शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यम्..! जळगाव कचरामुक्त शहर म्हणून घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्त शहरांचे रेटिंग शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये जळगाव शहराला तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्त शहरांचे रेटिंग शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये जळगाव शहराला तीन स्टार देण्यात आले असून, कचरामुक्त शहर म्हणूनदेखील जळगाव शहराची घोषणा करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय पथकाने शहराचे सर्वेक्षण केले होते. एकीकडे शहरातील मुख्य भागांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. मनपाकडे दररोज विविध भागांमधून कचऱ्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशी परिस्थिती असतानाही जळगाव शहर कचरामुक्त शहर म्हणून घोषित झाल्याने आश्चर्यच व्यक्त केले जात आहे.

स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२१ अंतर्गत देशभरातील शहरांचे घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे विलगीकरण, कचऱ्याचे संकलन व हगणदारीमुक्तीची स्थिती या आधारावर सहा हजार गुणांच्या सर्वेक्षणाची मोहीम केंद्र शासनाकडून घेण्यात आली आहे. याआधीच जळगाव शहर हगणदारीमुक्त शहर म्हणून जाहीर झाले आहे. २०२० मध्येदेखील जळगाव शहराने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तीन स्टार मिळवले होते. आता यावर्षीदेखील जळगाव शहराला तीन स्टारच मिळाले आहेत.

या आधारांवर करण्यात आली निवड

१. फेब्रुवारी महिन्यात शहरातील कचऱ्याच्या स्थितीवर सर्वेक्षण करण्यात आले.

२. जळगाव शहरातील एकूण जमा होणारा कचरा, घरांमधून संकलन होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण.

३. दैनंदिन संकलनातून ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण व एकूण जमा होणाऱ्या कचऱ्यावरील प्रक्रिया

४. शहरातील पाण्याच्या स्त्रोतांमधील स्वच्छता.

५. एकूण जमा होणाऱ्या कचऱ्यावर ७० टक्के प्रक्रिया होणे गरजेचे होते.

ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग

एकीकडे शासनाने जळगाव शहराची कचरामुक्त शहर म्हणून घोषणा केली असताना, दुसरीकडे शहरातील कचऱ्याची स्थिती मात्र भयावह आहे. शहरातील चौकाचौकात, गल्ली-बोळांमध्ये, रस्त्या-रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पडले आहेत. तसेच अनेक भागात तर तीन-तीन दिवस कचरा उचलला जात नाही, असे असतानादेखील जळगाव शहराला कचरामुक्त शहराचा दर्जा देण्यात आल्याने, शासनाच्या पथकाने केलेल्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

महासभेनेच करून दिला होता ठराव

महापालिकेच्या महासभांमध्ये अनेक नगरसेवक शहरातील कचऱ्याचा समस्या या प्रशासनाकडे मांडत असतात. मात्र, डिसेंबर २०२० मध्ये शासनाकडे कचरामुक्त शहराबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला. यासाठी महासभेतच जळगाव शहर कचरामुक्त शहर म्हणून घोषित करण्याचा ठराव करण्यात आला होता. एकीकडे कचऱ्याची समस्याही मांडायची आणि दुसरीकडे कचरामुक्त शहराचा ठराव मांडायचा, पदाधिकाऱ्यांच्या अशा दुहेरी भूमिकेमुळे शहरातील समस्या मार्गी लागताना दिसून येत नाही.

कोट...

जळगाव शहर कचरामुक्त शहर म्हणून जाहीर झाले आहे. शहराला तीन स्टार मिळाले आहेत. यामध्ये मनपा कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत महत्त्वाची होती. शहराला यामुळे फायदा होणार असून, मनपाला शासनाकडून १५व्या वित्त आयोगातून चांगला निधी प्राप्त होईल. तसेच शहराला प्रोत्साहनपर निधीदेखील मिळणार आहे.

- पवन पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा