शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

काय असतो पकडौआ विवाह, ज्याच्या भीतीने लग्नाच्या सीझनमध्ये तरूण घरातून बाहेर निघत नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:32 IST

आपल्या बहिणीला सासरी सोडायला गेलेल्या तरूणाचं लग्न जबरदस्ती त्याच्या बहिणीच्या नंदेसोबत लावून देण्यात आलं. बहिणीच्या सासरचे लोक मुलीच्या लग्नावरून अनेक वर्षापासून चिंतेत होते.

(Image Credit : Twitter)

असं म्हणतात की, जोड्या स्वर्गातच बांधलेल्या असतात. पण बिहारमधील लोक पृथ्वीवरच जोड्या बनवतात. त्याही जबरदस्तीने. समस्तीपूरच्या मोरवामध्ये एका तरूणाची जोडी बनवण्यात आली. हा तरूण आपल्या बहिणीला तिच्या सासरी सोडायला गेला होता. पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की, त्याच्या बहिणीचं सासर हे त्याचंही सासर बनेल.

जबरदस्ती करण्यात आलं लग्न

आपल्या बहिणीला सासरी सोडायला गेलेल्या तरूणाचं लग्न जबरदस्ती त्याच्या बहिणीच्या नंदेसोबत लावून देण्यात आलं. बहिणीच्या सासरचे लोक मुलीच्या लग्नावरून अनेक वर्षापासून चिंतेत होते. सगळेजण मोठा हुंडा मागत होते. अशात त्यांना त्यांच्या सूनेच्या भावाच्या रूपात मुलीचा नवरदेव दिसला. मग त्याला पकडून मंदिरात त्याचं लग्न लावून देण्यात आलं.ही घटना दलसिंह सरायच्या साठा येथील रहिवाशी विनोद कुमारसोबत घडली. जेव्हा तो त्याच्या बहिणीला सासरी सोडण्यासाठी गेला तेव्हा तिच्या सासरच्या लोकांनी त्याला पकडून एका मंदिरात त्याचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं.

तरूणाच्या मर्जीशिवाय त्याला नवरदेव बनवून तरूणीसमोर उभं केलं. नंतर जबरदस्ती एकमेकांना हार घालण्यात आले. मग त्याच्याकडून तरूणीची भांग कुंकवाने भरण्यात आली. लग्नानंतर विनोद कुमार म्हणाला की, त्याचं लग्न त्याच्या मर्जीशिवाय जबरदस्ती लावून देण्यात आलं.

लग्नाचा व्हिडीओ व्हायरल

या जबरदस्ती लावण्यात आलेल्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत जबरदस्ती तरूणाचा हात पकडून हार घालण्यात आले. व्हिडीओ बघितलं जाऊ शकतं की, यादरम्यान तरूणी गपचूप त्याच्या बाजूला उभी होती. एकीकडे तरूण सांगतोय की, त्याचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं. तर मुलीच्या लोकांकडून सांगण्यात आलं की, तरूण जेव्हाही त्याच्या बहिणीला सोडण्यासाठी सासरी येत होता तेव्हा तो लपून लपून मुलीला भेटत होता. दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. त्यामुळे परिवाराने दोघांचं लग्न लावून दिलं.

काय असतं पकडौआ लग्न?

अशाप्रकारच्या लग्नाला पकडौआ विवाह म्हटलं जातं. एक काळ असा होता जेव्हा बिहारमध्ये जबरदस्ती अशी लग्ने नेहमीच होत होती. पकडौआ विवाहात एखाद्या तरूणाचं आधी अपहरण केलं जात होतं आणि मग घाबरवून जबरदस्ती त्याचं लग्न लावून दिलं जात होतं. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, ८०च्या दशकात बिहारच्या अनेक भागात अशा लग्नांचं फार चलन होतं. अशा लग्नांची झलक काही सिनेमांमध्येही बघायला मिळते.

रिपोर्ट्सनुसार, एक काळ असा होता जेव्हा गावांमध्ये अशी लग्ने लावली जात होती. त्यासाठी अनेक लोकांच्या गॅंग असायच्या. या गॅंग इंटरची परीक्षा देणारे विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या तरूणांचं लग्नाच्या सीझनमध्ये अपहरण करत होत्या. अशात तरूणांना लग्नाच्या सीझनमध्ये कुठे बाहेर जाण्यास मनाई केली जात होती. बिहार पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये २५२६, २०१५ मध्ये ३०००, २०१६ मध्ये ३०७७० आणि नोव्हेंबर २०१७ पर्यंत ३४०५ तरूणांचं लग्न त्यांचं अपहरण करून जबरदस्ती लावण्यात आलं.

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नKidnappingअपहरणJara hatkeजरा हटके