शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यात खड्डे आणि चर, बाद झाली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 13:59 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : ज्या रस्त्यावरून शेकडो वाहने रोज ये जा करतात, लाखो नागरिक प्रवास करतात ते रस्ते किमान ...

समीर देशपांडेकोल्हापूर : ज्या रस्त्यावरून शेकडो वाहने रोज ये जा करतात, लाखो नागरिक प्रवास करतात ते रस्ते किमान ठाकठीक असावेत अशी अपेक्षा कर भरणाऱ्या नागरिकांनी केली तर त्यात वावगे काहीच नाही. परंतू कोल्हापुरात मात्र रस्त्यावरील खड्डे भरण्यापासून ते चर मुजवण्यापर्यंत इतकी उदासीनता आहे की अनेकांचे कंबरडे ढिले होण्याची वेळ आली आहे.

प्रस्तुत प्रतिनिधीने छायाचित्रकारासह बुधवारी सकाळी अर्ध्या तासात दसरा चौक ते ताराराणी पुतळा असा प्रवास केला. येता जाता केवळ तीन किलोमीटरच्या या रस्त्यामध्ये वाहनधारकांना येणाऱ्या अडचणी पाहिल्या तर त्या दूर करण्यासाठी नेमकी ठोस पावले कधी उचलली जाणार आहेत, असा सवाल उपस्थित होतो.

हॉकी स्टेडियमकडून दसरा चौकात जो रस्ता येतो आणि दसरा चौकातून जो रस्ता व्हीनस कॉनर्रकडे जातो या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी चर मारण्यात आले आहेत. ते मुजवण्यातही आले. परंतु चारच दिवसांत यात खडी अजिबात शिल्लक नाही. त्यामुळे गाड्या दणकतच पुढे न्याव्या लागत आहेत. सरळ खाली येताना पुढेच सुतार मळ्याच्या अलीकडे रस्त्यातच मोठा खड्डा आहे. एखादा वेगात आलेला दुचाकीस्वाराची गाडी या खड्ड्यात गेली तर त्याचा मणकाच मोडेल असा हा खड्डा आहे.

दाभोळकर कॉनर्रकडे जाताना कोरगावकर कंपाऊडसमोर रस्त्यापेक्षा वर आलेली दोन मनहोल आहेत. अशी अनेक ठिकाणी आहेत. ती चुकवण्यासाठी दुचाकीस्वार या बाजुला आणि त्या बाजुला गाड्या घेताना छोटे मोठे अपघात होतच राहतात. दाभाेळकर कॉर्नर ते भूविकास बॅंकेच्या चौकापर्यंत डाव्या बाजुचा रस्ता विभागला गेला आहे. रस्त्याच्या मध्येच असमतोलपणा निर्माण झाल्याने त्यावरून दुचाकी नेताच येत नाहीत.

पाण्याने अडवले निम्मे रस्ते

- रस्त्यावरील पाण्याचा निचरा करायची जबाबदारी महापालिकेची असताना वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी पाणी साठून निम्मा रस्ताच वापरला जात नाही. त्यामुळे सातत्याने त्या त्या परिसरात वाहतुकीची कोंडी होते.- ताराराणी पुतळ्याला वळसा घालून पुन्हा दसरा चौकाकडे येताना लगेचच एका बाजुला एवढे पाणी साठते की हा निम्मा रस्ता पाण्यातच जातो. हाच प्रकार दाभोळकर कॉनर्रवरील सिग्नजवळ दिसून येतो. खड्डे आणि पाणी यातच वाहने उभी केली जातात.- याची पुनरावृत्ती व्हीनर्स कॉनर्रवर होते. येथे तीन महिने रस्ता बंद ठेवून चनेल बांधण्यात आले. परंतु थोड्या पावसानेही येथ पाणी साठते. खड्डेही आहेत. मग हे खड्डे मुजवणार कोण आणि रस्त्यावरील पाणी बाहेर काढायचे कोणी?

शरीराचे आणि गाड्यांचेही नुकसान

शहरातील एका रस्त्यावरील हे चित्र आहे. या चरींमुळे आणि खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होते ते होतेच परंतु शरीराची जी झीज होते. मणक्याला जो दणका बसतो त्याचे नुकसान कशात मोजायचे आणि त्याची भरपाई कोणी करायची. रस्त्यावरील एक चर, एक मोठा खड्डा अनेकांना महिनोमहिने त्रास देत असताना ते मुजवण्याची तत्काळ कार्यवाही का होत नाही याचे उत्तर कोणाकडे नाही.

रस्त्याकडेच्या गाड्यांचे काय?

मुख्य रस्त्याच्या कडेला वाहने लावण्यापेक्षा आतील गल्लीत लावण्याला प्राधान्य देवून तशी व्यवस्था केली गेली तर शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहनधारकांची मोठी सोय होईल. शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर तरी अशा पद्धतीने पर्याय देता येतील का याचा विचार करण्याची गरज आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर