शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

१९३ शाळाबाह्य मुले मुख्य प्रवाहात

By admin | Updated: September 7, 2014 23:25 IST

शिक्षण विभागाची मोहीम : दहा वर्षांत साक्षरता पाच टक्क्यांनी वाढली

अंजर अथणीकर-- सांगली --शाळेपासून एकही मूल वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे काम सध्या शिक्षण विभागाकडून सुरू आहे. शाळेत गैरहजर असलेली १९३ मुले शोधून त्यांना आॅगस्टपासून विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या दहा वर्षात जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले आहे. विशेष म्हणजे महिला साक्षरतेचे प्रमाण अधिक वाढत आहे. शिक्षण विभागाने जून ते आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात शाळाबाह्य असणाऱ्या मुलांची शोधमोहीम राबविली. यात सहा ते चौदा वर्षे वयोगटातील १९३ मुले सतत गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यानंतर शिक्षकांना त्या मुलांच्या घरी जाऊन पुन्हा त्यांना शाळेत येण्यासाठी विनंती करावी लागली. त्यांच्या समस्या दूर करून त्यांना त्या त्या वर्गात ‘विद्यार्थीमित्र’ प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आॅगस्टपासून या प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली असून, आता हे प्रशिक्षण तीन महिन्यात संपविण्यात येणार आहे. त्यानंतर या मुलांचा इतर मुलांबरोबर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दररोज जादा दोन तासांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. येत्या तीन महिन्यात हे विद्यार्थी शाळेच्या मुख्य प्रवाहात सामील होणार आहेत. सांगली जिल्ह्याची साक्षरता गेल्या दहा वर्षांत पाच टक्क्यांनी वाढली आहे. दहा वर्षापूर्वी सांगली जिल्ह्याची साक्षरता ७६.६२ टक्के होती, ती आता ८१.४८ टक्के झाली आहे. सध्या पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण ८८.२२ टक्के, तर महिलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण ७४.५९ टक्के आहे. दहा वर्षांपूर्वी पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण ८६.२६, तर महिलांमध्ये ६६.७३ टक्के होते. जिल्ह्यातील साक्षर लोकसंख्या २० लाख ४९ हजार ४६७ असून, दहा वर्षापूर्वी साक्षर लोकसंख्या १७ लाख १७ हजार ८३६ होती. २७५ मुले बालकामगार शाळेतवीटभट्टी, बांधकाम क्षेत्र, चहाच्या टपऱ्या येथे आढळणारे बालकामगार शोधून त्यांना शिक्षण देण्याची मोहीम राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प विभागाने सुरू केली आहे. जिल्ह्यात दोन वर्षापासून नऊ बालकामगार शाळा सुरू करण्यात आल्या असून यामध्ये २७५ मुले शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह अनेक भत्तेही देण्यात येतात. काही ठिकाणी त्यांच्या राहण्याचीही सोय करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात साक्षरतेचेही प्रमाण वाढत आहे. शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये, याची दक्षताही घेण्यात येत आहे.गेल्या दहा वर्षात महिलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक गतीने वाढले आहे. २००१ च्या जनगणनेत महिला साक्षरतेचे प्रमाण ६६.७३ टक्के होते, ते आता आठ टक्क्यांनी वाढून ७६.६२ टक्के झाले आहे. पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण दहा वर्षांत केवळ दोन टक्क्यांनी वाढले आहे. दहा वर्षांपूर्वी पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण ८६.२६ टक्के होते, तर आता ते ८८.२२ टक्के आहे.