शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

शिंदी परिसरात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:16 AM

पीकस्थिती चांगली असली तरी वन्यप्राण्यांच्या त्रासापासून पिकांचे नुकसान होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना रात्रीसुद्धा शेतात मुक्काम करावा लागत असल्याचे ...

पीकस्थिती चांगली असली तरी वन्यप्राण्यांच्या त्रासापासून पिकांचे नुकसान होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना रात्रीसुद्धा शेतात मुक्काम करावा लागत असल्याचे दिसून येते. नीलगाय, हरीण, रानडुकरे यांचा शेतीशिवारात मोठ्या प्रमाणावर त्रास असून वनविभागाने यांचा योग्य प्रकारे बंदोबस्त केल्यास शेतकऱ्यांचा त्रास काहीअंशी नक्कीच कमी होईल, असे शेतकरीवर्गातून सांगण्यात आले.

सध्या परिसरात कपाशी हे महत्त्वाचे नगदी पीक असून त्यासोबत ज्वारी, सोयाबीन, मका, तूर, उडीद, मूग ही पिकेसुद्धा शेतीशिवारात चांगल्या प्रकारे दिसून येत आहेत. मात्र, जोरदार पाऊस होत नसल्याने नदी, नाले आजही वाहून निघालेले नाहीत. विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही.

जंगलशिवारातील, शेतीशिवारातील तलाव पूर्ण क्षमतेने अजूनही भरलेले नाहीत. त्यामुळे भविष्यातील रब्बी हंगामासाठी विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणे गरजेचे आहे.

गुराढोरांना शेती व जंगलशिवारात हिरवा चारा उपलब्ध झाल्याने चाऱ्याची टंचाई मिटली आहे. शेतीशिवारात मजुरांना कामे उपलब्ध असून कोळपणी, निंदणी, रासायनिक खते देणे, इत्यादी कामे सुरू आहेत. महिलांना दीडशे ते दोनशे रुपये मजुरी मिळत असून पुरुषांना अडीचशे रुपयांपर्यंत दररोज सरासरी मजुरी मिळत असल्याचे सांगण्यात आले.

रासायनिक खते, बी-बियाणे, फवारणी यासाठी लागणारी औषधे यांच्या किमती काही प्रमाणात वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे हंगामाचे काहीसे बजेट कोलमडले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. साधारणपणे दरवर्षी शेतीहंगामासाठी विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकरी कर्जाची उचल करीत असतो आणि हंगाम झाल्यानंतर कर्ज फेडत असतो. मात्र, मागील अनेक वर्षांतील अनुभव पाहता शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी न होता वाढतच असल्याने शेतकरी शेतीपासून काहीसा दुरावत असून अनेक शेतकऱ्यांनी बटाईने जमीन देणे, इतर भागांतून आलेले गोरगरीब कुटुंब यांना जमीन कसायला देणे, अशा पद्धतीने काही शेतकरी शेती करीत असतात. वेळोवेळी गरजेनुसार मजूर उपलब्ध न होणे, मजुरांची टंचाई जाणवणे, परिसरातून नियमित रोजगारासाठी शहरांकडे जाणे, हेसुद्धा त्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले. कोरडवाहू परिसर असल्याने पाण्याची सातत्याने टंचाई या भागात असते.