शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

साहेब, प्यायला पाणी नाही अन् गुरांना चारा नाही, शेतकऱ्यांच्या व्यथांनी  केंद्रीय पथक निरुत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 10:15 PM

दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय समितीच्या सदस्यांनी तुम्ही, चारा का लावत नाहीत. असा प्रश्न केला.

जळगाव : पाण्याअभावी यंदा कापूस व मका पिक हातातून गेले आहे. काम नसल्याने मुलं गाव सोडून जात आहेत. पिण्याला पाणी नाही, गुरांना चारा नाही. बोंडअळीची भरपाई नाही, कर्जमाफीचे पैसे नाहीत, अशात कसे जगावे, हेच कळत नाही, अशी व्यथा दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय समितीसमोर शेतकऱ्यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या या व्यथा ऐकून केंद्रीय पथकही निरुत्तर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय, प्रश्न आजही कायम आहे. 

दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय समितीच्या सदस्यांनी तुम्ही, चारा का लावत नाहीत. असा प्रश्न केला. त्यावर चाऱ्यासाठी पाणी द्या, असे शेतकऱ्यांनी सांगताच समितीचे सदस्य निरुत्तर झाले. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती बुधवारी सायंकाळी पिंपळगांव गोलाईत (ता.जामनेर) येथे पोहोचली. त्यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. या पथकात केंद्रीय जल आयोगाचे संचालक आर.डी. देशपांडे, सहसचिव छवी झा, डिपार्टमेंट ऑफ पल्सेसचे संचालक ए.के. तिवारी, एमएनसीएफसीच्या सहाय्यक संचालक डॉ. शालिनी सक्सेना यांचा समावेश आहे. दरम्यान, समितीच्या सदस्यांनी पिंपळगाव गोलाईत गावाजवळील कमल आत्माराम पाटील, मंगला पांडुरंग पाटील व शेखर चिंधू पाटील यांच्या शेतातील पिकांची पाहणी करुन माहिती घेतली. 

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळJalgaonजळगाव