शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबाद महामार्गावर पाण्याचे तळे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:21 IST

नशिराबाद: गावातून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. काम पूर्ण करण्याच्या हातघाईने या कामात असंख्य अक्षम्य चुका ...

नशिराबाद: गावातून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. काम पूर्ण करण्याच्या हातघाईने या कामात असंख्य अक्षम्य चुका झाल्या असल्याचा आक्षेप घेत सदरील चुका येणाऱ्या कालखंडात समोर येत आहे. त्याचे दूरगामी परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहे. बोगद्याजवळ दोन्ही बाजूंना नहीच्या अक्षम्य चुकीमुळे पावसाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर तळे साचत आहे. त्यामुळे तिथून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रसंगी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यावर तत्काळ उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांनी केली असून, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की नशिराबाद शहरातून सुनसगाव बोदवड मलकापूर राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्गावरून वेगळा होऊन जातो त्या ठिकाणी नियमाप्रमाणे २५×७ मीटरचा बोगदा देण्यात आला आहे. सदरचा बोगदा हा त्या ठिकाणी सुनसगाव रस्त्याचा फाटा आहे त्या ठिकाणी आलेला नसून चुकीच्या पद्धतीने बांधकाम झालेला असल्याचे दिसते. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याचा संभाव्य धोका मोठ्या प्रमाणावर आहे. नशिराबाद येथील पोलीस स्टेशनसमोर तरसोद गणपती देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच भादली रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर महालक्ष्मी मंदिराजवळ राष्ट्रीय महामार्गावर या ठिकाणी भुयारी मार्ग मिळावा यासाठी २५ मे २०१९ रोजी बैलगाडी यांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यानुसार पोलीस स्टेशनसमोर त्या ठिकाणी बोगदा करण्यात आला मात्र सदर भुयारी बोगद्याचे काम अपेक्षित उंची जुळवितांना या ठिकाणी खोली करण्यात आली नाही. त्यामुळे पावसाळ्यात पुलाच्या दोन्ही बाजूला सर्विस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते व लोकांना त्या ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघातसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पाणी वाहून नेण्यासाठी शहराजवळील गटार बांधकाम न झाल्याने गावातील दोन्ही बाजूंच्या वस्त्यांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर साचत आहे. याबाबत तत्काळ दखल घेऊन तोडगा काढण्यात यावा अशी मागणी निवेदनात पंकज महाजन यांनी केली आहे. नागरिकांचे हाल थांबावे, अशी मागणी करण्यात आली आहे.