शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : काय चाललंय काय?... अंत्यसंस्कारालाही जागा नाही, मात्र कागदोपत्री 'परिस्थिती नियंत्रणात'!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 09:37 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: काही मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी वाट पाहण्याची वेळ नातलगांवर येत आहे. इतकी भयावह परिस्थिती स्मशानभूमीत पाहिल्यावर लक्षात येते. मात्र प्रशासन कागदोपत्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत आहे.

सुशील देवकर

जळगाव शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी राखीव ठेवलेल्या नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा शिल्लक उरलेली नाही. नवीन बांधलेले ६ ओटेदेखील कमी पडत असून जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. तरीही काही मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी वाट पाहण्याची वेळ नातलगांवर येत आहे. इतकी भयावह परिस्थिती स्मशानभूमीत पाहिल्यावर लक्षात येते. मात्र प्रशासन कागदोपत्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत आहे. नेरीनाका स्मशानभूमी कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कारासाठी राखीव आहे. तेथे आठवडाभरात अंत्यसंस्कार झालेल्या मृतदेहांची संख्या व प्रशासनाकडून दररोज जाहीर केल्या जात असलेल्या कोरोना मृतांच्या आकडेवारीत कमालीची तफावत आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांना याबाबत विचारणा केली असता सारीचे रुग्ण व इतर रुग्णांचा समावेश असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे. मात्र इतर कारणाने मृत्यू असेल तर नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केलेच जाणार नाहीत. त्यामुळे एक तर ते दगावलेले रुग्ण हे कोरोनाचेच आहेत अथवा सारीचे.  सारीने जर एवढे मृत्यू होत असतील तर तेदेखील गंभीर आहे. त्यासाठी प्रशासनाने नागरिकांना अंधारात न ठेवता जर वस्तुस्थिती लक्षात आणून दिली तर प्रशासनाला कदाचित नागरिकांचे अधिक सहकार्य लाभेल व कोरोना संदर्भातील नियमावलीचे अधिक काटेकोर पालन करून कोरोना संसर्गाला आळा घालणे शक्य होऊ शकेल. मात्र प्रशासनाकडून तसे होताना दिसत नाही.

कोरोना उद्रेकाचा उच्चांक (पीक) गाठला गेला असून हळूहळू जळगाव शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत जाईल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त होत आहे. मात्र अद्यापही हजारच्या वरच रुग्ण सापडत असल्याने परिस्थितीतील गांभीर्य कायम आहे. नागरिकांना प्रशासनाकडून विनाकारण घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र नागरिक काही परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचेच वारंवार बाजारात होणाऱ्या गर्दीवरून लक्षात येत आहे. अगदी आठवडे बाजारही नियम डावलून भरवले जात असल्याने संसर्ग वाढला तर त्याचा दोष नागरिकांचाच असेल. त्या वेळी परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊन ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर नाही, याचा दोष प्रशासनावर टाकता येणार नाही, त्यासाठी आपणही तेवढेच जबाबदार राहू, हेदेखील समजून घेतलेले बरे...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalgaonजळगावMaharashtraमहाराष्ट्र