शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

Video : भाऊ माझा पाठिराखा... पूरग्रस्त बहिणींनी राखी बांधून केली भावाची पाठवणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 10:03 AM

माध्यमांमध्ये पूराची बातमी झळकताच शासन अन् प्रशासन खडबडून जागे झाले.

ठळक मुद्देमाध्यमांमध्ये पूराची बातमी झळकताच शासन अन् प्रशासन खडबडून जागे झाले.आम्हाला कोल्हापुरात जेवढं प्रेम मिळालं, तेवढ प्रेम आजपर्यंत कुठच मिळालं नाही.

सांगली - कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील पूरस्थिती ओसरल्यानंतर बचावकार्यासाठी तेथे तळ ठोकून असलेले सैन्याचे जवान पुढी मोहिमेवर निघाले आहेत. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पूराच्या पाण्यातून नागरिकांचा जीव वाचिण्यासाठी या जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावली. आपला जीव धोक्यात घालून हजारो माता-भगिनींचे प्राण या बहाद्दरांनी वाचवले आहेत. त्यामुळेच, एक भावनिक नातं कोल्हापूर अन् सांगलीकरांचं या जवानांनी जोडलं गेलंय. म्हणूनच परतीच्या प्रवासाला निघालेल्या जवानांना राख्या बांधून कोल्हापूर अन् सांगलीतील महिलांनी जवानांची पाठवणी केली. 

माध्यमांमध्ये पूराची बातमी झळकताच शासन अन् प्रशासन खडबडून जागे झाले. NDRF आणि सैन्य दलाच्या तुकड्यांनी कोल्हापूर अन् सांगलीत तळ ठोकले. सैन्याच्या जवानांनी पुन्हा एकदा आपला जीव धोक्यात घालून नागरिकांचा जीव वाचवला.मात्र, आपला जीव वाचविणाऱ्या जवानांना कुणी देव म्हटलं, तर कुणी त्यांच्या भावनिक नातंही जोडलं. राखीपौर्णिमेचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे राखी पौर्णिमेच्या अगोदरच माता-भगिनींचा जीव वाचविणाऱ्या जवानांचे आभार कोल्हापूर अन् सांगलीकरांनी मानले आहेत. तर, येथील महिलांनी राखी बांधून तर मातांनी औक्षण करुन या जवानांना निरोप दिला. त्यावेळी, जवानही खूप भावूक झाले होते. 

आम्हाला कोल्हापुरात जेवढं प्रेम मिळालं, तेवढ प्रेम आजपर्यंत कुठच मिळालं नाही. गेल्या 4 ते 5 दिवसांत आमच्या राहण्या-खाण्याची उत्तम सोय तुम्ही केलीत. रात्रीची शांत झोप मिळाल्यामुळेच आम्ही दिवसभर काम करू शकलो, असेही येथून जाताना सैनिकांनी म्हटलंय. भविष्यात हे जवान पुन्हा येतील की नाही हे त्यांनाही माहित नाही. पण, कोल्हापूरकर आणि सांगलीकरांसोबत भावनिक नातं जोडून, या मातीशी एकरुप होऊन हे जवान येथून गेले एवढे निश्चित. कोल्हापूरकरांचा पाहुणचार जगात भारी... असं म्हणतात. सैन्यातील जवानांनाही तोच प्रयत्न येथं आलाय. एवढ्या संकटातही कोल्हापूरकर जवानांचा पाहुणाचार करायला विसरले नाहीत हेही तितकचं खरंय.    

टॅग्स :SangliसांगलीKolhapur Floodकोल्हापूर पूरIndian Armyभारतीय जवानRakhiराखीRaksha Bandhanरक्षाबंधन