शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

अखेर सायंकाळनंतर का केलं जात नाही मृतदेहाचं पोस्टमार्टम? वाचा काय आहे कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 2:53 PM

मृतदेहांचं पोस्टमार्टम सायंकाळनंतर केलं जात नाही. पण असं का? का सायंकाळनंतर मृतदेहांचं पोस्ममार्टम केलं जात नाही? चला आजू याचं उत्तर आणि कारण जाणून घेऊ.

आपल्या आजूबाजूला नेहमीच अशा घटना घडत असतात, ज्यांबाबत आपण नेहमीच ऐकत-बघत असतो. काहीवेळा आपल्याला या घटनांबाबत अनेकदा माहिती मिळते, तर अनेकदा त्यांची माहिती रहस्य बनून राहते. आज आम्ही तुम्हाला एका अशाच विषयाबाबत माहिती देणार आहोत. हे सर्वांनाच माहीत आहे की, मृत्यूनंतर मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जातं. अपघातात मृत्यू झाला असेल किंवा हत्या झाली असेल. त्यांचं पोस्टमार्टम केलं जातं. पण मृतदेहांचं पोस्टमार्टम सायंकाळनंतर केलं जात नाही. पण असं का? का सायंकाळनंतर मृतदेहांचं पोस्टमार्टम केलं जात नाही? चला आजू याचं उत्तर आणि कारण जाणून घेऊ.

काय आहे याचं कारण

इथे हे समजून घेणं फार गरजेचं आहे की, पोस्टमार्टम एकप्रकारचं ऑपरेशनच आहे. याद्वारे मृतदेहांचं परीक्षण केलं जातं. पोस्टमार्टम करून हे जाणून घेतलं जातं की, व्यक्तीचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला. मीडिया रिपोर्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होत असेल तर मृत्यूनंतर सहा ते १० तासांच्या आत पोस्टमार्टम करणं अनिवार्य आहे. कारण उशीर झाला तर मृतदेहांमध्ये नैसर्गिक बदल होऊ लागतात. असंही सांगितलं जातं की, सायंकाळनंतर मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जात नाही कारण लाइटच्या प्रकाशात व्यवस्थितपणे परीक्षण केलं जात नाही.

हे आहे महत्वाचं कारण

ट्यूबलाइट, एलईडी किंवा बल्बमध्ये जखमेचा रंग लाल ऐवजी जांभळा दिसू लागतो. तर फॉरेन्सिक सायन्समध्ये या रंगाच्या जखमेचा काहीच उल्लेख नाही. असं मानलं जातं की, जर जखमेचा रंग लाल ऐवजी आणखी कोणता दिसत असेल तर त्या रिपोर्टला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं. त्यामुळे कधीही सायंकाळनंतर मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जात नाही. कारण त्यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. असं काही होऊ नये किंवा रिपोर्टमध्ये काहीहीच चूक राहू नये म्हणून हे केलं जातं.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके