शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

अंबाबाई मंदिर विकास आराखडा दाखवा तरी, सतेज पाटील यांचे पालकमंत्र्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 17:23 IST

'कोल्हापुरातील लोकशाही अबाधित राहण्यासाठी मदत होईल'

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा तयार करण्याचा पालकमंत्री दीपक केसरकर प्रयत्न करत आहेत. हा विकास आराखडा कसा आहे तो दाखवावा, तो तयार करत असताना किमान शहरातील आमदारांना विश्वासात तरी घ्यावे, अशी अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.कोल्हापूरचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला विश्वासात घ्या. कोल्हापुरातील लोकशाही अबाधित राहण्यासाठी मदत होईल, असा टोमणाही त्यांनी पालकमंत्री केसरकर यांना लगावला.मी पालकमंत्री असताना केशवराव भोसले नाट्यगृहात बसून शहरातील नागरिकांना अंबाबाई मंदिर परिसर विकासाची संकल्पना सांगितली होती. त्यांच्याकडून सूचना, हरकती मागविल्या होत्या. पण पालकमंत्री केसरकर नव्याने विकास आराखडा तयार करत आहेत. आम्ही या मातीत जन्मलो आहे. येथील समस्या आम्हाला जास्त कळतात. विकास आराखडा कसा करत आहेत याची माहिती आम्हा आमदारांनाही दिली जात नाहीत. प्रशासनाकडे विचारणा केली तरीही माहिती दिली गेली नाही. त्यासाठी आता तिन्ही आमदारांना लेखी पत्र देण्याची वेळ आली आहे, असे आमदार पाटील म्हणाले.तीन कोटींचे अनुदान रद्दआमदार ऋतुराज पाटील यांनी केएमटीचे बस थांबे विकसित करण्याकरिता तीन कोटींचा निधी आणला होता. परंतु सरकार बदलल्याने हा निधी रद्द करण्यात आला. सरकारनेच रद्द केला असेल तर या गोष्टीला सामोरे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असेही पाटील यांनी सांगितले.

निधी आमचा, तोही देण्यास विलंबकेएमटीकडे नऊ वातानुकूलित बसेस घेण्यासाठी तीन कोटी १५ लाखांचा निधी आम्ही आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करून दिला. ऑक्टोबर २०२२ मध्ये निधी दिल्याने या बसेस मे महिन्यापर्यंत येथील अशी अपेक्षा होती. परंतु हा निधी ट्रेझरीतून मिळत नव्हते. इतकी राज्य सरकारची परिस्थिती वाईट झाली. जो निधी आम्ही दिला तो देण्यासही विलंब लावला गेला, अशा शब्दात राज्य सरकारवर आमदार पाटील यांनी टीकास्त्र सोडले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDipak Kesarkarदीपक केसरकर