संघटनांनीदेखील आक्रमक भूमिका घेतल्यामुळे शासनाने त्यास मान्यता दिली. त्या पाठोपाठ त्यास स्थगिती आल्याने सामाजिक संघटना पुन्हा आक्रमक झाल्यामुळे मंजुरी मिळालेली केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबविण्यात आली. त्यामुळे तालुकास्तरावर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा राज्यातील पहिला मान गडहिंग्लज तालुक्याला मिळाला. त्याचे राज्यभर कौतुक झाले.

मे मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीतही काही सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी सभापती प्रा. जयश्री तेली यांच्यासह सर्व सदस्यांनी संबंधित संस्थाचालक आणि प्राचार्यांची बैठक बोलावून शासनाकडून मंजुरी मिळालेली केंद्रीय प्रवेशाची कार्यवाही सुरू करण्याची सूचना प्रभारी गटशिक्षणाधिकारी रमेश कोरवी यांनी दिली होती.

दरम्यान, मे महिन्यात संबंधित संस्थाचालक आणि प्राचार्यांची स्वतंत्र बैठक झाल्याचे समजते. मात्र, अद्याप ठोस निर्णय आणि प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही हालचाली सुरू नाहीत. गडहिंग्लजसह आजरा, चंदगड, कागल व भुदरगडसह सीमाभागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी गडहिंग्लजला येतात. मात्र, यावर्षी अकरावी प्रवेशासंदर्भात अद्याप कांहीच हालचाली नाहीत.एकूण प्रवेशक्षमता १,५४०गडहिंग्लज शहरात अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व तुकड्यांत मिळून अकरावी विज्ञान शाखेची प्रवेश क्षमता १,५४० इतकी आहे. गतवर्षी त्यापेक्षाही कमी अर्ज आल्यामुळे लांबलेली केंद्रीय प्रवेश प्रक्रियादेखील सुरळीतपार पडली होती.केंद्रीय प्रवेशाची मागणी का?अकरावी विज्ञानच्या प्रवेशासाठी काही महाविद्यालयात भरमसाट देणगी आणि अवाजवी शैक्षणिक शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्याला आळा बसावा यासाठीच केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची मागणी पुढे आली. परंतु, त्याला खो घालण्याचा प्रयत्न कांहीच्याकडून सुरू आहे. त्यामुळेच प्रशासकीय हालचाली संथगतीने सुरू असल्याची चर्चा आहे. 

गतवर्षी जनतेच्या रेट्यामुळेच अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया मंजूर झाली. यापुढेही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारेच पारदर्शकपणे अकरावीचे प्रवेश दिले जावे, अशी जनतेची मागणी आहे. लोकभावनेचा आदर ठेवून शिक्षण विभागाने यंदाही ही प्रक्रिया तातडीने राबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

- बाळेश नाईक, अध्यक्ष- जनता दल गडहिंग्लज तालुका.

टॅग्स :Studentविद्यार्थीkolhapurकोल्हापूर