शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योगाचे १२०० कोटींचे प्रस्ताव फेटाळले

By admin | Updated: August 25, 2014 00:20 IST

सहकारी संस्थाचालकांमध्ये खळबळ : पूर्वीची थकबाकी ठरतेय अडसर

राजाराम पाटील - इचलकरंजी --नवउद्योजकांना व्यवसायाची संधी देणारे आणि त्यातून रोजगार उपलब्ध करणारे वस्त्रोद्योगाच्या वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे १२०० कोटी रुपयांचे प्रस्ताव राज्य शासनाने फेटाळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीच्या सुमारे दोनशे संस्थांकडे साडेतीनशे कोटी रुपयांची थकबाकी असल्याने नवीन प्रस्ताव नाकारल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.सन १९९६-९७ मध्ये तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारच्या कालावधीत यंत्रमाग सहकारी संस्थांचे प्रस्ताव मंजूर करण्यास सुरुवात झाली. संस्थांसाठी ८० टक्के राष्ट्रीय सहकार विकास निगम, १० टक्के राज्य शासन व १० टक्के स्वभागभांडवल असा पॅटर्न असून, त्यावेळी साध्या यंत्रमागांच्या संस्था स्थापित झाल्या. त्यानंतर सायझिंग व कापडावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांच्या संस्थाही निर्माण झाल्या.अशा प्रकारच्या संस्था स्थापित करण्याचे आकर्षण नवउद्योजकांत मोठ्या प्रमाणात वाढले. यंत्रमागांबरोबर आॅटोलूम, प्रोसेसर्स याच्या सहकारी संस्था स्थापित करण्याचे पेव फुटले. संस्थांचे प्रस्ताव तयार करणारे काही एजंट निर्माण झाले. काही संस्थाचालकांनी संस्थांचे मंजुरी प्रस्ताव काही लाखांना विकले. त्याच दरम्यान, मागासवर्गीय सहकारी संस्था निर्माण करण्याचा सपाटा सुरू झाला. वस्त्रोद्योगाबरोबरीने शेती माल प्रक्रिया संस्थाही स्थापित झाल्या. ज्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत गुंतला आहे.सहकारी संस्थांसाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून ८० टक्के भांडवल मिळताना राज्य शासन हमी देते. संस्थेमध्ये उत्पादन चालू झाल्यानंतर राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या अर्थसाहाय्याचा हप्ता भरला पाहिजे, अशी अट असूनसुद्धा काही संस्थांनी निगम व शासनाच्या भागभांडवलाचे हप्ते भरले नाहीत. त्यामुळे कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील अशा सहकारी संस्थांकडे सुमारे तीनशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. अशा पार्श्वभूमीवर आॅटोलूम, नेटिंग-गारमेंट व प्रोसेसर्सच्या संस्थांचे अनेक प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यामध्ये काही अल्पसंख्याक व मागासवर्गीय संस्थांचाही समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी संस्थांचे प्रस्ताव मंजूर करून राष्ट्रीय सहकार विकास निगमकडे पाठवावेत, यासाठी संस्थाचालकांनी शासन दरबारी दबाव निर्माण केला होता; पण ४६८ संस्थांचे सुमारे १२०० कोटी रुपयांचे प्रस्ताव शासनाने फेटाळल्याने संस्थाचालकांत जोरदार खळबळ उडाली आहे.