शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

काय असतो पकडौआ विवाह, ज्याच्या भीतीने लग्नाच्या सीझनमध्ये तरूण घरातून बाहेर निघत नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:32 IST

आपल्या बहिणीला सासरी सोडायला गेलेल्या तरूणाचं लग्न जबरदस्ती त्याच्या बहिणीच्या नंदेसोबत लावून देण्यात आलं. बहिणीच्या सासरचे लोक मुलीच्या लग्नावरून अनेक वर्षापासून चिंतेत होते.

(Image Credit : Twitter)

असं म्हणतात की, जोड्या स्वर्गातच बांधलेल्या असतात. पण बिहारमधील लोक पृथ्वीवरच जोड्या बनवतात. त्याही जबरदस्तीने. समस्तीपूरच्या मोरवामध्ये एका तरूणाची जोडी बनवण्यात आली. हा तरूण आपल्या बहिणीला तिच्या सासरी सोडायला गेला होता. पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की, त्याच्या बहिणीचं सासर हे त्याचंही सासर बनेल.

जबरदस्ती करण्यात आलं लग्न

आपल्या बहिणीला सासरी सोडायला गेलेल्या तरूणाचं लग्न जबरदस्ती त्याच्या बहिणीच्या नंदेसोबत लावून देण्यात आलं. बहिणीच्या सासरचे लोक मुलीच्या लग्नावरून अनेक वर्षापासून चिंतेत होते. सगळेजण मोठा हुंडा मागत होते. अशात त्यांना त्यांच्या सूनेच्या भावाच्या रूपात मुलीचा नवरदेव दिसला. मग त्याला पकडून मंदिरात त्याचं लग्न लावून देण्यात आलं.ही घटना दलसिंह सरायच्या साठा येथील रहिवाशी विनोद कुमारसोबत घडली. जेव्हा तो त्याच्या बहिणीला सासरी सोडण्यासाठी गेला तेव्हा तिच्या सासरच्या लोकांनी त्याला पकडून एका मंदिरात त्याचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं.

तरूणाच्या मर्जीशिवाय त्याला नवरदेव बनवून तरूणीसमोर उभं केलं. नंतर जबरदस्ती एकमेकांना हार घालण्यात आले. मग त्याच्याकडून तरूणीची भांग कुंकवाने भरण्यात आली. लग्नानंतर विनोद कुमार म्हणाला की, त्याचं लग्न त्याच्या मर्जीशिवाय जबरदस्ती लावून देण्यात आलं.

लग्नाचा व्हिडीओ व्हायरल

या जबरदस्ती लावण्यात आलेल्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत जबरदस्ती तरूणाचा हात पकडून हार घालण्यात आले. व्हिडीओ बघितलं जाऊ शकतं की, यादरम्यान तरूणी गपचूप त्याच्या बाजूला उभी होती. एकीकडे तरूण सांगतोय की, त्याचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं. तर मुलीच्या लोकांकडून सांगण्यात आलं की, तरूण जेव्हाही त्याच्या बहिणीला सोडण्यासाठी सासरी येत होता तेव्हा तो लपून लपून मुलीला भेटत होता. दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. त्यामुळे परिवाराने दोघांचं लग्न लावून दिलं.

काय असतं पकडौआ लग्न?

अशाप्रकारच्या लग्नाला पकडौआ विवाह म्हटलं जातं. एक काळ असा होता जेव्हा बिहारमध्ये जबरदस्ती अशी लग्ने नेहमीच होत होती. पकडौआ विवाहात एखाद्या तरूणाचं आधी अपहरण केलं जात होतं आणि मग घाबरवून जबरदस्ती त्याचं लग्न लावून दिलं जात होतं. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, ८०च्या दशकात बिहारच्या अनेक भागात अशा लग्नांचं फार चलन होतं. अशा लग्नांची झलक काही सिनेमांमध्येही बघायला मिळते.

रिपोर्ट्सनुसार, एक काळ असा होता जेव्हा गावांमध्ये अशी लग्ने लावली जात होती. त्यासाठी अनेक लोकांच्या गॅंग असायच्या. या गॅंग इंटरची परीक्षा देणारे विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या तरूणांचं लग्नाच्या सीझनमध्ये अपहरण करत होत्या. अशात तरूणांना लग्नाच्या सीझनमध्ये कुठे बाहेर जाण्यास मनाई केली जात होती. बिहार पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये २५२६, २०१५ मध्ये ३०००, २०१६ मध्ये ३०७७० आणि नोव्हेंबर २०१७ पर्यंत ३४०५ तरूणांचं लग्न त्यांचं अपहरण करून जबरदस्ती लावण्यात आलं.

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नKidnappingअपहरणJara hatkeजरा हटके