शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

पालिकांमध्ये निरर्थक प्रयोगाची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:44 IST

महाविकास आघाडी सरकार आल्यावर ‘लोकनियुक्त’ला खो; पण पालिकांमधील कारभार सुधारणार का हा प्रश्न, पक्ष बदलतात परंतु वर्षानुवर्षे त्याच घराण्यांची पालिकांमध्ये सत्ता; नगरसेवक तेच आणि अधिकारीदेखील तेच

मिलिंद कुलकर्णीमहाराष्टÑात सरकारे बदलली की, धोरणे बदलतात हा सार्वत्रिक अनुभव आहे. २००१ मध्ये काँग्रेसची सत्ता असताना लोकनियुक्त नगराध्यक्षाचा निर्णय झाला. प्रत्यक्षात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातुरात राष्टÑवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला. जळगावातही तसेच घडले. बहुमत एका पक्षाचे तर नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा, अशा स्थितीमुळे विकासावर परिणाम झाला. पुढे सरकारने हा निर्णय बदलला. भाजप-शिवसेना युती सरकारने हा निर्णय पुन्हा अंमलात आणला. त्याचा लाभ भाजपला अधिक झाला. महाविकास आघाडीने आता तो निर्णय बदलला.राष्टÑपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ असे आवाहन केले असले तरी वास्तव असे आहे की, शहराकडे लोंढे वाढत आहेत. काही शहरांची तर नागरिकांना सामावून घेण्याची क्षमता संपलेली आहे, पण तरीही आजूबाजूची खेडी समाविष्ट करुन पालिकांचे कार्यक्षेत्र फुगविण्याचे खटाटोप सुरु आहेत. एवढ्या लोकसंख्येला मुलभूत सुविधा पुरवता येण्याइतकी पायाभूत रचना या शहरांमध्ये नाही. बकालपण अधिक वाढत चालले आहे. शिक्षण, रोजगाराची संधी असल्याने खेड्यातून शहराकडे जाण्याचे प्रमाण वाढत आहेच. दुष्काळ-अतिवृष्टीमुळे शेतीवर झालेला परिणाम, पाणी-वीज-आरोग्याची ग्रामीण भागात असलेली दुरवस्था पाहता उच्चभ्रू व मध्यमवर्गीय नागरिकदेखील शहरात दुसरे घर करण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत.नव्या नागरिकांना सामावून घेण्याची क्षमता संपत आल्याने शहरांमध्ये नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण भागातून लोक येत असल्याने बिल्डर लॉबी, टँकर लॉबी, वाळू लॉबी प्रभावशाली झाली आहेत. या लॉबीचे हितसंबंध जपणारी मंडळी पूर्वी पालिकांमध्ये सत्तास्थानी असत. पुढे हीच मंडळी पालिकांमध्ये शिरली आणि पालिकांचे कार्यक्षेत्र वाढविणे, विकास नियमावली मंजूर करणे, विकास योजना राबविणे अशा बाबी मनमानी पध्दतीने होऊ लागल्या. हा प्रभाव तर आता एवढा वाढला की, नवे घर बांधण्यासाठी परवानगी घेण्यापासून तर घर पूर्णत्वाच्या दाखल्यापर्यंत भ्रष्टाचाराची साखळी तयार झाली आहे. राजपत्रित अधिकारी जरी मुख्याधिकारी, आयुक्त म्हणून नियुक्त झाला तरी त्यांच्यासोबत काम करणारी यंत्रणा ही स्थानिक असते. नगरसेवक मंडळींचेच नातलग असलेल्या या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेणे हे बाहेरील अधिकाºयाला जिकीरीचे ठरते. या सगळ्या प्रकारातून राज्यभरात शहरांची पुरती वाट लागलेली आहे.केंद्र सरकारच्या पाणीपुरवठा, घरकूल, मल: निस्सारण, स्वच्छ भारत अभियान अशा योजना राबवित असताना वर्षानुवर्षे तेच ठेकेदार दिसून येतील. कंपन्यांची नावे बदलतील, परंतु मालक तेच असतात. अर्धवट कामे ठेवणे, निधी हडपणे, यंत्रसामुग्री घेऊन पोबारा करणे असे प्रकार हमखास दिसून येतात. पालिकेपासून थेट मंत्रालयापर्यंत साखळी असल्याने कोणत्याही ठेकेदाराला शिक्षा झाल्याचे उदाहरण दिसून येत नाही.राज्यात ज्या पक्षाचे सरकार येते, त्या पक्षाची सत्ता पालिकेत येते. कारण होकायंत्राप्रमाणे दिशा आणि टोपी बदलणारे नगरसवेक ठिकठिकाणी आहेत. राजकीय पक्षांनाही स्वबळ वाढल्याचे तात्कालीक समाधान मिळते. पण वास्तव वेगळेच असते, याचा अनुभव पूर्वी काँग्रेसने तर आता भाजप घेत आहे. तूर्त तरी या प्रश्नावर तोडगा दिसत नाही, हे सामान्यांचे दुर्देव म्हणायला हवे.राज्य सरकारने प्रभाग पध्दती, एक सदस्यीय पध्दती असे बदलदेखील करुन पाहिले. प्रयोग होतात, पण त्याचा सकारात्मक परिणाम दिसत नाही. याला मूळ कारण असे आहे की, प्रत्येक शहरात मोजक्या पाच-दहा घराण्यांमध्ये पालिकेची सत्ता केंद्रित झाली आहे. आरक्षण आले की, त्याच कुटुंबातील व्यक्ती उपनगराध्यक्ष होऊन सत्ता आपल्याच हाती ठेवते. अधिकारी आणि कर्मचारीदेखील नगरसेवक मंडळींचे नातलग आहेत. शहरांचा विकास ठप्प आणि नागरिकांची नाडवणूक हे चित्र कायम आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव