शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शिंदी परिसरात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST

पीकस्थिती चांगली असली तरी वन्यप्राण्यांच्या त्रासापासून पिकांचे नुकसान होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना रात्रीसुद्धा शेतात मुक्काम करावा लागत असल्याचे ...

पीकस्थिती चांगली असली तरी वन्यप्राण्यांच्या त्रासापासून पिकांचे नुकसान होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना रात्रीसुद्धा शेतात मुक्काम करावा लागत असल्याचे दिसून येते. नीलगाय, हरीण, रानडुकरे यांचा शेतीशिवारात मोठ्या प्रमाणावर त्रास असून वनविभागाने यांचा योग्य प्रकारे बंदोबस्त केल्यास शेतकऱ्यांचा त्रास काहीअंशी नक्कीच कमी होईल, असे शेतकरीवर्गातून सांगण्यात आले.

सध्या परिसरात कपाशी हे महत्त्वाचे नगदी पीक असून त्यासोबत ज्वारी, सोयाबीन, मका, तूर, उडीद, मूग ही पिकेसुद्धा शेतीशिवारात चांगल्या प्रकारे दिसून येत आहेत. मात्र, जोरदार पाऊस होत नसल्याने नदी, नाले आजही वाहून निघालेले नाहीत. विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही.

जंगलशिवारातील, शेतीशिवारातील तलाव पूर्ण क्षमतेने अजूनही भरलेले नाहीत. त्यामुळे भविष्यातील रब्बी हंगामासाठी विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणे गरजेचे आहे.

गुराढोरांना शेती व जंगलशिवारात हिरवा चारा उपलब्ध झाल्याने चाऱ्याची टंचाई मिटली आहे. शेतीशिवारात मजुरांना कामे उपलब्ध असून कोळपणी, निंदणी, रासायनिक खते देणे, इत्यादी कामे सुरू आहेत. महिलांना दीडशे ते दोनशे रुपये मजुरी मिळत असून पुरुषांना अडीचशे रुपयांपर्यंत दररोज सरासरी मजुरी मिळत असल्याचे सांगण्यात आले.

रासायनिक खते, बी-बियाणे, फवारणी यासाठी लागणारी औषधे यांच्या किमती काही प्रमाणात वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे हंगामाचे काहीसे बजेट कोलमडले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. साधारणपणे दरवर्षी शेतीहंगामासाठी विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकरी कर्जाची उचल करीत असतो आणि हंगाम झाल्यानंतर कर्ज फेडत असतो. मात्र, मागील अनेक वर्षांतील अनुभव पाहता शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी न होता वाढतच असल्याने शेतकरी शेतीपासून काहीसा दुरावत असून अनेक शेतकऱ्यांनी बटाईने जमीन देणे, इतर भागांतून आलेले गोरगरीब कुटुंब यांना जमीन कसायला देणे, अशा पद्धतीने काही शेतकरी शेती करीत असतात. वेळोवेळी गरजेनुसार मजूर उपलब्ध न होणे, मजुरांची टंचाई जाणवणे, परिसरातून नियमित रोजगारासाठी शहरांकडे जाणे, हेसुद्धा त्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले. कोरडवाहू परिसर असल्याने पाण्याची सातत्याने टंचाई या भागात असते.