गणेश मंडळांकडून जपली जातेय सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:19 AM2021-09-14T04:19:08+5:302021-09-14T04:19:08+5:30

यंदा कोरोनामुळे अनेक मंडळांनी आरास केली नसली तरी गावातील तरुण मंडळी व महिलावर्ग सायंकाळी गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी येत ...

Social commitment is cherished by Ganesh Mandals | गणेश मंडळांकडून जपली जातेय सामाजिक बांधिलकी

गणेश मंडळांकडून जपली जातेय सामाजिक बांधिलकी

Next

यंदा कोरोनामुळे अनेक मंडळांनी आरास केली नसली तरी गावातील तरुण मंडळी व महिलावर्ग सायंकाळी गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी येत असतात.

नवयुवक गणेश मंडळातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचा कार्यक्रम आखला आहे. या मंडळाचे यंदाचे ३२वे वर्ष असून, मंडळातर्फे सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे, असे मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सांगितले.

आदर्श गणेश मंडळाचे २७वे वर्ष असून, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या मंडळानेही कुठलीही आरास न करता कोरोनाविषयीच जनजागृतीवर भर देण्याचे काम हाती घेतल्याचे मंडळाचे अध्यक्ष मनोज महाजन यांनी सांगितले.

बालगणेश मंडळाचे १८वे वर्ष असून, जनजागृतीचे कार्यक्रम राबविणार असल्याचे अध्यक्ष अशोक बोरणारे यांनी सांगितले.

(छाया: गणेश पाटील)

Web Title: Social commitment is cherished by Ganesh Mandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.