शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Zero Shadow Day : सीमावसियानी अनुभवला शून्य सावली दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 11:22 AM

Zero Shadow Day : मनुष्याची सोबत कोणी करो ना करो त्याची सावली मात्र सदैव त्याच्या सोबत असते. हीच सावली काल दिनांक पाच मे रोजी गायब झाली. अशा या खगोलशास्त्रीय चमत्काराचा अनुभव संपूर्ण सीमावासीयांनी घेतला.

ठळक मुद्देसीमावसियानी अनुभवला शून्य सावली दिवसकुरलीतील सिद्धेश्वर विद्यालयाचा उपक्रम

कोगनोळी : मनुष्याची सोबत कोणी करो ना करो त्याची सावली मात्र सदैव त्याच्या सोबत असते. हीच सावली काल दिनांक पाच मे रोजी गायब झाली. अशा या खगोलशास्त्रीय चमत्काराचा अनुभव संपूर्ण सीमावासीयांनी घेतला.बुधवारी दुपारी 12:29 वाजता काही क्षणापूरती आपली सावली दिसेनाशी झाली. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. विशेष म्हणजे हा अनुभव केवळ कुरली - निपाणी परिसरातील लोकांना घेता आला. कारण खगोलशास्त्राची ही अलौकिक घटना घडण्यासाठी केवळ आज या परिसरातील स्थिती अनुकूल होती.सूर्य डोक्यावर येतो किंवा आला असे आपण म्हणतो पण प्रत्यक्षात दोन दिवस वगळता सूर्य कधीच आपल्या डोक्यावर येत नाही, थोडा ना थोडा तो तिरपा असतोच. तो प्रत्यक्ष डोक्यावर येण्याचे यावर्षीचे दोन दिवस म्हणजे 5 मे आणि 7 ऑगस्ट.

सिद्धेश्वर विद्यालय कुरली येथील विज्ञान शिक्षक एस एस चौगुले यांनी शून्य सावली दिवसाचे शास्त्रीय कारण समजावून सांगितले. आकाशातून सूर्याचे भ्रमण उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे होत असते ज्याला उत्तरायण व दक्षिणायन म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना साडेतेवीस अंशाचा कोन करीत असते.

ज्या दिवशी, ज्या वेळी हा कोन होतो त्या वेळी शून्य सावली दिवस येतो. मजेशीर बाब म्हणजे हा सर्वत्र सारखा नसतो तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागात असतो. विद्यालयातील सर सी व्ही रामन विज्ञान प्रसार नेटवर्क क्लब यांच्या वतीने दरवर्षी शून्य सावली दिवसाचे आयोजन करण्यात येत असते. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांनी याचा घरीच अनुभव घेतला.कुरली परिसरातच सावली का गायब झाली ?कुरलीचे अक्षांश 16.74 अंश उत्तर आहे. सूर्याचा डिक्लीणेशन पॉईंट उत्तरायण किंवा दक्षिणायनामध्ये 16.74 अंश असतो तेव्हा कुरलीत सूर्य डोक्यावर येतो. म्हणजेच दुपारी 12:39 वाजता सूर्याचा डिक्लीणेशन पॉईंट 16.74 अंश असल्याने आज शून्य सावली दिवस अनुभवता आला. विद्यालय परिसरात कोरोना नियमाचे पालन करून शून्य सावली पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी बी एस पाटील, टी एम यादव, एस एस साळवी, के एम शेवाळे, टी के जगदेव,वाय टी पाटील,नवनाथ पाटील,संदिप चौगुले, अथर्व गरगोटे,आदर्श डोंगरे, दिग्विजय यादव, रोहन मस्कर, प्रणित डोंगरे उपस्थित होते. 

टॅग्स :Zero Shadow Dayशून्य सावली दिवसkolhapurकोल्हापूर