आयुब मुल्ला यांना शासनाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 11:58 AM2024-02-24T11:58:55+5:302024-02-24T12:01:45+5:30

कोल्हापूर : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणारा कोल्हापूर विभागाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार-२०२१ लोकमतचे खोची बातमीदार आयुब आदम ...

Ayub Mulla with vasantrao naik shetimitra award | आयुब मुल्ला यांना शासनाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार

आयुब मुल्ला यांना शासनाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार

कोल्हापूर : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणारा कोल्हापूर विभागाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार-२०२१ लोकमतचे खोची बातमीदार आयुब आदम मुल्ला (लाटवडे ता. हातकणंगले ) यांना शुक्रवारी जाहीर झाला. शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट लेखन करून प्रबोधन केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. १ लाख २० हजार रुपये रोख, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

आयुब मुल्ला हे गेली अनेक वर्षे शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न, उपाय याबाबत सातत्याने लेखन करत आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाधा, नवोदित शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारे लेखन, शासनाच्या विविध योजनांची माहिती, योजनांची अंमलबजावणीवर त्यांचे सातत्यपूर्ण लेखन राहिले आहे. त्याची दखल घेऊन यापूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने त्यांना दोनवेळा गौरवले आहे. कृषी विभागाने त्यांना २०२१ चा कोल्हापूर विभागाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर केला आहे.

Web Title: Ayub Mulla with vasantrao naik shetimitra award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.