शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील गावठाण वाढीचा मोठा अडसर दूर, दोनशे मीटरचे क्षेत्र बिगरशेती; पालकमंत्र्यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 12:18 IST

१ नोव्हेंबरपर्यंत रेखांकन होणार : तुकडेबंदी कायदा रद्द, 

कोल्हापूर : गाव, नगरपालिका, महापालिकेच्या मूळ हद्दीपासून २०० मीटरचे रेखांकन पूर्ण करून त्याबाबतची स्पष्टता १ नोव्हेंबरपूर्वी द्यावी, असे निर्देश भूमी अभिलेख विभागाला दिले असून, यामुळे गावठाण वाढीचा अडसूर दूर होऊन नागरिकांची बांधकाम परवान्यासह इतर अडचणींपासून सुटका होणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.मंत्री आबिटकर म्हणाले, बिगरशेती जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आला असून, शहरी भागात एक गुंठ्यापर्यंतच्या जमिनींचे लहान तुकडे खरेदी-विक्रीसाठी कायदेशीररित्या ग्राह्य ठरतील. अशा प्रकारच्या खरेदीच्या दस्त नोंदणीसाठी तलाठी जाणीवपूर्वक विलंब करत असतील तर थेट जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री कार्यालयाशी संपर्क साधावा.कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांच्या कामांची चौकशी होणार असून, यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर ते गगनबावडा महामार्गाबाबत अनेक तक्रारी आहेत. त्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे.वनहक्क दावे निकालात काढणारप्रातांधिकाऱ्यांच्या पातळीवर वनहक्क दावे प्रलंबित आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा वन अधिकाऱ्यांना कालबद्ध कार्यक्रम दिला असून, प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेऊन संपूर्ण प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना दिल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

हमीभाव केंद्रांची संख्या वाढवणारजिल्ह्यात हमीभाव केंद्रांना शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. भाताला २३६९, नाचणीला ४८८६, सोयाबीनला ५३२८ रुपये आधारभूत किंमत आहे. मात्र, त्यापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांकडून खरेदी होते. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवणार आहे. त्याबाबत ‘पणन’ विभागाला सूचना दिल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

‘देवस्थान’ला जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अध्यक्ष मिळेल

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला यापूर्वीच अध्यक्ष मिळायला हवा होता. मात्र, काही अडचणीमुळे हा निर्णय होऊ शकला नसला तरी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीनंतर ‘देवस्थान’ला अध्यक्ष मिळेल, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.गायरानवरील घरांबाबत सकारात्मक निर्णयगायरान जमिनी सार्वजनिक वापराशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी देऊ नयेत, असे आदेश २००४ साली सर्वोच्च न्यायालयाने दिले. राज्य शासनाने २०१३ पूर्वीची गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकुलित करण्याबाबत निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात उच्च न्यायालयाने ही अतिक्रमणे काढून टाकण्याचे आदेश दिले. पण, राज्य शासनाचे न्यायालयीन पातळीवर प्रयत्न सुरू असून, याबाबतही सकारात्मक निर्णय होईल, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

पालकमंत्री काय म्हणाले 

  • अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.
  • अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यातील कामांना गती देणार.
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Gaothan Expansion Obstacle Removed; 200-Meter Area Non-Agricultural

Web Summary : Kolhapur's Gaothan expansion faces smooth path as 200-meter area is now non-agricultural. Land division law amended, benefiting small land transactions. Road work inquiries initiated, and pending forest rights claims to be resolved promptly. More crop procurement centers will be established.