शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘कुणी उमेदवारी करायची ते सांगा’, गुलाबराव देवकर आणि ज्ञानेश्वर महाजन यांच्यात प्रदेशाध्यक्षांसमोरच रंगला सामना

By आकाश नेवे | Updated: October 14, 2022 17:21 IST

Jalgaon News: राष्ट्रवादीचे पदाधिकारी ज्ञानेश्वर महाजन यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धरणगाव तालुकाध्यक्ष बैठकांना बोलावत नाहीत. तसेच पक्षात मानसन्मान मिळत नसल्याची तक्रार केली होती.

- आकाश नेवेजळगाव - राष्ट्रवादीचे पदाधिकारी ज्ञानेश्वर महाजन यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धरणगाव तालुकाध्यक्ष बैठकांना बोलावत नाहीत. तसेच पक्षात मानसन्मान मिळत नसल्याची तक्रार केली होती. त्यावर महाजन यांना योग्य तो मानसन्मान दिला जात असल्याचे तालुकाध्यक्ष धनराज माळी यांनी स्पष्ट केले. मात्र, तरीही महाजन यांच्या तक्रारी संपत नसल्याने जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनाच कुणी उमेदवारी करायची ते सांगा, त्याच्या नेतृत्त्वात आम्ही काम करु, तसेच मला सांगून टाका की, लढवायची की नाही.

ज्ञानेश्वर महाजन यांनी प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केली की, ‘तालुकाध्यक्ष कधीही धरणगावला बैठक घेत नाहीत. गुलाबराव देवकर यांनी जळगावला बैठक घेण्यास सांगितले, अशी सबब तालुकाध्यक्ष पुढे करतात. जळगाव तालुक्याचे अध्यक्ष आम्हाला बैठकीला बोलावत नाहीत. प्रमुख नेते असूनही सावत्र वागणूक मिळते. विधानसभा निवडणूक जाऊन तीन वर्षे झाली तरी बैठक झाली नाही. सगळं आलबेल असल्याचे दाखवले जात आहे. कुठल्याही नेमणुकांमध्ये विश्वासात घेतले जात नाही. त्यांनी पुढे जावे. मात्र, आम्हाला मान मिळावा. आम्ही नऊ जण विधानसभेला इच्छुक होतो. त्यांची एकत्र बैठक घ्यावी. गेल्या निवडणुकीत मते कमी का मिळाली, हेदेखील कळायला हवे.’

यावर तालुकाध्यक्ष धनराज माळी यांनी खुलासा करतांना सांगितले की, ‘त्यांना बैठकीला बोलावले जाते. बहुतेक बैठका धरणगावला होतात. जळगाव ग्रामीण मतदारसंघ असल्याने काही बैठका जळगावला होतात.’ जयंत पाटील यांनी काही बैठका धरणगावला घेण्याची आणि सर्व नऊ इच्छुकांना बोलावण्याची सूचना केली.

नंतर गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, मी सर्व इच्छुकांना सन्मान दिला आहे. जळगाव तालुक्यात महाजन यांनी स्वत: फिरायला हवे. हा विनाकारण ताण आहे. काम करायचे असेल तर मला एकदा सांगून टाका, की कुणी उमेदवारी करायची आहे. त्याच्या नेतृत्त्वात आम्ही काम करू. ही आडकाठी केली जाते. मला सांगून टाका, की लढवायची की नाही. पुढे जाता येईल.’

त्यानंतर जयंत पाटील यांनी हस्तक्षेप करत म्हटले की,‘तालुकाध्यक्षांनी सगळ्यांना बोलावले पाहिजे, कार्यरत नेत्यांना आधीच निरोप देत चला.’

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव