शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विम्याची बांधकाम कामगारांसाठी कवचकुंडले

By admin | Updated: September 7, 2014 23:20 IST

योजना पूर्ववत : कामगारांचा लढा यशस्वी

म्हाकवे : बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने जीवनदायिनी असणारी आरोग्य विमा योजना गत महिनाभरापासून बंद करण्याचा निर्णय शासनस्तरावर झाला होता. त्यामुळे राज्यातील हजारो कामगारांनी संघटित होऊन प्रशासनाशी लढा दिला. या लढ्याला यश आले असून, ही योजना पूर्ववत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत कामगार वर्गात समाधानाचे वातावरण आहे. ही योजना म्हणजे प्रत्येक कामगाराच्या कुटुंबाची ‘कवचकुंडले’ आहेत. ती शासनाने हिरावून घेऊ नये, अशी भूमिका संघटनेने घेतल्याची माहितीही लाल बावटा कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. भरमा कांबळे आणि शिवाजी मगदूम-सिद्धनेर्लीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.ऊन, वारा, पाऊस यांचा विचार न करता दुसऱ्यांना निवाऱ्याची सोय करून देणारा बांधकाम मजूर मात्र बहुतांश वेळा दारिद्र्याचे जीवन जगत असतो; तर अनवधानाने या मजुराला अपघात झाला अथवा त्याला काही शारीरिक आजार उद्भवला तर त्यातून बरे होण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद नसते. त्यामुळे या मजुरासह त्याच्या कुटुंबाचीही आबाळ होण्याची शक्यता असते. याचा शासनस्तरावर विचार होऊन २५ जुलै २०१३ रोजी बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी वरदान ठरणारी आरोग्य विमा योजना अमलात आणली. या योजनेतून बांधकाम कामगारांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य सुविधा उपलब्ध झाली. त्यामुळे सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत खर्चाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या, परंतु २५ जुलै २०१४ पासून ही योजना बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. याबाबत राज्यातील हजारो कामगारांनी रस्त्यावर उतरून मोर्चे, आंदोलने, निवेदनांच्या माध्यमातून ही योजना पूर्ववत करण्यास भाग पाडले. २२ आॅगस्ट पासून ही योजना पूर्ववत करण्यासाठी लोकप्रतिनिधी, सर्व कामगारांचे सहकार्य लाभल्याचेही संघटनेचे सचिव शिवाजी मगदूम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्ह्यातील ६०० कामगारांना लाभ! शासकीय बांधकामाच्या निधीतून एक टक्का निधी या कामगारांच्या आरोग्यासाठी खर्ची केला जातो. सध्या जिल्ह्यात ३९ हजार कामगारांची नोंद शासनदरबारी असून, या सर्वच कुटुंबांना या योजनांसाठी ‘कवचकुंडलांचे’ अभय मिळणार आहे. वर्षभरात सुमारे ६०० कामगारांच्या आरोग्य सुविधेसाठी शासनाचा सुमारे चार कोटी निधी खर्ची पडला आहे.