शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

फत्तेपूर परिसरात नुकसानीचे पंचनामेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 11:16 PM

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने केले असले तरी अजूनही फत्तेपूर परिसरातील शेतकरी पंचनामे झाले नसल्याची तक्रार करीत आहे.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त आमदार महाजन यांनी लक्ष देण्याची मागणी

जामनेर : तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने केले असले तरी अजूनही फत्तेपूर परिसरातील शेतकरी पंचनामे झाले नसल्याची तक्रार करीत आहे. तलाठी व कृषी विभागाकडे वारंवार विनंती करूनही नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने आमदार गिरीश महाजन यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. मदत मिळेल अथवा नाही याची शाश्वती नाही, मात्र पंचनामे होत नाही ही लाजीरवाणी बाब असल्याचे संतप्त शेतकरी बोलत आहे.सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने मका, कापूस, सोयाबीन व इतर कडध्यान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. महसूल व कृषी विभागाने सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे केले.पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार नोंदविली आहे. मात्र अद्याप काहीही कार्यवाही होत नसल्याचे शेतकरी सांगतात. शेतकºयांनी महागडे बियाणे घेऊन पेरणी केली, उत्पादन हाती येण्याची वेळ आली असत निसर्गाच्या अवकृपेने तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.पाच एकरमध्ये मका लावला आतापर्यंत सुमारे ७० हजार खर्च आला. अतिवृष्टीने मक्याचे पीक आडवे झाले. आता फक्त १० टक्के उत्पादन निघेल अशी स्थिती आहे. शेतकºयांच्या या प्रश्नाकडे आमदार गिरीश महाजन यांनी लक्ष घालून प्रशासनास पंचनामे करून मदत मिळवून द्यावी एवढीच अपेक्षा आहे.- पंकज चोपडे, शेतकरी, फत्तेपूरतालुक्यातील नुकसानग्रस्त शेतातील पिकांचे पंचनामे केले आहे. तरीही राहीलेल्या शेककºयांचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित भागातील कृषी सहायकांना दिले जातील.-अभिमन्यू चोपडे, तालुका कृषी अधिकारी, जामनेरअजूनही ३ टक्के भागातील शेतकºयांंचे पंचनामे झालेले नाही. फत्तेपूर मंडळ अधिकाºयांना पंचनाम्याचे आदेश दिले आहे. ज्या शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नसतील त्यांनी स्थानिक तलाठ्यांशी संपर्क साधावा.- अरुण शेवाळे, तहसीलदार 

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर