शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

सावधान, ४३ गावांत पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:17 IST

कोल्हापूर : पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नयेत म्हणून दरवर्षी जून महिन्यात आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने तपासले जातात. या वेळच्या ...

कोल्हापूर : पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नयेत म्हणून दरवर्षी जून महिन्यात आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने तपासले जातात. या वेळच्या अहवालात जिल्ह्यातील ४३ गावांतील पाणी दूषित असल्याचे समोर आले आहे. या गावांतील पिण्याचे पाणी आजारपणाचे कारण ठरू शकते, असे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे.

पिण्याचे पाणी दूषित, गढूळ झाल्यास गॅस्ट्रो, कावीळ, अतिसार, उलटी, पोटाचे विकार असे आजार होतात. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या आजाराचे रुग्ण वाढत असतात. यावेळीही असेच चित्र आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क राहून जनजागृती करीत आहे; पण कोरोनाची लाट अजूनही कायम असल्याने आरोग्य प्रशासनाचे इतर साथीचे आजार, जलजन्य आजार नियंत्रणात आणण्याकडे दुर्लक्ष होत आहे. जून महिन्यात घेण्यात आलेल्या पाणी नमुन्यात ४३ गावांत पिण्याचे पाणी दूषित असल्याचे समोर आले आहे.

१) किती नमुने घेतले तपासणीसाठी? - १०५३

किती गावांतील नमूने दूषित - ४३

२) तालुकानिहाय आढावा

तालुका नमुने घेतले दूषित नमुने आढळले

आजरा ६६ ०

भुदरगड ७७ ८

चंदगड १२२ ६

गडहिंग्लज १२८ ८

कागल ६० ४

हातकणंगले ९० ०

पन्हाळा ६५ ४

राधानगरी ७५ ०

शाहूवाडी १४९ ६

शिरोळ १२२ ३

करवीर ९१ ७

गगनबावडा ८ ०

३) शहरी भागात ४६ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य

गडहिंग्लज, शिरोळसह जिल्ह्यातील विविध शहरांत ४६ ठिकाणचे पिण्याचे पाणी दूषित आहे. त्याठिकाणी शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या सूचना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेस दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची यंत्रणा पाणी शुद्धीकरणासाठीची कार्यवाही करीत आहे.

४) अहवाल मिळण्यास विलंब

गावपातळीवर जलसुरक्षा रक्षक आणि आरोग्य सेवकांतर्फे पिण्याच्या पाण्याचे नमुने घेऊन जिल्हा, गडहिंग्लज, कोडोली, सोंळाकूर, शिरोळ येथील प्रयोगशाळेकडे पाठवले जाते. हे सर्व एकत्र करून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठवले जाते. पण जूनचा अहवाल जि. प. प्रशासनाकडे मिळण्यास विलंब झाल्याने दूषित पाणी असलेल्या गावांत आवश्यक कार्यवाही करण्यास विलंब होणार आहे.

५) आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या !

पावसाळ्याचे दिवस आहेत. काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाण्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. यामुळे शक्यतो पावसाळा जाईपर्यंत पाणी उकळून प्यावे. जलजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी काळजी घ्यावी.

-डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी