शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

‘रेशीम’मधून कोल्हापूर जिल्ह्यातील ८३७ शेतकऱ्यांनी वर्षाला कमावले १२ कोटी 

By भीमगोंड देसाई | Updated: May 14, 2024 13:39 IST

शासनाच्या रेशीम कार्यालयाकडून प्रोत्साहन

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : पारंपरिक शेतीला फाटा देत जिल्ह्यातील ८३७ शेतकऱ्यांनी रेशीम शेती करून त्यातून २०२३-२४ या वर्षात १२ कोटींची कमाई केली आहे. रेशीम निर्मिती करून त्याची प्रतिकिलो ५०० ते ६०० रुपयांनी विक्री केली आहेत. त्यांना शासनाच्या रेशीम कार्यालयांकडून प्रोत्साहन मिळत असून त्यांना गरजेनुसार अनुदानावर अंडीपुंजाचा पुरवठा केला जात आहे.राज्यातील एकमेव अंडीपुंज निर्मिती केंद्र गडहिंग्लजला असल्याने जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेती करीत आहेत. सध्या करवीर, हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यातील ८३७ शेतकऱ्यांनी ८३५ एकर जमिनीवर रेशीम निर्मितीसाठी तुतीच्या वनस्पतीची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांना या वर्षी ३ लाख ४९ हजार ४१० अंडीपुजांची वितरण शासनाच्या रेशीम कार्यालयाकडून करण्यात आले आहे.एक किलोला ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान अंडी पुजांसाठी देण्यात आले आहे. इतके अंडीपुंजा घेऊन ८३७ शेतकऱ्यांनी २ लाख २६ हजार ७०७ रेशीम कोषचे उत्पादन केले. ५०० ते ६०० रुपये किलो दरानी खुल्या बाजारात त्याची विक्री केली. यातून त्यांना एकूण १२ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढल्याचा दावा रेशीम कार्यालयाचा आहे.

- रेशीम शेतीसाठी किती अनुदान मिळते?रोजगार हमी योजनेतून एक एकरसाठी ४ लाख १८ हजार तर सिल्क समग्र योजनेतून ३ लाख ७५ हजार रुपये अनुदान मिळते. अनुदान मिळण्यासाठी पहिल्यांदा शेतकऱ्याला जून, जुलै महिन्यात तुतीची लागवड लागेल. त्यानंतर अंडी पुंजापासून रेशीमनिर्मितीसाठी ५० बाय २२ इतका शेड उभारावा लागणार आहे. यासाठी शेतकऱ्याला सुरुवातीला स्वत:कडून पैसे गुंतवावे लागणार आहे. त्यानंतर पात्र ठरल्यानंतर अनुदान मिळू शकते. रोजगार हमीचे अनुदान त्या त्या वेळी मजुरांच्या नावे जमा होते.

अनुदानासाठी अर्ज कोठे करावा?रेशीम कार्यालय, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर.

एकरी उत्पन्न किती मिळू शकते?रेशीम शेतीतून एक एकरमध्ये कमीत कमी खर्च वजा जाता दोन लाखांचे उत्पन्न वर्षाला मिळू शकते. जोडधंदा म्हणून करता येते. रेशीमला मागणी चांगली असल्याने बाजारपेठ शोधण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाही.

- तालुकानिहाय रेशीम उत्पादक शेतकरी संख्या अशीकरवीर :१२७हातकणंगले : ८४गडहिंग्लज : ६२७

रेशीम शेतीतून चांगले उत्पन्न मिळते. बाजारपेठही सहज उपलब्ध आहे. रेशीम उत्पादनासाठी अनुदानही मिळते. म्हणून याकडे शेतकऱ्यांनी वळावे. - राजेश कांबळे, रेशीम विकास अधिकारी, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी