शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जागतिक जल दिन निमित्त विद्यार्थ्यांनी काढली जलदिंडी

By अनिकेत घमंडी | Updated: March 22, 2024 11:47 IST

टिळकनगर विद्यामंदिरच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे  विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच वरील सर्व संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अनिकेत घमंडी, डोंबिवली: जागतिक जल दिन निमित्त विद्यार्थ्यांनी काढलेल्या  जलदिंडीमध्ये शेकडो मुले सहभागी झाली होती. पाणी बचतीचा संदेश त्यांनी दिला. टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली, पर्यावरण दक्षता मंडळ, डोंबिवली, श्री लक्ष्मी नारायण संस्था, ऊर्जा फौंडेशन आणि विवेकानंद सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  जलदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. टिळकनगर विद्यामंदिरच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे  विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच वरील सर्व संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री लक्ष्मी नारायण संस्थेच्या सुरेखा जोशी, पर्यावरण दक्षता मंडळाचे मेधा वैद्य, उज्वला केतकर, आदित्य कदम, समीक्षा चव्हाण, रूपाली शाईवाले, ऊर्जा फौंडेशनच्या स्नेहल दीक्षित, मेधा गोखले, प्रिया राणे, गीता शेट्टीगर तसेच विवेकानंद सेवा मंडळचे सचिव अनिल मोकल आणि सारिका परब ही कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमासाठी टिळकनगर विद्यामंदिरचे पर्यवेक्षक एस चौधरी  आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विदुला साठे यांचा सक्रिय सहभाग आणि सहकार्य मिळाल्याचे सांगण्यात आले.

जलदिंडी मध्ये परंपरागत पद्धतीने पालखी, अब्दागिरी, झांज पथक, झेंडे पथक तैनात होते. टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली तसेच पारंपरिक वेशातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि पर्यावरण विषयी संवेदनशील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला. पाणी  बचतीचे महत्व विषद करणारे फलक अनेकांच्या हातात झळकत होते. या वर्षीची जलदिनाची मध्यवर्ती संकल्पना शांततेसाठी पाणी ही असून या पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांचा पाण्यावर समान हक्क आहे. बचत पाण्याची, गरज काळाची; पाणी अडवा, पाणी जिरवा; स्वच्छ पाणी, सुंदर परिसर, आरोग्य राहील तुमचे निरंतर इत्यादि घोषवाक्यांनी टिळकनगर परिसर दुमदुमून गेला. टिळकनगर विद्यामंदिर मधील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी जल प्रतिज्ञा घेतली, पाण्याचे संवर्धन, संरक्षण तसेच नैसर्गिक जलस्त्रोताचे रक्षण करण्यासाठी आपण सर्व देखील कटिबद्ध राहुया असेही आवाहन करण्यात आले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली