शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

लग्नाच्या दिवशीच गायब झाला नवरदेव, तिचं दुसऱ्याशी लग्न झाल्यावर परतला आणि अजब सत्य आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 16:34 IST

वधु मंडपी लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पाहुण्या्ंच्या स्वागताचीही पूर्ण तयार झाली होती. पण...

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh News) कानपूरमध्ये (Kanpur Groom run away on marriage day) एका लग्ना दरम्यान ऐनवेळी नवरदेव अचानक गायब झाला. यानंतर मुलीच्या परिवाराचा सन्मान ठेवण्यासाठी एका नातेवाईकाने त्याच्या भावासोबत तरूणीचं लग्न लावून दिलं ही घटना कानपूरच्या पालेहपूर गावातील आहे. या गावातील श्रीराम प्रजापती यांच्या घरात लग्नाची जोरदार तयारी केली सुरू होती. सांयकाळी त्यांची मुलगी शशीचं लग्न होणार होतं.

रायपूर गावातून वरात येणार होती. आणि ते वरातीतील पाहुण्यांच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. तेच दुसरीकडे नवरदेव धर्मेंद्रचे वडील धर्मपालही आपल्या मुलाच्या लग्नावरून आनंदी होते. तेही तयारीला बिझी होते. केसांना रंग लावण्यासाठी ते मुलाला सोबत घेऊन सलूनमध्ये गेले. मुलगा काहीतरी करणार याची त्यांना भनकही नव्हती. (हे पण : सनकी तरूण कुऱ्हाड घेऊन तिच्या लग्नात पोहोचला, नवरदेवासमोरच नवरीसोबत केला हा कारनामा....)

जेव्हा धर्मपाल केसांना रंग लावत होते तेव्हा सलून त्यांचा मुलगा अचानक गायब झाला. बराच वेळ तो घरी परतला नाही त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ही माहिती मुलीकडच्यांना लागली तेव्हा तर गोंधळ आणखीनच वाढला. वरात जाण्यासाठी तयार होती, पण नवरदेवाचा सायंकाळपर्यंत काहीच पत्ता नव्हता. नवरी सजून-धजून नवरदेवाची वाट बघत होती. नंतर मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली. (हे पण वाचा बोंबला! लग्न लागणार इतक्यात मंडपातच नवरदेव अन् पंडिताची धुलाई, कारण वाचून व्हाल अवाक्....)

रात्री ११ वाजेपर्यंत नवरदेवाचा काही पत्ता लागला नाही. त्यामुळे नवरी रडायला लागली. लग्न जुळवणाऱ्या व्यक्तीने नवरीची स्थिती बघून आपला भाऊ महेशसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. नवरीच्या घरचे लोकही सन्मान वाचवण्यासाठी लग्नास तयार झाले. नवरीही यासाठी तयार झाली आणि दोघांचं लग्न लावून दिलं गेलं.

आश्चर्याची बाब म्हणजे तरूणीच्या लग्नाच्या दोन दिवसांनंतरच बेपत्ता नवरदेव धर्मेंद्र आपल्या घरी परत आला. त्याने त्याच्या आई-वडिलांना खोटी कारणे सांगितली. तो म्हणाला की त्याला कुणीतरी इंजेक्शन दिलं आणि त्याला किडनॅप केलं होतं. जेव्हा पोलिसांनी धर्मेंद्र पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा त्याने खरं खरं सांगितलं. (हे पण वाचा : एकाच दिवशी, एकाच मुहूर्तावर तरूणाचं दोन बहिणींशी लग्न, नवरदेवाला अटक; समोर आला मोठा ट्विस्ट...)

तो म्हणाला की, लग्नाच्या दोन दिवसांआधीच तो गावातील त्याच्या प्रेयसीला घेऊन पळून गेला होता. पण घरातील लोकांनी पकडलं होतं. त्याने सांगितलं की, त्याला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचं नव्हतं. पण घरातील लोक ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे तो लग्नाच्या दिवशी संधी बघून गायब झाला होता. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेUttam Nagar Policeउत्तम नगर पोलीसUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न