शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

रेल्वेने बजाविलेल्या नोटिसांच्याविरोधात हायकोर्टात जाणार, माजी नगरसेवक नितीन निकम यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 20:21 IST

Former Corporator Nitin Nikam warns : रेल्वेने नागरीकांना बजाविलेल्या नोटिसांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल करणार असल्याचा इशारा मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी दिला आहे. 

कल्याण - सर्वोच्च न्यायालयाने सरकारी जमीनीवरील अतिक्रमणो हटविण्याचे आदेश दिल्याने मध्य रेल्वेनेकल्याण येथील रेल्वेच्या जागेवरील वास्तव करणा:या नागरीकांना नोटिसा बजावल्या आहे. रेल्वेने नागरीकांना बजाविलेल्या नोटिसांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल करणार असल्याचा इशारा मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी दिला आहे. 

कल्याण पूर्व भागातील रेल्वेच्या जागेतील जवळपास हजारो नागरीकांना रेल्वे प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या जागेत नागरीक गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य करुन आहेत. ते कर भरतात. वीज बील आणि पाणी बील भरतात. साठ दिवसाच्या आत त्यांनी त्यांची घरे खाली करण्याची नोटिस न्यायालयाचा हवाला देत रेल्वेकडून बजावण्यात आली आहे. या नोटिसांच्या विरोधात नागरीक एकत्रित जमले होते. त्याठिकाणी माजी नगरसेवक निकम आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी धाव घेतली. नागरीकांच्या हाती नोटिसा पाहून हे नगरसेवक हवालदिल झाले आहे. कोरोनातून सामान्य नागरीक आत्ता  कुठे सावरत असताना त्याला घर खाली करण्याची नोटिस बजावल्याने नागरीकांनी जायचे कुठे असा संतप्त सवाल निकम यांनी उपस्थीत केला आहे.

या प्रकरणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडेहा विषय मांडण्यात येणार आहे. कारण खासदारांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे बैठकीची मागणी केली आहे. दानवे यावर काय निर्णय घेतातत याकडे सगळ्य़ाचे लक्ष लागले असले तरी रेल्वेने या नागरीकांचे पुनर्वसन केले पाहिजे. रेल्वेच्या जागेतील नागरीकांना हटविण्यासंदर्भात यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबत बैठक घेतली होती. रेल्वेच्या जागेतील बाधितांना एसआरए योजनेत समाविष्ट करण्याचा धोरणात्मक निर्णय झाल्याचा दाखला माजी नगरसेवक निकम यांनी देत कल्याणमधीलही नागरीकांच्या पुनर्वसनासाठी एसआरए योजना राबवून त्यांचे पुनर्वसन करावे. मध्य रेल्वेने विविध ठिकाणी प्रवाशांच्या सोयी सुविधाकरीता प्रकल्प राबवित आहे. काही ठिकामी होम प्लॅटफॉर्म विस्तारीत केले जात आहे. कल्याण रेल्वे स्थानकाचे तर रिमॉडेलिंग होणार आहे. त्यासाठी या जागा खाली करण्याकरीता रेल्वेने नोटिसा पाठविल्या आहेतत. रेल्वेच्या विकास कामाला विरोध नाही. पण आधी पूनर्वसन करा. मगच प्रकल्प राबवा अशी नागरीकांची भूमिका आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयkalyanकल्याणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयrailwayरेल्वे