शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी जिजाऊंच्या नावाने बाेगस योजनेचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोरोना काळात विधवा झालेल्यांना ५० हजार रुपयांचा लाभ देण्याचे आमिष दाखविणाऱ्या जिजाऊ नावाने योजनेच्या मोबाईलवरील संदेशाने सध्या ...

कोल्हापूर : कोरोना काळात विधवा झालेल्यांना ५० हजार रुपयांचा लाभ देण्याचे आमिष दाखविणाऱ्या जिजाऊ नावाने योजनेच्या मोबाईलवरील संदेशाने सध्या धुमाकूळ घातला आहे. दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, तो गुजरातमध्ये लागतो. त्यामुळे फसवणुकीचे हे नेमके कनेक्शन काय आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. राज्यात शिवसेनेसह महाविकास आघाडीचे सरकार आणि जिजाऊंच्या नावाने योजना असल्याने लोकांना ती खरी आहे, असे वाटत आहे.

महिला बालकल्याण विभागाच्या नावाने बोगस योजनांची माहिती देऊन महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार आतापर्यंत भरपूर झाले आहेत. फसवणुकीबद्दल गुन्हेही दाखल झाले आहेत, तरीदेखील दरवर्षी मोठ्या व्यक्तीचे नाव घेऊन दरवर्षी योजना येते, तसे संदेश मोबाईलवर फिरतात, गावोगावी प्रचार केला जातो. यावर्षीदेखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या चार दिवसांपासून मोबाईलवर जिजाऊंच्या नावाने महिला बालकल्याण विभागाची योजना असल्याचा संदेश फिरत आहे. २१ ते ७० वयोगटातील महिलांना हा लाभ देणार आहे, असे म्हटले आहे. यासाठी १ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत घरातील कर्त्या पुरुषाचे काेरोनामुळे निधन झाले असल्यास त्यांच्या विधवा पत्नींना ५० हजार रुपये दिले जातील, असे म्हटले आहे. संपर्कासाठी ७०१६१६९०४५ हा मोबाईल क्रमांकही दिला असून, पूजा रमेश पाटील ऊर्फ पूजा आकाश ठक्कर यांना संपर्क करावा, असे म्हटले आहे. ‘लोकमत’ने याची शहानिशा करण्यासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला, तर त्याचे लोकेशन गुजरात दाखवते. शिवाय गुजराती ट्यून ऐकू येते. हा फोन स्वीच ऑफ आहे, असे गुजराती, हिंदी व इंग्रजीतून सांगितले जाते. यावरून त्याची बोगसगिरी उघड होते.

चौकट ०१

महिला बालकल्याण विभागाला फुकटचा मन:स्ताप

या योजनेच्याबाबतीत जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे विचारणा करणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. रोज किमान दहाहून जास्त फोन चौकशीसाठी येत आहेत. अशी कोणतीही योजना नाही, ती बोगस आहे, हे सांगण्यातच अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जास्त वेळ जात आहे. काम कमी, मन:स्ताप जास्त, अशी परिस्थिती झाली आहे.

प्रतिक्रिया

अशाप्रकारची कोणतीही योजना राज्य सरकार, महिला बालकल्याण विभाग राबवत नाही. ही योजना पूर्णपणे बोगस आहे. महिलांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.

सोमनाथ रसाळ,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी,

महिला बालकल्याण जिल्हा परिषद, कोल्हापूर.