शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

'या' गावातील भांडणंसुद्धा नीरव शांततेत होतात; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 17:18 IST

'घाट – घाट पर बदले पाणी, कोस कोस पर वाणी,' असं म्हटलं जातं. पण भाषेमध्ये आणि बोलीमध्ये कितीही बदल झाले,  तरीही कोणतीही भाषा विशिष्ट शब्द आणि उच्चारांनीच बोलली जाते, असा आपला आतापर्यंतचा समज आहे.

(Image Credit : BBC.com)

'घाट – घाट पर बदले पाणी, कोस कोस पर वाणी,' असं म्हटलं जातं. पण भाषेमध्ये आणि बोलीमध्ये कितीही बदल झाले,  तरीही कोणतीही भाषा विशिष्ट शब्द आणि उच्चारांनीच बोलली जाते, असा आपला आतापर्यंतचा समज आहे. हा समज खोटा ठरवणारे एक गाव इंडोनेशियातील बाली बेटावर आहे. गावातील लोक उच्चारांची नव्हे, तर चक्क चिन्हांची भाषा बोलतात. त्यामुळे या गावातील गप्पा गोष्टीच काय, अगदी भांडणेसुद्धा अगदी ‘शांततेत’ असतात.

उत्तर बालीमध्ये बेनकाला नावाचे गाव आहे. तिथे 'कता कोलोक' ही भाषा चिन्हांची बोलली जाते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या गावाला शाप आहे. त्यामुळे पिढ्यानपिढ्या येथे जन्माला येणारी बहुतेक बालके कर्णबधीर असतात. खरंतरं शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या गावातील जमातीच्या गुणसूत्रांमधील दोषामुळे येथे जन्माला येणाऱ्या दर पन्नासपैकी एक बाळ कर्णबधीर असतं. परिणामत: गावातील मोठी लोकसंख्या कर्णबधीर आहे. त्यामुळे दैनंदिन संवादासाठी या चिन्हांच्या भाषेचा जन्म झाला. गेल्या तब्बल सहा पिढ्यांपासून ही भाषा वापरता असल्याचे स्थानिक सांगतात.

(Image Credit : BBC.com)

ऐकू येते अशा लोकांना या गावात 'एंगेट' म्हणतात, तर ऐकू न येणाऱ्यांना 'कोलोक' म्हणतात. जगभरातील मूकबधीर चिन्हांची भाषा वापरून संवाद साधतात, पण हा संवाद त्यांच्या पुरताच मर्यादित असतो. त्यामुळे मूकबधिरांचे विश्व अगदी लहान होऊन जाते. मात्र बेनकालामधील सर्वच ग्रामस्थ 'कता कोलोक' मध्ये अगदी सहज संवाद साधत असल्यामुळे कर्णबधिरांना अजिबात न्यूनपणा जाणवत नाही. उलट गावातील चौका-चौकांत 'एंगेट' आणि 'कोलोक' अशा दोन्ही लोकांमध्ये गप्पा रंगलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे कर्णबधिरांना दैनंदिन व्यवहार करताना कोणत्याही अडचणी येत नाहीत. तसेच सामान्य लोकांना मिळतो त्याच दराने त्यांना रोजगारही मिळतो.

अपरिहार्यतेतून निर्माण झालेली ही चिन्हांची भाषा सतत विकसित होत आहे. नवनवीन अनुभवांतून त्यात सतत चिन्हांची भर पडत आहे. विशेष म्हणजे चेहऱ्यावरील हावभाव आणि हातवारे यांच्या माध्यमांतून ही भाषा बोलली जात असल्यामुळे अभिनय कलेचा अनायसे विकास या भाषकांमध्ये होतो. परिणामत: या गावातून अनेक आघाडीचे अभिनेते तयार झाले आहेत. स्थानिक रंगभूमीपासून ते चित्रपट, मालिकांपर्यंत त्यांनी लौकीक मिळविला आहे.

(Image Credit : BBC.com)

पिशाच्चांशी संवाद साधत असल्याची श्रद्धा

बालीमधील हिंदू समूदायामध्ये मृत्यूनंतरच्या जीवनाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचा दफनविधी खूपच काळजीपूर्वक आणि श्रद्धेने केला जातो. या दफनविधीत आणि त्यासाठी खड्डे खोदण्यात 'कोलोक' मंडळींना अग्रक्रम दिला जातो. कारण अन्य कोणतेही आवाज ऐकू न शकणाऱ्या या मंडळींना स्मशानातील भूत-पिशाच्चांचे आवाज ऐकू येतात आणि ते त्यांचीशी संवाद साधून मृताच्या राहिलेल्या इच्छा किंवा त्याचा पुढील जन्म याची माहिती घेऊ शकतात, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन