शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

काय असतो पकडौआ विवाह, ज्याच्या भीतीने लग्नाच्या सीझनमध्ये तरूण घरातून बाहेर निघत नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:32 IST

आपल्या बहिणीला सासरी सोडायला गेलेल्या तरूणाचं लग्न जबरदस्ती त्याच्या बहिणीच्या नंदेसोबत लावून देण्यात आलं. बहिणीच्या सासरचे लोक मुलीच्या लग्नावरून अनेक वर्षापासून चिंतेत होते.

(Image Credit : Twitter)

असं म्हणतात की, जोड्या स्वर्गातच बांधलेल्या असतात. पण बिहारमधील लोक पृथ्वीवरच जोड्या बनवतात. त्याही जबरदस्तीने. समस्तीपूरच्या मोरवामध्ये एका तरूणाची जोडी बनवण्यात आली. हा तरूण आपल्या बहिणीला तिच्या सासरी सोडायला गेला होता. पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की, त्याच्या बहिणीचं सासर हे त्याचंही सासर बनेल.

जबरदस्ती करण्यात आलं लग्न

आपल्या बहिणीला सासरी सोडायला गेलेल्या तरूणाचं लग्न जबरदस्ती त्याच्या बहिणीच्या नंदेसोबत लावून देण्यात आलं. बहिणीच्या सासरचे लोक मुलीच्या लग्नावरून अनेक वर्षापासून चिंतेत होते. सगळेजण मोठा हुंडा मागत होते. अशात त्यांना त्यांच्या सूनेच्या भावाच्या रूपात मुलीचा नवरदेव दिसला. मग त्याला पकडून मंदिरात त्याचं लग्न लावून देण्यात आलं.ही घटना दलसिंह सरायच्या साठा येथील रहिवाशी विनोद कुमारसोबत घडली. जेव्हा तो त्याच्या बहिणीला सासरी सोडण्यासाठी गेला तेव्हा तिच्या सासरच्या लोकांनी त्याला पकडून एका मंदिरात त्याचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं.

तरूणाच्या मर्जीशिवाय त्याला नवरदेव बनवून तरूणीसमोर उभं केलं. नंतर जबरदस्ती एकमेकांना हार घालण्यात आले. मग त्याच्याकडून तरूणीची भांग कुंकवाने भरण्यात आली. लग्नानंतर विनोद कुमार म्हणाला की, त्याचं लग्न त्याच्या मर्जीशिवाय जबरदस्ती लावून देण्यात आलं.

लग्नाचा व्हिडीओ व्हायरल

या जबरदस्ती लावण्यात आलेल्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत जबरदस्ती तरूणाचा हात पकडून हार घालण्यात आले. व्हिडीओ बघितलं जाऊ शकतं की, यादरम्यान तरूणी गपचूप त्याच्या बाजूला उभी होती. एकीकडे तरूण सांगतोय की, त्याचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं. तर मुलीच्या लोकांकडून सांगण्यात आलं की, तरूण जेव्हाही त्याच्या बहिणीला सोडण्यासाठी सासरी येत होता तेव्हा तो लपून लपून मुलीला भेटत होता. दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. त्यामुळे परिवाराने दोघांचं लग्न लावून दिलं.

काय असतं पकडौआ लग्न?

अशाप्रकारच्या लग्नाला पकडौआ विवाह म्हटलं जातं. एक काळ असा होता जेव्हा बिहारमध्ये जबरदस्ती अशी लग्ने नेहमीच होत होती. पकडौआ विवाहात एखाद्या तरूणाचं आधी अपहरण केलं जात होतं आणि मग घाबरवून जबरदस्ती त्याचं लग्न लावून दिलं जात होतं. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, ८०च्या दशकात बिहारच्या अनेक भागात अशा लग्नांचं फार चलन होतं. अशा लग्नांची झलक काही सिनेमांमध्येही बघायला मिळते.

रिपोर्ट्सनुसार, एक काळ असा होता जेव्हा गावांमध्ये अशी लग्ने लावली जात होती. त्यासाठी अनेक लोकांच्या गॅंग असायच्या. या गॅंग इंटरची परीक्षा देणारे विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या तरूणांचं लग्नाच्या सीझनमध्ये अपहरण करत होत्या. अशात तरूणांना लग्नाच्या सीझनमध्ये कुठे बाहेर जाण्यास मनाई केली जात होती. बिहार पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये २५२६, २०१५ मध्ये ३०००, २०१६ मध्ये ३०७७० आणि नोव्हेंबर २०१७ पर्यंत ३४०५ तरूणांचं लग्न त्यांचं अपहरण करून जबरदस्ती लावण्यात आलं.

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नKidnappingअपहरणJara hatkeजरा हटके