शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

काेल्हापूर बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला कोल्हापुरात चांगला प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील व्यवहार बंद राहिल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. शहरातील भाजीमंडईत दिवसभर शुकशुकाट होता. दूध संकलन जरी सुरळीत झाले असले तरी वाहतूक लवकर केल्याने संकलनात घट झाली आहे.

‘बंद’मुळे एरव्ही वाहतुकीची कोंडी असणाऱ्या शहरातील रस्त्यांवरील वर्दळ कमी दिसत होती. खासगी कार्यालये, दुकाने, बंद राहिल्याने महत्त्वाची कामे असणारेच घराबाहेर पडले होते. दोन दिवसांपासून शाळा सुरू झाल्या होत्या; मात्र त्याही बंद राहिल्या. शासकीय कार्यालयासह औद्योगिक वसाहती सुरू असल्या तरी कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी होती. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल आलाच नाही. त्यामुळे भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, गूळ मार्केटमध्ये शुकशुकाट होता. आवक-जावक थांबल्याने साडेचार कोटींची उलाढाल ठप्प झाली. दुधासह जीवनावश्यक वस्तूंना बंदमधून सवलत दिली होती. तरीही ‘गोकुळ’, ‘वारणा’सह इतर दूध संघांनी लवकर संकलन करून वाहने दूध संघात येण्यासाठी प्रयत्न केले. एरव्ही सात वाजता संकलन सुरू होणाऱ्या ठिकाणी साडेपाच वाजताच दूध घेतल्याने संकलन कमी झाले. ‘गोकुळ’चे सकाळच्या पाळीत ५० हजार लिटर, तर ‘वारणा’चे सुमारे पाच हजार लिटर संकलन घटल्याचे सांगण्यात आले. मेडिकल, पेट्रोल-डिझेलचे पंप सुरू असले तरी त्या ठिकाणची उलाढाल कमी झाली. एस. टी. व के. एम. टी.च्या काही बसेस सोडण्यात आल्या; मात्र प्रवासी नसल्याने गाड्या दिवसभर स्थानकातच लावून होत्या. त्यामुळे एस. टी. महामंडळ व के. एम. टी. प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

या दिल्या घोेषणा :

‘जय जवान - जय किसान’, ‘चले जाव, चले जाव, मोदी सरकार चले जाव’, ‘शेतकऱ्यांच्या जिवावर उठणाऱ्या केंद्राचा धिक्कार असो’, ‘कोण म्हणते कायदा रद्द होत नाही, केल्याशिवाय राहत नाही.’

‘नांगर’ आणि काळ्या टोप्या

‘मावळा कोल्हापूर’ संघटनेचे पदाधिकारी ‘लाकडी नांगर’ घेऊनच बिंदू चौकात आल्याने तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षांचे स्कार्फ गळ्यात घातले होते; तर काहींनी काळ्या टोप्या घालून केंद्र सरकारचा निषेध केला.

घोषणांनी बिंदू चौक दणाणला

शिवसेना व डाव्यांचे आंदोलन म्हणजे घोषणांचा अक्षरश: पाऊस असतो. त्यात कॉग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आल्याने बिंदू चौक दणाणून गेला हाेता.

- राजाराम लाेंढे