शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

सणासुदीच्या काळात तरी रेल्वेची ‘स्पेशल’लूट थांबवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST

सचिन देव लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सद्य स्थितीला बहुतांश रेल्वेगाड्या सुरू केल्या ...

सचिन देव

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सद्य स्थितीला बहुतांश रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, या गाड्यांना कोरोनाच्या नावाखाली स्पेशल गाड्यांचा दर्जा देऊन, जादा भाडे आकारण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिंक भुर्दंड बसत असून, रेल्वे प्रशासनाने आता सणासुदीच्या काळात तरी स्पेशल गाड्यांद्वारे तिकिटासाठी जादा दराची आकारण्यात येणारी रक्कम थांबविण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. तसेच पूर्वीप्रमाणे गाड्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुल्या करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या अनेक महिन्यांपासून स्पेशल गाड्या चालविण्यात येत असून, या गाड्यांना जनरल तिकीट अद्यापही बंद आहे. तर आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच कोरोनापूर्वी या गाड्यांचे जे तिकीट दर होते, त्याहून काही प्रमाणात जास्त तिकिटांच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच भुर्दंड बसत आहे.

इन्फो :

सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन

हावडा एक्स्प्रेस

सेवाग्राम एक्स्प्रेस

काशी एक्स्प्रेस

कुशीनगर एक्स्प्रेस

इन्फो :

दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार

रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या आधी एक्स्प्रेसचे भाडे आणि आता या स्पेशल ट्रेनच्या भाड्यात २५ ते १०० रुपयांपर्यंत फरक आहे. यामध्ये पूर्वी जळगाव ते चाळीसगाव दरम्यान एक्स्प्रेसचे सर्वसाधारण तिकीट ५० रुपये होते. आता हे तिकीट आरक्षणामध्ये ६५ रुपये तर काही गाड्यांना ७५ रुपये आहे. जळगाव ते मुंबई तिकीट २५० ते २७५ रुपयांपर्यंत होते. आता हेच तिकीट ३८० ते ४०० रुपयांपर्यंत मिळत आहे.

इन्फो :

जनरल डबे कधी ‘अनलॉक’ होणार

रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही जनरल तिकीट सुरू केले नसून, तिकीट आरक्षित केल्यावरच प्रवासाची सक्ती केली आहे. तसेच पूर्वीच्या जनरल डब्यांना आरक्षित करून या डब्यांमध्ये सीटरचे आरक्षणाचे तिकीट देण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना रेल्वेचा प्रवास दुरापास्त झाला असून, जनरल डबे कधी ‘अनलॉक’ होणार, असा प्रश्न या प्रवाशांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

इन्फो :

‘स्पेशल’ भाडे कसे परवडणार?

कोरोनाचे कारण सांगून रेल्वे प्रशासनाने अद्यापही पॅसेंजर गाड्या सुरू केलेल्या नाहीत. तर सध्या ज्या गाड्या सुरू आहेत, त्या गाड्यांना विशेष व फेस्टिव्हल गाड्या सांगून जादा भाडे घेत आहेत. यामुळे सर्वसामान्य माणसांना हा प्रवास कसा परवडणार आहे. रेल्वेने आता तरी पूर्वीप्रमाणे गाड्या सुरू करायला हव्यात.

- तुषार देसले, प्रवासी

कोरोनाच्या नावाखाली रेल्वेकडून ज्या पद्धतीने तिकिटामागे जादा पैसे आकारात आहेत, ती लूट योग्य नाही. ज्या हेतूने जादा तिकीट आकारण्यात येत असले तरी, आरक्षित गाड्यांमध्येही प्रचंड गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कोरोनाचे कारण सांगून करण्यात येणारी लूट आता सणासुदीच्या काळात तरी थांबवायला हवी. सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणे गरजेचे आहे.

- संदीप पाटील, प्रवासी