शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

चिमुरड्यांसाठी 'ते' ठरले देवदूत; शहर पाण्यात असताना भूकेनं व्याकूळ चिमुकल्यांपर्यंत पोहोचवलं दूध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 12:16 AM

कल्याणच्या तरुणांचं होतंय कौतुक; कमरेइतक्या पाण्यातून वाट काढत चिमुकल्यांपर्यंत पोहोचवलं दूध

- मयुरी चव्हाण

कल्याण: संकट कोणतंही असो... कोणत्याही यंत्रणांच्या अखत्यारितलं असो... सर्वात आधी धावून जाते ती माणुसकीची यंत्रणा... अर्थात असं नेहमी बोललं जातं की चांगली माणस आहेत म्हणूनच  माणुसकी अजून जिवंत आहे.. याचाच प्रत्यय आज कल्याणमध्ये आला.. कल्याण डोंबिवली शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. मदतकार्य सुरू होतं आणि या सर्व कठीण परिस्थितीत कल्याणमधील खरे कुटुंब दुधाच्या शोधात होतं. घरातील दोन चिमुकल्या बाळांना भूक लागली होती. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांना आईच दूधही द्यायचं नव्हतं. त्यामुळे खरे कुटुंबियांची दुधासाठी शोधाशोध सुरू झाली. बाहेर पाणी आणि घरात चिमुकल्यांच्या भुकेची काळजी. जवळची दुकान बंद होती. दूध न मिळाल्यानं  चिमुकली रडू लागली. त्यांच्या रडण्याचा आवाज कल्याणमधील युवकांच्या कानी पडला आणि क्षणाचाही विलंब न करता ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कोणतंही वाहन उपलब्ध होत नसताना, कमरेभर पाण्यातून वाट काढत ते दूध घेऊन खरे कुटुंबियापर्यंत पोहचले आणि अखेर चिमुकल्याचा आजोबांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. 

कल्याण नजीक असलेल्या शहाड परिसरातील साई धाम सोसायटीत राहणाऱ्या खरे कुटुंब राहते. गुरुवारी या परिसरात सुद्धा पाणी साचले होते. घरातील दोन चिमुकल्याना भूक लागली होती. देवांश आणि सारांश हे दोघेही जुळे भाऊ असून नुकतच त्यांना एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांची आई  ईशा खरे यांना एप्रिल महिन्यात कोरोना झाला होता. त्यामुळे तुर्तास आईचे दूध न पाजण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. तसेच मुलांचा काहीसा लवकर जन्म झाला असल्याने त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. गुरुवारी दोघांनाही भूक लागली. घरातील सर्व दूध संपलं. बाहेर पुरजन्य परिस्थिती. त्यात भुकेनं चिमुकल्यांचं रडणं ऐकून आजी आजोबांचा जीवही कासावीस झाला. घरात दुसरं कोणी नाही. वडील गौरव खरे हे सुद्धा पाण्यामुळे बाहेर अडकून बसले होते. अशातच बाळांची आत्या संगीता खरे  यांनी कल्याणातील युवक महेश बनकर या तरुणाला मदतीसाठी फोन केला. क्षणाचाही विलंब न लावता दूध घेऊन आधारवाडीहुन शहाडच्या दिशेने निघाले. बिर्ला कॉलेजपासून पुढे पाणी साचल्यानं पायीच वेगवेगळे रस्ते शोधत, पाण्यातून वाट काढत महेश आणि  त्याचे मित्र साई धाम सोसायटीत पोहचले आणि दूध बाळांच्या आजोबांकडे सुपूर्द केले. या कठीण परिस्थितीत जीवाची बाजी लावून केवळ दोन लहानग्यांसाठी तरुणांनी केलेली मदत पाहून ते भारावून गेले. महेश आणि त्याच्या मित्रांनी दाखविलेल्या या माणूसकीचे  कौतुक होत असून असे तरुण इतर तरूणांसाठीही आदर्श ठरत आहेत.