शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

‘कुणी उमेदवारी करायची ते सांगा’, गुलाबराव देवकर आणि ज्ञानेश्वर महाजन यांच्यात प्रदेशाध्यक्षांसमोरच रंगला सामना

By आकाश नेवे | Updated: October 14, 2022 17:21 IST

Jalgaon News: राष्ट्रवादीचे पदाधिकारी ज्ञानेश्वर महाजन यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धरणगाव तालुकाध्यक्ष बैठकांना बोलावत नाहीत. तसेच पक्षात मानसन्मान मिळत नसल्याची तक्रार केली होती.

- आकाश नेवेजळगाव - राष्ट्रवादीचे पदाधिकारी ज्ञानेश्वर महाजन यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धरणगाव तालुकाध्यक्ष बैठकांना बोलावत नाहीत. तसेच पक्षात मानसन्मान मिळत नसल्याची तक्रार केली होती. त्यावर महाजन यांना योग्य तो मानसन्मान दिला जात असल्याचे तालुकाध्यक्ष धनराज माळी यांनी स्पष्ट केले. मात्र, तरीही महाजन यांच्या तक्रारी संपत नसल्याने जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनाच कुणी उमेदवारी करायची ते सांगा, त्याच्या नेतृत्त्वात आम्ही काम करु, तसेच मला सांगून टाका की, लढवायची की नाही.

ज्ञानेश्वर महाजन यांनी प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केली की, ‘तालुकाध्यक्ष कधीही धरणगावला बैठक घेत नाहीत. गुलाबराव देवकर यांनी जळगावला बैठक घेण्यास सांगितले, अशी सबब तालुकाध्यक्ष पुढे करतात. जळगाव तालुक्याचे अध्यक्ष आम्हाला बैठकीला बोलावत नाहीत. प्रमुख नेते असूनही सावत्र वागणूक मिळते. विधानसभा निवडणूक जाऊन तीन वर्षे झाली तरी बैठक झाली नाही. सगळं आलबेल असल्याचे दाखवले जात आहे. कुठल्याही नेमणुकांमध्ये विश्वासात घेतले जात नाही. त्यांनी पुढे जावे. मात्र, आम्हाला मान मिळावा. आम्ही नऊ जण विधानसभेला इच्छुक होतो. त्यांची एकत्र बैठक घ्यावी. गेल्या निवडणुकीत मते कमी का मिळाली, हेदेखील कळायला हवे.’

यावर तालुकाध्यक्ष धनराज माळी यांनी खुलासा करतांना सांगितले की, ‘त्यांना बैठकीला बोलावले जाते. बहुतेक बैठका धरणगावला होतात. जळगाव ग्रामीण मतदारसंघ असल्याने काही बैठका जळगावला होतात.’ जयंत पाटील यांनी काही बैठका धरणगावला घेण्याची आणि सर्व नऊ इच्छुकांना बोलावण्याची सूचना केली.

नंतर गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, मी सर्व इच्छुकांना सन्मान दिला आहे. जळगाव तालुक्यात महाजन यांनी स्वत: फिरायला हवे. हा विनाकारण ताण आहे. काम करायचे असेल तर मला एकदा सांगून टाका, की कुणी उमेदवारी करायची आहे. त्याच्या नेतृत्त्वात आम्ही काम करू. ही आडकाठी केली जाते. मला सांगून टाका, की लढवायची की नाही. पुढे जाता येईल.’

त्यानंतर जयंत पाटील यांनी हस्तक्षेप करत म्हटले की,‘तालुकाध्यक्षांनी सगळ्यांना बोलावले पाहिजे, कार्यरत नेत्यांना आधीच निरोप देत चला.’

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव