शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

‘मारकुट्या’ शाळेवर त्यानं फिरवला बुलडोझर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 08:43 IST

शाळेचा असा ‘बदला’ घेतल्यानंतर याच शाळेच्या उद्ध्वस्त ढिगाऱ्यासमोर उभं राहून त्यानं फोटाे, व्हिडीओही काढले आणि लिहिलं, ‘..अखेर शाळेचा मी असा बदला घेतला!’

आपण कितीही माेठं झालो तरी आपल्या शाळेच्या आठवणी आपल्या कायम स्मरणात असतात. त्या आपल्या सगळ्यांत जवळच्याही असतात. शाळकरी वयात झालेली दोस्तीही अधिक गहिरी आणि बऱ्याचदा आयुष्यभर टिकणारी असते. ही दोस्ती, हा याराना प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. जी गोष्ट शाळकरी दोस्तांची, तीच शाळेची आणि शाळेतल्या शिक्षकांचीही. या काळात घडलेली प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यावर परिणाम करणारी असते. शाळेने, शाळेतल्या शिक्षकांनी जे संस्कार तुमच्यावर केलेले असतात, तेही कधीच न पुसले जाणारे असतात. त्यामुळेच नंतरच्या आयुष्यात खूप मोठ्या झालेल्या व्यक्तीही आपल्या कॉलेजच्या, विद्यापीठातील प्राध्यापकांपेक्षा आपल्या शाळेतल्या शिक्षकांविषयी जास्त आपुलकीनं बोलताना आढळतात. अलीकडच्या काळात तर आपल्या शाळेच्या आठवणी ताज्या करण्यासाठी अनेकजण वीस-वीस, पंचवीस-पंचवीस वर्षांनी पुन्हा शाळेत जमतात. आपल्या त्यावेळच्या सवंगड्यांना भेटतात, आपल्या शिक्षकांविषयीही अतीव कृतज्ञता व्यक्त करतात. 

बहुतेकांना याच शाळेनं आणि याच शिक्षकांनी ‘घडवलेलं’ असतं. या आठवणी जर चांगल्या असतील तर ठीक; पण या वयात जर शाळेचा आणि शाळेच्या शिक्षकांचा कटू अनुभव त्यांनी घेतला असेल, तर तेही त्यांच्या मनावर कायमचं कोरलं जातं. असाच एक अनुभव तुर्कीचा प्रसिद्ध अभिनेता कागलर एर्तुग्रुल यानं आपल्या शाळकरी वयात घेतला होता. त्याच्या दुर्दैवानं त्याचा हा अनुभव चांगला नव्हता. कागलर म्हणतो, माझ्या उमलत्या वयात शाळेनं माझं बालपण मारून टाकलं. माझी बालसुलभ उत्सुकता दाबून टाकली. माझ्यातलं बाल्य फुलवण्याऐवजी त्यांनी ते कोमेजून आणि आक्रसून टाकलं. शाळेतले शिक्षक अकारण रागवत, राग-राग करत. त्यांना एकच गोष्ट माहीत होती, मुलांचं काही चुकलं किंवा ते चुकताहेत असं त्यांना वाटलं की, मुलांना ढोलासारखं बडवायचं. हातावर, पाठीवर वळ येईपर्यंत त्यांना छड्या मारायच्या आणि रडवायचं. त्यावेळी माझ्या शरीर-मनावर उमटलेले ते व्रण आजही ताजे आहेत. मोठ्या उत्साहानं आणि अनेक स्वप्न मनाशी बांधून मी शाळेत प्रवेश घेतला होता; पण तिथे भलतंच घडलं. शाळेतले दिवस आपल्या आयुष्यात कधीच आले नसते, तर किती बरं झालं असतं, असंच आजही मला वाटतं!

कागलरच्या मनात शाळेविषयी इतका कटुता भरलेली आहे. हा इतिहास विसरण्यासाठी मग कागलरनं काय करावं? बालपणी ज्या शाळेत तो शिकला होता, ती अख्खी शाळाच मग त्यानं विकत घेतली आणि या शाळेची दु:खद आठवण कधीही नको आणि या शाळेत कधीच, कोणत्याच मुलानं प्रवेश घेऊ नये म्हणून ही शाळाच त्यानं  बुलडोझरनं उद्ध्वस्त करून टाकली. शाळेचा असा ‘बदला’ घेतल्यानंतर याच शाळेच्या उद्ध्वस्त ढिगाऱ्यासमोर उभं राहून त्यानं फोटाे, व्हिडीओही काढले आणि लिहिलं, ‘..अखेर शाळेचा मी असा बदला घेतला!’

कागलरच्या या कृतीची सध्या अख्ख्या जगभरात चर्चा सुरू आहे. कागलरनं केलेली कृती योग्य की अयोग्य, यावरून सोशल मीडियावर चर्चेचे आणि वादविवादाचे रण उठले आहे. कागलरच्या बाजूनं आणि कागलरच्या विरुद्ध असे परस्परविरोधी चक्क दोन गटच सोशल मीडियावर तयार झाले आहेत आणि आता त्यांच्यातच जुंपली आहे. काही जणांचं म्हणणं आहे, कागलरनं केलं ते अगदी बरोबर आहे, अशा शाळा जमीनदोस्तच झाल्या पाहिजेत आणि अशा शाळेतल्या शिक्षकांनाही शिकवण्याची संधी कधीच मिळायला नको. त्याच वेळी काही जणांचं म्हणणं आहे, कागलरनं जी कृती केली तरी अतिशय अयोग्य आणि चुकीची आहे. शाळेतला प्रत्येकच शिक्षक मारकुटा असेलच असं नाही. शाळेतल्या काही चांगल्या गोष्टीही असतील आणि त्याचाही सकारात्मक परिणाम कागलरच्या आयुष्यावर उमटलाच असेल. शिवाय आपल्या शाळेविषयी जे मत कागलरचं आहे, तेच मत शाळेत शिकलेल्या प्रत्येकाचंच असेल असं अजिबात नाही. ‘सब घोडे बारा टक्के’ या न्यायानं अख्ख्या शाळेलाच त्यानं बदनाम केलं आहे. 

आमचीही शाळा विकत घेतोस का?कागलरनं आपल्या शाळेची इमारत उद्ध्वस्त केल्यानंतर त्या मातीच्या ढिगाऱ्यावर उभं राहून फोटो काढतानाच खाली लिहिलं आहे, ज्या शाळेच्या आठवणी इतक्या खतरनाक असतील, ती शाळा अशीच मातीत गाडली गेली पाहिजे. ती मी कधीच पुन्हा उभी राहू देणार नाही! काही सोशल मीडिया युजर्सनी कागलरचं अभिनंदन करताना आपल्याही ‘मारकुट्या’ शाळेचं नाव आणि पत्ता दिला असून, याही शाळा तुला विकत घेता येतात का पाहा, अशी विनंती कागलरला केली आहे.

टॅग्स :Schoolशाळा