शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काय असतो पकडौआ विवाह, ज्याच्या भीतीने लग्नाच्या सीझनमध्ये तरूण घरातून बाहेर निघत नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:32 IST

आपल्या बहिणीला सासरी सोडायला गेलेल्या तरूणाचं लग्न जबरदस्ती त्याच्या बहिणीच्या नंदेसोबत लावून देण्यात आलं. बहिणीच्या सासरचे लोक मुलीच्या लग्नावरून अनेक वर्षापासून चिंतेत होते.

(Image Credit : Twitter)

असं म्हणतात की, जोड्या स्वर्गातच बांधलेल्या असतात. पण बिहारमधील लोक पृथ्वीवरच जोड्या बनवतात. त्याही जबरदस्तीने. समस्तीपूरच्या मोरवामध्ये एका तरूणाची जोडी बनवण्यात आली. हा तरूण आपल्या बहिणीला तिच्या सासरी सोडायला गेला होता. पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की, त्याच्या बहिणीचं सासर हे त्याचंही सासर बनेल.

जबरदस्ती करण्यात आलं लग्न

आपल्या बहिणीला सासरी सोडायला गेलेल्या तरूणाचं लग्न जबरदस्ती त्याच्या बहिणीच्या नंदेसोबत लावून देण्यात आलं. बहिणीच्या सासरचे लोक मुलीच्या लग्नावरून अनेक वर्षापासून चिंतेत होते. सगळेजण मोठा हुंडा मागत होते. अशात त्यांना त्यांच्या सूनेच्या भावाच्या रूपात मुलीचा नवरदेव दिसला. मग त्याला पकडून मंदिरात त्याचं लग्न लावून देण्यात आलं.ही घटना दलसिंह सरायच्या साठा येथील रहिवाशी विनोद कुमारसोबत घडली. जेव्हा तो त्याच्या बहिणीला सासरी सोडण्यासाठी गेला तेव्हा तिच्या सासरच्या लोकांनी त्याला पकडून एका मंदिरात त्याचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं.

तरूणाच्या मर्जीशिवाय त्याला नवरदेव बनवून तरूणीसमोर उभं केलं. नंतर जबरदस्ती एकमेकांना हार घालण्यात आले. मग त्याच्याकडून तरूणीची भांग कुंकवाने भरण्यात आली. लग्नानंतर विनोद कुमार म्हणाला की, त्याचं लग्न त्याच्या मर्जीशिवाय जबरदस्ती लावून देण्यात आलं.

लग्नाचा व्हिडीओ व्हायरल

या जबरदस्ती लावण्यात आलेल्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत जबरदस्ती तरूणाचा हात पकडून हार घालण्यात आले. व्हिडीओ बघितलं जाऊ शकतं की, यादरम्यान तरूणी गपचूप त्याच्या बाजूला उभी होती. एकीकडे तरूण सांगतोय की, त्याचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं. तर मुलीच्या लोकांकडून सांगण्यात आलं की, तरूण जेव्हाही त्याच्या बहिणीला सोडण्यासाठी सासरी येत होता तेव्हा तो लपून लपून मुलीला भेटत होता. दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. त्यामुळे परिवाराने दोघांचं लग्न लावून दिलं.

काय असतं पकडौआ लग्न?

अशाप्रकारच्या लग्नाला पकडौआ विवाह म्हटलं जातं. एक काळ असा होता जेव्हा बिहारमध्ये जबरदस्ती अशी लग्ने नेहमीच होत होती. पकडौआ विवाहात एखाद्या तरूणाचं आधी अपहरण केलं जात होतं आणि मग घाबरवून जबरदस्ती त्याचं लग्न लावून दिलं जात होतं. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, ८०च्या दशकात बिहारच्या अनेक भागात अशा लग्नांचं फार चलन होतं. अशा लग्नांची झलक काही सिनेमांमध्येही बघायला मिळते.

रिपोर्ट्सनुसार, एक काळ असा होता जेव्हा गावांमध्ये अशी लग्ने लावली जात होती. त्यासाठी अनेक लोकांच्या गॅंग असायच्या. या गॅंग इंटरची परीक्षा देणारे विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या तरूणांचं लग्नाच्या सीझनमध्ये अपहरण करत होत्या. अशात तरूणांना लग्नाच्या सीझनमध्ये कुठे बाहेर जाण्यास मनाई केली जात होती. बिहार पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये २५२६, २०१५ मध्ये ३०००, २०१६ मध्ये ३०७७० आणि नोव्हेंबर २०१७ पर्यंत ३४०५ तरूणांचं लग्न त्यांचं अपहरण करून जबरदस्ती लावण्यात आलं.

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नKidnappingअपहरणJara hatkeजरा हटके