शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पालिकांमध्ये निरर्थक प्रयोगाची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:44 IST

महाविकास आघाडी सरकार आल्यावर ‘लोकनियुक्त’ला खो; पण पालिकांमधील कारभार सुधारणार का हा प्रश्न, पक्ष बदलतात परंतु वर्षानुवर्षे त्याच घराण्यांची पालिकांमध्ये सत्ता; नगरसेवक तेच आणि अधिकारीदेखील तेच

मिलिंद कुलकर्णीमहाराष्टÑात सरकारे बदलली की, धोरणे बदलतात हा सार्वत्रिक अनुभव आहे. २००१ मध्ये काँग्रेसची सत्ता असताना लोकनियुक्त नगराध्यक्षाचा निर्णय झाला. प्रत्यक्षात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातुरात राष्टÑवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला. जळगावातही तसेच घडले. बहुमत एका पक्षाचे तर नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा, अशा स्थितीमुळे विकासावर परिणाम झाला. पुढे सरकारने हा निर्णय बदलला. भाजप-शिवसेना युती सरकारने हा निर्णय पुन्हा अंमलात आणला. त्याचा लाभ भाजपला अधिक झाला. महाविकास आघाडीने आता तो निर्णय बदलला.राष्टÑपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ असे आवाहन केले असले तरी वास्तव असे आहे की, शहराकडे लोंढे वाढत आहेत. काही शहरांची तर नागरिकांना सामावून घेण्याची क्षमता संपलेली आहे, पण तरीही आजूबाजूची खेडी समाविष्ट करुन पालिकांचे कार्यक्षेत्र फुगविण्याचे खटाटोप सुरु आहेत. एवढ्या लोकसंख्येला मुलभूत सुविधा पुरवता येण्याइतकी पायाभूत रचना या शहरांमध्ये नाही. बकालपण अधिक वाढत चालले आहे. शिक्षण, रोजगाराची संधी असल्याने खेड्यातून शहराकडे जाण्याचे प्रमाण वाढत आहेच. दुष्काळ-अतिवृष्टीमुळे शेतीवर झालेला परिणाम, पाणी-वीज-आरोग्याची ग्रामीण भागात असलेली दुरवस्था पाहता उच्चभ्रू व मध्यमवर्गीय नागरिकदेखील शहरात दुसरे घर करण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत.नव्या नागरिकांना सामावून घेण्याची क्षमता संपत आल्याने शहरांमध्ये नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण भागातून लोक येत असल्याने बिल्डर लॉबी, टँकर लॉबी, वाळू लॉबी प्रभावशाली झाली आहेत. या लॉबीचे हितसंबंध जपणारी मंडळी पूर्वी पालिकांमध्ये सत्तास्थानी असत. पुढे हीच मंडळी पालिकांमध्ये शिरली आणि पालिकांचे कार्यक्षेत्र वाढविणे, विकास नियमावली मंजूर करणे, विकास योजना राबविणे अशा बाबी मनमानी पध्दतीने होऊ लागल्या. हा प्रभाव तर आता एवढा वाढला की, नवे घर बांधण्यासाठी परवानगी घेण्यापासून तर घर पूर्णत्वाच्या दाखल्यापर्यंत भ्रष्टाचाराची साखळी तयार झाली आहे. राजपत्रित अधिकारी जरी मुख्याधिकारी, आयुक्त म्हणून नियुक्त झाला तरी त्यांच्यासोबत काम करणारी यंत्रणा ही स्थानिक असते. नगरसेवक मंडळींचेच नातलग असलेल्या या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेणे हे बाहेरील अधिकाºयाला जिकीरीचे ठरते. या सगळ्या प्रकारातून राज्यभरात शहरांची पुरती वाट लागलेली आहे.केंद्र सरकारच्या पाणीपुरवठा, घरकूल, मल: निस्सारण, स्वच्छ भारत अभियान अशा योजना राबवित असताना वर्षानुवर्षे तेच ठेकेदार दिसून येतील. कंपन्यांची नावे बदलतील, परंतु मालक तेच असतात. अर्धवट कामे ठेवणे, निधी हडपणे, यंत्रसामुग्री घेऊन पोबारा करणे असे प्रकार हमखास दिसून येतात. पालिकेपासून थेट मंत्रालयापर्यंत साखळी असल्याने कोणत्याही ठेकेदाराला शिक्षा झाल्याचे उदाहरण दिसून येत नाही.राज्यात ज्या पक्षाचे सरकार येते, त्या पक्षाची सत्ता पालिकेत येते. कारण होकायंत्राप्रमाणे दिशा आणि टोपी बदलणारे नगरसवेक ठिकठिकाणी आहेत. राजकीय पक्षांनाही स्वबळ वाढल्याचे तात्कालीक समाधान मिळते. पण वास्तव वेगळेच असते, याचा अनुभव पूर्वी काँग्रेसने तर आता भाजप घेत आहे. तूर्त तरी या प्रश्नावर तोडगा दिसत नाही, हे सामान्यांचे दुर्देव म्हणायला हवे.राज्य सरकारने प्रभाग पध्दती, एक सदस्यीय पध्दती असे बदलदेखील करुन पाहिले. प्रयोग होतात, पण त्याचा सकारात्मक परिणाम दिसत नाही. याला मूळ कारण असे आहे की, प्रत्येक शहरात मोजक्या पाच-दहा घराण्यांमध्ये पालिकेची सत्ता केंद्रित झाली आहे. आरक्षण आले की, त्याच कुटुंबातील व्यक्ती उपनगराध्यक्ष होऊन सत्ता आपल्याच हाती ठेवते. अधिकारी आणि कर्मचारीदेखील नगरसेवक मंडळींचे नातलग आहेत. शहरांचा विकास ठप्प आणि नागरिकांची नाडवणूक हे चित्र कायम आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव