शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

व्हायरल विषाणूने अमळनेर तालुक्यात अनेकांना त्रास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:18 IST

संजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : कोरोनाच्या काळात मृत्यूचा उच्चांक गाठल्यानंतर आता वातावरणात बदल झाल्याने गेल्या महिन्याभरापासून अमळनेर ...

संजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : कोरोनाच्या काळात मृत्यूचा उच्चांक गाठल्यानंतर आता वातावरणात बदल झाल्याने गेल्या महिन्याभरापासून अमळनेर तालुका डेंग्यू, मलेरिया, व्हायरल विषाणूच्या आजाराने आजारी पडलाय. हजारो रुग्ण उपचार घेत असून खासगी दवाखाने देखील फुल्ल झाले आहेत.

कोरोनाच्या काळात अमळनेर तालुक्यात मृत्यूचे प्रमाण जास्त होते आणि त्याच वेगाने ते कमीही झाले. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पळ काढल्यासारखी परिस्थिती आली खरी. मात्र, अचानक व्हायरल इन्फेक्शनने जोरदार मुसंडी मारल्याने प्रत्येक घरात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण आहेत. अंगदुखी, आवाज बसणे आदींनी नागरिक त्रस्त आहेत. किमान पाच ते सहा दिवस प्रत्येकाला त्रास होत आहे. लहान मुलांचेही प्रमाण वाढले आहे. उपचार करणारे काही डॉक्टर आणि आशा, आरोग्य सेवक देखील व्हायरल विषाणूने आजारी आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सततचा पाऊस, ठिकठिकाणी डबके साचल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यू , मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. लहान मुलांमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यात कोरोनाचे रुग्ण नाहीत म्हणून नागरिकांनी मास्क, गर्दीचे निर्बंध पाळणे बंद केल्याने व्हायरल विषाणूमुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात देखील रुग्ण वाढले आहेत. पाण्याचे डबके साचलेले असून पाणी जिरत नाही तोच पुन्हा पाऊस पडत आहे.

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने बाहेरील खाद्यपदार्थ खायची आवड निर्माण झाली आणि या दिवसात पचनशक्ती कमी झाल्याने टायफाॅईडसारखे आजार देखील वाढत आहेत.

ज्याप्रमाणे सात्री गावात जवळपास सर्वच आजारी होते तशी परिस्थिती अनेक गावांत निर्माण झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी दवाखाने यांच्यात गर्दी वाढली आहे. ग्रामीण रुग्णालयात देखील सरासरी १५० रुग्ण तपासायला येत आहेत, तर अनेकजणांना ॲडमिट देखील करावे लागत असल्याचे अधीक्षक डॉ. प्रकाश ताडे यांनी सांगितले.

मास्क आणि सोशल डिस्टन्स यांचे पालन करावे आणि प्रतिकारशक्ती वाढवावी हाच बचावाचा सर्वोत्तम पर्याय आहे. नियम पाळले तरच सुरक्षित राहू शकतो. -डॉ. प्राजक्ता व डॉ निखिल बहुगुणे, अमळनेर.

४० टक्के डेंग्यूसदृश व ६० टक्के व्हायरल विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. गरम पाणी पिणे, स्वछता पाळून डासांपासून स्वतःचे रक्षण करावे - डॉ. नितीन पाटील, बालरोगतज्ज्ञ, अमळनेर.

जलरक्षकांना सूचना देऊन पाण्याचे स्रोतांचे सुपर क्लोरिनेशन करायला सांगितले आहे. आशा, परिचारिका, आरोग्य सेवक यांना कंटेनर सर्वेक्षण व रक्त तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. - डॉ. गिरीश गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी, अमळनेर.

नगरपालिकेने डासांच्या औषधांची फवारणी करावी, पावडर फवारणी करून तत्काळ पाण्याचा निचरा करावा- शीतल महेंद्र पाटील, नागरिक.