शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
3
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
4
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
5
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
6
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
7
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
9
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
10
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
11
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
12
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
13
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
14
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
15
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
16
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
17
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
18
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
19
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
20
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!

रुग्णाच्या मृत्यूमुळे ऑर्किड हॉस्पिटलमध्ये तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:17 AM

मृतदेह घेण्यास नकार : डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप जळगाव : अतिदक्षता विभागात एकही डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे अरुण रामकृष्ण ...

मृतदेह घेण्यास नकार : डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

जळगाव : अतिदक्षता विभागात एकही डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे अरुण रामकृष्ण वाघ (४२,रा. लोहारखेडा, ता.मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ऑर्किड हॉस्पिटलमध्ये बुधवारी दुपारी ही घटना घडली. यावेळी तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, डॉक्टरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेऊन नातेवाईकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले होते. दिवसभराच्या घडामोडी व पालकमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाने मात्र आरोपांचे खंडन केले आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण वाघ यांना १३ एप्रिल रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर १ मे रोजी कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता या विभागात एकही डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नव्हते. त्याच काळात त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांना बोलावण्यात आले तेव्हा ते मयत झालेले होते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच वाघ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे शालक सुनील विक्रम पवार (रा.वावडदा) यांनी केला आहे.

*पोलीस ठाण्यात एक तास चर्चा*

वाघ यांचा मृत्यू झाल्यानंतर सुनील विक्रम पवार व शिवसेनेचे रवींद्र कापडणे (रा. वावडदा) यांच्यासह नातेवाईकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली. डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा म्हणून त्यांनी मागणी केली. पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांच्या दालनात तासभर चर्चा झाली, मात्र कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नसल्याचा आरोप कापडणे व पवार यांनी केला. शेवटी संध्याकाळी रवींद्र कापडणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली. गुरुवारी याबाबत निर्णय घेऊ असे ठरवल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला.

कोट...

अतिदक्षता विभाग मोठा आहे. त्यामुळे डॉक्टर व स्टाफ प्रत्येक रुग्णाकडे जात असतात. काही सेकंदच फक्त तेथे कोणी नव्हते आणि त्याच वेळी नातेवाईक तेथे आले. दुर्दैवाने ही घटना घडली. मात्र त्यात डॉक्टरांचा काही दोष नाही.

- डॉ. प्रशांत बोरोले, ऑर्किड हॉस्पिटल

कोट.....

मेहुण्याची तब्येत अतिशय ठणठणीत झालेली होती. दुपारी अतिदक्षता विभागात एकही डॉक्टर व कर्मचारी नसल्याने त्याच वेळेस त्यांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन पुरवठा कमी झाला की काय माहिती नाही, मात्र त्यांच्या मृत्यूस डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी.

- सुनील विक्रम पवार, मयताचे शालक