शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST

जयसिंगपूर : येथील अकराव्या गल्लीतील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता शोधावा ...

जयसिंगपूर : येथील अकराव्या गल्लीतील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता शोधावा लागत आहे. तर अनेक वाहनांमुळे खड्ड्यातील पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर जात असल्याने वादावादीचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

उसावर तांबेरा

शिरोळ : तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे ऊस पिकावर तांबेरा पडला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. ग्रामीण भागात वैरणीसाठी उसाचा पाला काढला जातो. मात्र, उसावर तांबेरा पडल्यामुळे ओल्या वैरणीचा प्रश्नही उद्भवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.

संभाव्य महापुरामुळे शेतजमीन पडिक

शिरोळ : शिरोळ तालुक्यातील शेती बागायत म्हणून ओळखली जाते. कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा, वारणा या नद्यांमुळे तसेच तालुक्यातील राजाराम, शिरोळ, तेरवाड बंधाऱ्यांमुळे शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होत असते. सध्या पावसाळा सुरू झाला असल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली जमीन रिकामी ठेवली आहे. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर नुकसान होण्यापेक्षा शेतजमीन पडिक ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

जयसिंगपुरात वाहतुकीची कोंडी

जयसिंगपूर : येथील अकराव्या गल्लीला मंडईचे स्वरूप आले आहे. पालिका प्रशासनाकडून वारंवार याठिकाणी सूचना देऊनही भाजीविक्रेते याठिकाणी भाजी विक्रीसाठी बसत आहेत. त्यामुळे या मार्गावर मोठी गर्दी होत आहे. वाहतुकीच्या कोंडीलादेखील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने येथील भाजी विक्रेत्यांना बसण्यास मज्जाव करावा, अशी मागणी होत आहे.