शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

'पीएसआय'चा निकाल अडीच वर्षांपासून लटकला, ६०६ उमेदवार हतबल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 1:05 PM

कोल्हापूर : प्रचंड स्पर्धा असतानाही पीएसआयची ( पोलिस उपनिरीक्षक) परीक्षा देत मुलाखतीपर्यंत मजल मारली. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या ...

कोल्हापूर : प्रचंड स्पर्धा असतानाही पीएसआयची (पोलिस उपनिरीक्षक) परीक्षा देत मुलाखतीपर्यंत मजल मारली. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या अडीच वर्षांपासून पीएसआय परीक्षेचा निकालच जाहीर न केल्याने राज्यातील पीएसआयचे ६०६ उमेदवार हतबल झाले आहेत. लटकलेल्या निकालामुळे वाढते वय, लग्नाचा प्रश्न आणि करिअरची पुढची दिशाच कळत नसल्याने या विद्यार्थ्यांवर सैरभैर होण्याची वेळ आली आहे. 

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी २८ ऑक्टोबर २०२१ या दिवशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. याची पूर्व परीक्षा २६ फेब्रुवारी २०२२ व मुख्य परीक्षा ९ जुलै २०२३ रोजी झाली. त्यानंतर दोन महिन्यात शारीरिक चाचणी होणे अपेक्षित होते. मात्र, तब्बल वर्षभराने २ ते १० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत शारीरिक परीक्षा घेतली. त्यानंतर चार महिन्यांनी मुलाखती घेतल्या. मुलाखत झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर करणे गरजेचे होते. मात्र, अद्याप निकाल जाहीर केलेला नाही. 

या पदासाठी अनाथांच्या दोन जागा भरण्याबाबतचे संवर्ग संबंधित प्रकरण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये प्रलंबित आहे. याबाबत सुनावणी होत असली तरी बाजू मांडण्यासाठी त्यांना वारंवार मुदतवाढ मिळत असल्याने पीएसआयच्या ६०६ उमेदवारांचा निकाल लटकवून ठेवला आहे. परीक्षेचा निकाल लांबणीवर जात असल्याने विद्यार्थ्यांचे वय कालबाह्य ठरत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक, आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. इतर परीक्षेवरही त्यांना लक्ष केंद्रित करता येत नाही. विशेष म्हणजे यातील ६०६ पैकी कोल्हापूर जिल्ह्यातील २५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

प्रत्येक टप्प्यात उशीरमुळात परीक्षा झाल्यापासून ते मुलाखतीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आयोगाने उशीर केला आहे. त्यामुळे आयोगास निकाल लावण्यात अडचण येत असली तर अनाथ संवर्गाचा निकाल तात्पुरता बाजूला ठेवून राहिलेल्या संवर्गाचे निकाल जाहीर करावेत किंवा केवळ सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.इतरांना वेतन सुरू झाले, यांचा निकालही नाहीपोलिस उपनिरीक्षक सोबतच राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी या परीक्षा २०२१ मध्येच झाल्या. इतर परीक्षांमधील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळून पगारपण सुरू झाला. मात्र, पीएसआयच्या विद्यार्थ्यांचा अद्याप निकालही जाहीर न झाल्याने असा अन्याय आमच्यावरच का, असा संतप्त सवाल विद्यार्थी करत आहेत.

नातेवाइकांकडून हेटाळणीपरीक्षा होऊन तीन वर्षे होत आली तरी अद्याप निकाल न जाहीर झाल्याने या विद्यार्थ्यांचे कुटुंबही मानसिक तणावात आहे. आधीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजाचे टोमणे खावे लागतात. आता हा निकाल लटकल्यामुळे नातेइकांकडून मुद्दामहून हेटाळणी केली जात असल्याचे एका उमेदवाराने सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMPSC examएमपीएससी परीक्षाPoliceपोलिस