शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

केवळ अभिमान बाळगून काय उपयोग, मराठीसाठी पेटून उठा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 06:25 IST

लोकमत अभियान - कवीवर्य ना.धों. महानोर म्हणतात... घरात १०० पुस्तके नसणे हेच दुर्देव

जळगाव : प्रत्येक राज्याने आपापली भाषा त्या-त्या राज्यांत सक्तीची केली आहे. मात्र महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठीला पर्याय ठेवला जात आहे. खऱ्या अर्थाने मराठी भाषा टिकवायची असेल, तर केवळ मराठीचा अभिमान बाळगून चालणार नाही तर त्यासाठी राज्यकर्त्यांसह समाजातील सर्वच घटकांनी पेटून उठले पाहिजे, असे परखड मत कवीवर्य ना.धों. महानोर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.

राज्यात आठवीपर्यंत प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक केले आहे; पण, काही खासगी शाळा त्यातून पळवाट शोधत आहेत. त्यामळे आठवीनंतरही प्रत्येक शाळेने मराठी भाषेला महत्त्व दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे येथे सूचित केले. यावर महानोर म्हणाले, महाराष्ट्राने त्रिभाषा सूत्र स्वीकारले आहे; त्यामुळे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेपैकी दोन विषयांची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या सूत्रामुळे मराठीकडे दुर्लक्ष होत आहे. हिंदी भाषा सोपी असल्याने चांगले गुण मिळविता येतात. जागतिक स्पर्धेत टिकविण्यासाठी  इंग्रजी महत्त्वाची असल्याने या भाषांकडे शालेय विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे; त्यामुळे मराठीचा समावेश असलेल्या द्विभाषा सूत्र स्वीकारण्याची गरज आहे. शालेय पातळीवर दहावीपर्यंत मराठीसाठी इतर कोणताही पर्याय ठेवता कामा नये. मातृभाषेतून जेवढे चांगले शिकता येते, तेवढे इतर भाषांमधून नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून ज्याला इंग्रजी शिकायची आहे व राष्ट्रीय भाषा म्हणून ज्याला हिंदी शिकायची आहे, त्याने ती शिकावी, मात्र मराठीची सक्तीच हवी.

राज्यात इयत्ता दहावीपर्यंत मराठी भाषा बंधनकारक केली पाहिजे. ज्या शाळा मराठीविषयी गांभीर्य बाळगणार नाही त्या शाळांवर कारवाई केली पाहिजे. सर्वांनी पुढाकार घेत मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी साहित्य यांचा प्रचार प्रसार करीत त्यांचे जतन करण्यासाठी प्रयत्न केले तरच मराठी भाषा टिकेल. मराठी भाषा टिकली तरच महाराष्ट्र टिकेल. आज मराठीचे शिक्षक असो की प्राध्यापक असो त्यांच्या घरात लाखाचा टिव्ही असतो. मात्र घराच्या कनोड्यात १०० मराठी पुस्तके नसतात. स्वत:च मराठीचे वाचन करीत नसाल तर इतरांना काय शिकविणार, असा सवाल महानोर यांनी केला.

प्रत्येक शाळेमध्ये इयत्ता दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची केली पाहिजे. ज्या शाळा याची अंमलबजावणी करणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे.- ना.धों. महानोर 

 

टॅग्स :marathiमराठीJalgaonजळगावMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिन