शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

६७३ शेतकरी कुटुंबाना विमा योजनेचा ‘हात’भार

By admin | Updated: August 24, 2014 22:36 IST

जिल्ह्यातील सहा वर्षातील चित्र : ६ कोटी ७३ लाखांचा निधी

दत्तात्रय पाटील -म्हाकवे --वाढत्या महागाईने रोजच्या मीठ-भाकरीची जुळवाजुळव करताना दमछाक होणाऱ्या आणि हाता-तोंडाशी गाठभेट होणे मुश्किल झालेल्या शेतकरी कुटुंबातील कर्त्याचा अपघाता मृत्यू झाल्यास अशा कुटुंबावर आकाशच कोसळते. मात्र, या आर्थिक संकटरुपी आकाशाला ढिगळ लावण्याच्या उद्देशाने गेल्या सहा वर्षांपासून शासनाने शेतकरी जनता अपघात विमा योजना सुरु केली.गेल्या सहा वर्षांत अपघाती मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील ८७४ शेतकऱ्यांपैकी तब्बल ६७३ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांप्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना शेतकरी कुटुंबियांसाठी वरदान ठरणारी असून यामुळे जिल्ह्याला ६ कोटी ७३ लाखांचा निधी मिळाला आहे.जगाचा पोशिंदा असणारा आणि ‘ओ’ रक्तगट प्रमाणे कार्य करणाऱ्या बळीराजाला कठीण प्रसंगाला स्वत:च तोंड द्यावे लागते. एखादं संकट वादळ बनून आलंच तर अशावेळी त्याला कोणीही मदतीचा हात देत नाही, किंबहूना शासकीय धोरणातही त्याच्या मदतीची फारशी तजबीज नव्हती. यामुळे कुटुंबाची वाहताहती होऊ शकते, भारनियमनामुळे रात्री अपरात्री शेतीला पाणी देताना साप-विंचवाच्या दंशाने मृत्यू झाल्यास किंवा शेतात वैरण काढताना, झाडांच्या फांद्या तोडताना किंवा शेतीची अन्य कामे करताना हात, पाय, डोळा अथवा अन्य अवयवाला इजा झाल्यास त्या शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर येते. किंबहूना यामुळे कुटुंबाची परवड होऊ नये यासाठी शेतकरी जनता अपघात विमा योजना अंमलात आणली.विमा कंपनीकडे आर्थिक मदतीसाठी मृत शेतकऱ्यांचा प्रस्ताव सादर केला जातो. त्याप्रमाणे गत वर्षांत विविध कारणाणी अपघाती मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील ८७४ शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविले होते. मात्र, काही अपुऱ्या कागदपत्रामुळे जवळपास १७३ शेतकरी कुटुंबियांना विमा भरपाई मिळालेली नाही. तर ६७६ शेतऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखाचा धनादेश घरपोहच देण्यात आला आहे. यामुळे ६ कोटी ७३ लाखांचा निधी जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबियांना मिळाला असून ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदायी ठरली आहे.