शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

आनंदनगर तांड्याला १५ वर्षापासून पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:00 PM

दुष्काळ आणि दुर्लक्ष या नैसर्गिक आणि मानवी समस्यांनी ग्रासलेल्या आनंदनगर तांड्यातील नागरिक त्रस्त होत आहेत.गेल्या १५ वर्षांपासून गावात भीषण पाणी टंचाई असताना लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देआनंदनगर तांड्याला दुष्काळाची झळ कायमलोकप्रतिनिधींना गावबंदीचा इशाराअधिग्रहीत विहिरीचे पाणी आटले

निपाणे, ता.एरंडोल : दुष्काळ आणि दुर्लक्ष या नैसर्गिक आणि मानवी समस्यांनी ग्रासलेल्या आनंदनगर तांड्यातील नागरिक त्रस्त होत आहेत.गेल्या १५ वर्षांपासून गावात भीषण पाणी टंचाई असताना लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. पाणी टंचाई आणि रोजगाराचे साधन नसल्याने अर्धे गाव स्थलांतरीत झाल्याची भीषण स्थिती आहे.आनंदनगर तांडा हे आदिवासी बांधवांचे गाव आहे. गावातील १३० कुटुंबाची ८८९ लोकसंख्या आहे. गावावर दुष्काळाचे सावट असल्याने जवळपास ३०० ते ३५० नागरिक परराज्यात ऊस तोडण्यासाठी गेले आहेत. ३० कुटुंबांची घरे बंद आहेत.लोकप्रतिनिधींना गावबंदीचा इशाराआनंदनगर तांडा येथे सुमारे १५ वर्षांपासून भीषण पाणी टंचाई आहे. सन २०१७ मध्ये मुख्यमंत्री पेय जल योजनेत आनंदनगर गावाचा समावेश केला आहे. मात्र आतापर्यंत ही योजना पुढे सरकलेली नाही. लोकप्रतिनिधींच्या सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त वातावरण आहे. त्यामुळे आगामी काळात लोकप्रतिनिधींना गावबंदी करीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा सरपंच वंदना राठोड, उपसरपंच ग्यारशीबाई राठोड, ग्रा.पं.सदस्य भास्कर राठोड, सामाजिक कार्यकर्ते भास्कर राठोड यांनी दिला आहे.निधीअभावी विकास कामे ठप्पगावातील पथदिव्याचे सिमेंट खांब व तार हे पूर्णपणे जीर्ण झाले आहे. काही खांब तुटलेले आहेत. भास्कर राठोड यांच्यासह काही ग्रामस्थांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत लेखी व तोंडी तक्रार दिली आहे. मात्र त्यानंतरही कामे झाली नाही. भविष्यात मोठी हानी होण्याची शक्यता आहे.अधिग्रहीत विहिरीचे पाणी आटलेसन १९९५ पूर्र्वी आनंदनगर तांडा हे निपाणे ग्रुप ग्रामपंचायत होती. त्यानंतर आनंदनगर तांडा ही स्वतंत्र ग्राम पंचायत झाली. निपाणे वॉटर सप्लाय मार्फत तांड्यासाठी पाणी पुरवठा केला जात होता. मात्र निपाणे गावासाठी पाणी कमी पडु लागल्याने तांडाचे पाणी बंद करण्यात आले व १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत आनंदनगर गावाचा समावेश करण्यात आला. परंतु १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाणी पट्टी महाग पडत असल्याने ही प्रादेशिक योजना बंद केली. त्यानंतर तांड्याला भीषण पाणी टंचाई जाणवू लागली. त्यानंतर माजी सरपंच विजय धनराज राठोड यांची विहीर अधिग्रहण केली. मात्र गेल्या २ ते ३ वर्षांपासून दुष्काळीस्थिती असल्याने विहिरीला देखील पाणी नाही.

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी