शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

मेहरुण तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:44 IST

जळगाव : शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावाच्या पाणी पातळीत उन्हाळा लागण्यापूर्वीच झपाट्याने घट होऊ लागली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच तलावाची ...

जळगाव : शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावाच्या पाणी पातळीत उन्हाळा लागण्यापूर्वीच झपाट्याने घट होऊ लागली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच तलावाची पाणीपातळी दोन फुटाने कमी झाली आहे. तलावातून पाण्याचा उपसा वाढत असल्याने तसेच बाष्पीभवन होऊ लागल्याने पाणी पातळी कमी होत असल्याचे सांगितले जात असून याकडे महापालिकेने वेळीच लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पावसाळ््यात तब्बल सहा वर्षांनतर मेहरुण तलाव ‘ओव्हर फ्लो’ झाला होता. मात्र पाणीपातळी टिकविण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने आतापासूनच पातळी घटल्यास उन्हाळ््यामध्ये पाणी टिकते की नाही, अशी चिंतादेखील व्यक्त केली जात आहे.मेहरुण तलाव हा पूर्वीपासूनच शहरवासीयांचे खास आकर्षण केंद्र असून त्याचे जतन करण्यासाठी पर्यावरणप्रेमीही हातभार लावत आहेत. मात्र गेल्या काही वर्षात या भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम वाढल्याने मेहरुण तलावाच्या स्त्रोतावर मोठा परिणाम झाला. पावसाळ््यात मेहरुण तलावामध्ये लांडोरखोरीसहआजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असे, मात्र बांधकाम वाढल्याने हे स्त्रोत इतरत्र वळले आहे. परिणामी मेहरुण तलावामध्ये पाण्याचे प्रमाण कमी-कमी होत गेल व मेहरुण तलाव गेल्या काही वर्षांपासून पूर्ण भरत नव्हता.मात्र पावसाळ््यामध्ये मेहरुण तलावाला ब्रिटीशकालीन अंबरझरा तलावाचा मोठा आधार झाला. गेल्या वर्षी उन्हाळ््यात वृक्ष संवर्धन समिती व मराठी प्रतिष्ठानच्यावतीने पुढाकार घेण्यात येऊन अंबरझरा तलावापासून मेहरुण तलावापर्यंत चार कि.मी. लांबी व १५ फूट खोलीची चारी तयार केली. त्यामुळे पुन्हा अंबरझऱ्यातील खळखळाट मेहरुण तलावाकडे वळला. तंत्रशुद्ध चाºया तयार झाल्याने आॅगस्ट महिन्यातच तलाव ८० टक्के भरला व सप्टेंबर महिन्याच्या दुसºयाच आठवड्यात मेहरुण तलावाचा साठा १०० टक्क्यांवर पोहचला.मनपाने लक्ष द्यावेशहराचे वैभव असले तरी मनपाकडून मेहरुण तलावाकडे लक्ष दिले जात नाही, असा आरोप होत आहे. या परिसरात पाण्याचा उपसा होत असल्यास मनपाने पाहणी करून तो रोखावा, अशी मागणी केली जात आहे. तसेच बाष्पीभवन रोखण्यासाठी पूर्वी तलावात रसायन टाकले जात असे. त्यामुळे पाणी टिकून राहत असे. आतादेखील तलावात रसायन टाकल्यास बाष्पीभवन कमी होईल, असे वाणी यांचे म्हणणे आहे.तलावातील पाणी स्थीर, वाहून जाणे शक्य नाहीमेहरुण तलावातील पाणी हे स्थिर असते. ते वाहून जाणे शक्य नाही. उपसा व बाष्पीभवनमुळे पाण्याची पातळी कमी होऊन आताच दोन फुटाने कमी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी म्हशींनादेखील अटकाव करावा, अशी मागणी होत आहे.उन्हाळ््यापूर्वीच पाणीपातळीत घटसहा वर्षांनंतर यंदाच्या पावसाळ््यात मेहरुण तलाव १०० टक्के भरला खरा, मात्र आता त्यातील पाणी पातळी टिकविण्यासाठी लक्ष दिले जात नसल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. एक तर या भागात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बांधकाम वाढल्याने मेहरुण तलावाच्या स्त्रोतावर परिणाम झाला व आता या वाढत्या बांधकामांमुळे पाणीपातळीही कमी होऊ लागली आहे. बांधकामासाठी तलावातील पाण्याचा उपसा होण्यासह परिसरात या पाण्याचा वापरही वाढल्याने पाणीपातळी कमी होत असल्याची माहिती मिळाली. तलावाजवळच कुपनलिका होत असल्याने पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे सांगण्यात येत आहे.तलाव होतोय उथळगणेश विसर्जन असो की दुर्गा विसर्जन हे मेहरुण तलावात केले जाते. त्यामुळे मूर्तींची संख्या वाढत जाऊन तलावाची खोली कमी होत आहे व तलाव उथळ होत असल्याचे मराठी प्रतिष्ठानचे विजयकुमार वाणी यांचे म्हणणे आहे. खोली जास्त राहिल्यास तलावात पाणीदेखील जास्त साठू शकेल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उन्हाळ््यात बाष्पीभवन झाले तरी पावसाळ््यापर्यंत पाणी टिकून राहण्यास मदत होत जाईल. त्यासाठी तलावात मोठ्या मूर्तींचे विसर्जन तलावात न करता इतरत्र करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.मेहरुण तलावाच्या पाणीपातळीत दोन फुटाने घट झाली आहे. तलावातील पाणी टिकून राहण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे.- विजयकुमार वाणी, मराठी प्रतिष्ठान

टॅग्स :riverनदीJalgaonजळगाव