शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

CoronaVirus News : काय चाललंय काय?... अंत्यसंस्कारालाही जागा नाही, मात्र कागदोपत्री 'परिस्थिती नियंत्रणात'!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:14 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates: काही मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी वाट पाहण्याची वेळ नातलगांवर येत आहे. इतकी भयावह परिस्थिती स्मशानभूमीत पाहिल्यावर लक्षात येते. मात्र प्रशासन कागदोपत्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत आहे.

सुशील देवकर

जळगाव शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी राखीव ठेवलेल्या नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा शिल्लक उरलेली नाही. नवीन बांधलेले ६ ओटेदेखील कमी पडत असून जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. तरीही काही मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी वाट पाहण्याची वेळ नातलगांवर येत आहे. इतकी भयावह परिस्थिती स्मशानभूमीत पाहिल्यावर लक्षात येते. मात्र प्रशासन कागदोपत्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत आहे. नेरीनाका स्मशानभूमी कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कारासाठी राखीव आहे. तेथे आठवडाभरात अंत्यसंस्कार झालेल्या मृतदेहांची संख्या व प्रशासनाकडून दररोज जाहीर केल्या जात असलेल्या कोरोना मृतांच्या आकडेवारीत कमालीची तफावत आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांना याबाबत विचारणा केली असता सारीचे रुग्ण व इतर रुग्णांचा समावेश असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे. मात्र इतर कारणाने मृत्यू असेल तर नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केलेच जाणार नाहीत. त्यामुळे एक तर ते दगावलेले रुग्ण हे कोरोनाचेच आहेत अथवा सारीचे.  सारीने जर एवढे मृत्यू होत असतील तर तेदेखील गंभीर आहे. त्यासाठी प्रशासनाने नागरिकांना अंधारात न ठेवता जर वस्तुस्थिती लक्षात आणून दिली तर प्रशासनाला कदाचित नागरिकांचे अधिक सहकार्य लाभेल व कोरोना संदर्भातील नियमावलीचे अधिक काटेकोर पालन करून कोरोना संसर्गाला आळा घालणे शक्य होऊ शकेल. मात्र प्रशासनाकडून तसे होताना दिसत नाही.

कोरोना उद्रेकाचा उच्चांक (पीक) गाठला गेला असून हळूहळू जळगाव शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत जाईल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त होत आहे. मात्र अद्यापही हजारच्या वरच रुग्ण सापडत असल्याने परिस्थितीतील गांभीर्य कायम आहे. नागरिकांना प्रशासनाकडून विनाकारण घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र नागरिक काही परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचेच वारंवार बाजारात होणाऱ्या गर्दीवरून लक्षात येत आहे. अगदी आठवडे बाजारही नियम डावलून भरवले जात असल्याने संसर्ग वाढला तर त्याचा दोष नागरिकांचाच असेल. त्या वेळी परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊन ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर नाही, याचा दोष प्रशासनावर टाकता येणार नाही, त्यासाठी आपणही तेवढेच जबाबदार राहू, हेदेखील समजून घेतलेले बरे...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalgaonजळगावMaharashtraमहाराष्ट्र